ETV Bharat / city

राज्यात आज 3 हजार 282 जणांना कोरोनाची लागण - Corona Latest News

आज राज्यात ३,२८२ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १९,४२,१३६ वर पोहोचला आहे. राज्यात आज ३५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, आतापर्यंत एकूण ४९,६३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आज 3 हजार 282 जणांना कोरोनाची लागण
राज्यात आज 3 हजार 282 जणांना कोरोनाची लागण
author img

By

Published : Jan 3, 2021, 7:29 PM IST

मुंबई - आज राज्यात ३,२८२ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १९,४२,१३६ वर पोहोचला आहे. राज्यात आज ३५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, आतापर्यंत एकूण ४९,६३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.56 टक्के एवढा असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६४ टक्के

राज्यात आज २,०६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोवर मात केलेल्या रुग्णांचा एकूण आकडा १८,३६,९९९ वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रामाण ९४.६४ टक्के एवढे झाले आहे. तर राज्यात सध्या ५४,३१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत कोरोनाच्या निदानासाठी राज्यात १,२९,५८,५०२ एवढ्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये घट

राज्यात जून दरम्यान दिवसाला ५४०० रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७०८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८५२२ रुग्ण आढळून आले होते. १९ ऑक्टोबरला ५९८४ रुग्ण, २६ ऑक्टोबरला ३६४५, ७ नोव्हेंबरला ३,९५९, १० नोव्हेंबरला ३,७९१, १५ नोव्हेंबरला २,५४४, १६ नोव्हेंबरला २,५३५, १७ नोव्हेंबरला २,८४०, २० नोव्हेंबरला ५,६४०, तर २१ नोव्हेंबरला ५७६० रुग्ण आढळून आले आहेत.

मुंबई - आज राज्यात ३,२८२ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १९,४२,१३६ वर पोहोचला आहे. राज्यात आज ३५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, आतापर्यंत एकूण ४९,६३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.56 टक्के एवढा असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६४ टक्के

राज्यात आज २,०६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोवर मात केलेल्या रुग्णांचा एकूण आकडा १८,३६,९९९ वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रामाण ९४.६४ टक्के एवढे झाले आहे. तर राज्यात सध्या ५४,३१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत कोरोनाच्या निदानासाठी राज्यात १,२९,५८,५०२ एवढ्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये घट

राज्यात जून दरम्यान दिवसाला ५४०० रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७०८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८५२२ रुग्ण आढळून आले होते. १९ ऑक्टोबरला ५९८४ रुग्ण, २६ ऑक्टोबरला ३६४५, ७ नोव्हेंबरला ३,९५९, १० नोव्हेंबरला ३,७९१, १५ नोव्हेंबरला २,५४४, १६ नोव्हेंबरला २,५३५, १७ नोव्हेंबरला २,८४०, २० नोव्हेंबरला ५,६४०, तर २१ नोव्हेंबरला ५७६० रुग्ण आढळून आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.