ETV Bharat / city

'पी-305 बार्ज'मधील २२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू; जेजे रुग्णालयात आणले मृतदेह - तौक्ते चक्रीवादळ मुंबई

तौक्ते चक्रीवादळात अरबी समुद्रात अडकलेल्या पी 305 या बार्जमधील २२ कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व मृतदेह जेजे रुग्णालयात आणण्यात आले आहेत.

barge
बचावकार्य करताना
author img

By

Published : May 20, 2021, 3:05 PM IST

Updated : May 20, 2021, 3:18 PM IST

मुंबई - तौक्ते चक्रीवादळात अरबी समुद्रात अडकलेल्या पी 305 या बार्जमधील २२ कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व मृतदेह जेजे रुग्णालयात आणण्यात आले आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या यलो गेट पोलीस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

माहिती देताना डीसीपी एस चैतन्या

हेही वाचा - कोरोना चाचणी घरच्या घरी; पुण्यातील 'मायलॅब'च्या शोधाला आयसीएमआरची मान्यता

188 कर्मचाऱ्यांना वाचवले

तौक्ते चक्रीवादळाचा फटका ‘बॉम्बे हाय’ परिसराला मोठ्या प्रमाणात बसला आहे. चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून पी-३०५ या बार्जचा नांगर वाहवत गेला आणि हे बार्ज समुद्रात भरकटले. त्यानंतर चक्रीवादळ आणि मुसळधार पावसातच नौदलाने युद्धपातळीवर शोध मोहीम हाती घेतली. बुधवारी एकूण 188 जणांना वाचवण्यात नौदलाला यश आले आहे. तर, 22 जणांचे मृतदेह अरबी समुद्रातून बाहेर काढले आहेत.

तौक्ते चक्रीवादळाच्या विळख्यात अडकलेल्या पी-305 या बार्जवरील कर्मचाऱ्यांच्या बचाव कार्यासाठी भारतीय नौदलाच्या बियास, बेतवा आणि तेग या जहाजांनी 'आयएनएस कोची' आणि 'आयएनएस कोलकाता' यांच्यासोबत मिळून बचावकार्यात मदत केली होती. याबरोबरच नौदलाच्या हेलिकॉप्टरचीसुद्धा या बचावकार्यात मदत घेतली.

हेही वाचा - राजीव सातव यांच्या निधनानं कुटुंबीयांसह काँग्रेसवर मोठा आघात, राहुल गांधीनी आठवणी जाग्या करत वाहिली श्रद्धांजली

मुंबई - तौक्ते चक्रीवादळात अरबी समुद्रात अडकलेल्या पी 305 या बार्जमधील २२ कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व मृतदेह जेजे रुग्णालयात आणण्यात आले आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या यलो गेट पोलीस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

माहिती देताना डीसीपी एस चैतन्या

हेही वाचा - कोरोना चाचणी घरच्या घरी; पुण्यातील 'मायलॅब'च्या शोधाला आयसीएमआरची मान्यता

188 कर्मचाऱ्यांना वाचवले

तौक्ते चक्रीवादळाचा फटका ‘बॉम्बे हाय’ परिसराला मोठ्या प्रमाणात बसला आहे. चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून पी-३०५ या बार्जचा नांगर वाहवत गेला आणि हे बार्ज समुद्रात भरकटले. त्यानंतर चक्रीवादळ आणि मुसळधार पावसातच नौदलाने युद्धपातळीवर शोध मोहीम हाती घेतली. बुधवारी एकूण 188 जणांना वाचवण्यात नौदलाला यश आले आहे. तर, 22 जणांचे मृतदेह अरबी समुद्रातून बाहेर काढले आहेत.

तौक्ते चक्रीवादळाच्या विळख्यात अडकलेल्या पी-305 या बार्जवरील कर्मचाऱ्यांच्या बचाव कार्यासाठी भारतीय नौदलाच्या बियास, बेतवा आणि तेग या जहाजांनी 'आयएनएस कोची' आणि 'आयएनएस कोलकाता' यांच्यासोबत मिळून बचावकार्यात मदत केली होती. याबरोबरच नौदलाच्या हेलिकॉप्टरचीसुद्धा या बचावकार्यात मदत घेतली.

हेही वाचा - राजीव सातव यांच्या निधनानं कुटुंबीयांसह काँग्रेसवर मोठा आघात, राहुल गांधीनी आठवणी जाग्या करत वाहिली श्रद्धांजली

Last Updated : May 20, 2021, 3:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.