ETV Bharat / city

कोल्हापूर - अकरावीचे वर्ग फुलले, कोरोनानंतर तब्बल आठ महिन्यांनी परिसर गजबजला

author img

By

Published : Dec 11, 2020, 12:39 PM IST

Updated : Dec 11, 2020, 4:46 PM IST

कोरोनासारख्या महाभयंकर संकटाला तोंड देत अखेर महाविद्यालयचा परिसर पुन्हा एकदा गजबजू लागला आहे. गुरुवारपासून कोल्हापुरातील अकरावीचे वर्ग सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सध्या महाविद्यालयात सर्व नियमांचे पालन करून पन्नास टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून येत आहे.

lockdown in kolhapur
कोल्हापूर - अकरावीचे वर्ग फुलले, कोरोनानंतर तब्बल आठ महिन्यांनी परिसर गजबजला

कोल्हापूर - कोरोनासारख्या महाभयंकर संकटाला तोंड देत अखेर महाविद्यालयचा परिसर पुन्हा एकदा गजबजू लागला आहे. गुरुवारपासून कोल्हापुरातील अकरावीचे वर्ग सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सध्या महाविद्यालयात सर्व नियमांचे पालन करून पन्नास टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून येत आहे.

कोल्हापूर - अकरावीचे वर्ग फुलले, कोरोनानंतर तब्बल आठ महिन्यांनी परिसर गजबजला
शालेय जीवनातून मुक्त होऊन महाविद्यालय विश्वामध्ये पहिलं पाऊल टाकत विद्यार्थ्यांची अखेर नव्या शैक्षणिक पर्वाला सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे सर्वच संकटात असताना राज्य शासनाच्या मार्गदर्शक नियमानुसार कोल्हापुरातील अकरावीचे वर्ग सुरू झाले आहेत. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने दिलेल्या सूचनेनुसार शहरातील कनिष्ट महाविद्यालयाने गुरुवारपासून अकरावीचे वर्ग सुरू केले आहेत. पहिल्या फेरीत जवळपास चार हजार प्रवेश विद्यार्थ्यांनी घेतले असून कला, वाणिज्य या शाखेतील महाविद्यालय सकाळी साडेसात ते साडेदहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर विज्ञान शाखेचे वर्ग सकाळी अकरा वाजल्यानंतर भरवण्यात येणार आहेत. १५ डिसेंबर पर्यंत उर्वरित प्रवेश प्रकिया पूर्ण करून टप्प्या टप्प्याने पूर्ण क्षमतेने महाविद्यालय सुरू होणार आहे.

एक दिवसाआड 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती महाविद्यालयात असणार आहे. महाविद्यालयांकडून शासनाच्या नियमानुसारच सामाजिक अंतर, मास्क आणि सॅनिटायझर बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा त्याशिवाय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. शालेय जीवनातून मुक्त होऊन विद्यार्थ्यांनी महाविद्यालय विश्वाला सुरुवात केली असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर देखील आनंद दिसून येत होता. तर महाविद्यालयाचा परिसर आठ महिन्यानंतर गजबजून गेला आहे.

महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी

कोरोना काळात विद्यार्थ्यांची काळजी महाविद्यालयाकडून घेतली जात आहे. येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सॅनिटायझर बंधनकारक केले असून तोंडावर मास्क आणि सामाजिक अंतराचे बंधन घालण्यात आले आहे. तसेच एका बेंचवर एकाच विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. वर्ग संपल्यानंतर पुन्हा त्या वर्गाचे डायजेशन महाविद्यालयाकडून केले जात आहे.

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षणाचा फायदा

कोरोनामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाकडे लक्ष द्यावे लागत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्या जाणवत होत्या. विद्यार्थ्यांची आकलन शक्ती कमजोर होत असल्याचे समोर आले होते. मात्र शासनाच्या नियमानुसार प्रत्यक्षात वर्गात उपस्थित राहून तास सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. असे अनेक विद्यार्थ्यांनी बोलून दाखवले.

कोल्हापूर - कोरोनासारख्या महाभयंकर संकटाला तोंड देत अखेर महाविद्यालयचा परिसर पुन्हा एकदा गजबजू लागला आहे. गुरुवारपासून कोल्हापुरातील अकरावीचे वर्ग सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सध्या महाविद्यालयात सर्व नियमांचे पालन करून पन्नास टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून येत आहे.

कोल्हापूर - अकरावीचे वर्ग फुलले, कोरोनानंतर तब्बल आठ महिन्यांनी परिसर गजबजला
शालेय जीवनातून मुक्त होऊन महाविद्यालय विश्वामध्ये पहिलं पाऊल टाकत विद्यार्थ्यांची अखेर नव्या शैक्षणिक पर्वाला सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे सर्वच संकटात असताना राज्य शासनाच्या मार्गदर्शक नियमानुसार कोल्हापुरातील अकरावीचे वर्ग सुरू झाले आहेत. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने दिलेल्या सूचनेनुसार शहरातील कनिष्ट महाविद्यालयाने गुरुवारपासून अकरावीचे वर्ग सुरू केले आहेत. पहिल्या फेरीत जवळपास चार हजार प्रवेश विद्यार्थ्यांनी घेतले असून कला, वाणिज्य या शाखेतील महाविद्यालय सकाळी साडेसात ते साडेदहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर विज्ञान शाखेचे वर्ग सकाळी अकरा वाजल्यानंतर भरवण्यात येणार आहेत. १५ डिसेंबर पर्यंत उर्वरित प्रवेश प्रकिया पूर्ण करून टप्प्या टप्प्याने पूर्ण क्षमतेने महाविद्यालय सुरू होणार आहे.

एक दिवसाआड 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती महाविद्यालयात असणार आहे. महाविद्यालयांकडून शासनाच्या नियमानुसारच सामाजिक अंतर, मास्क आणि सॅनिटायझर बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा त्याशिवाय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. शालेय जीवनातून मुक्त होऊन विद्यार्थ्यांनी महाविद्यालय विश्वाला सुरुवात केली असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर देखील आनंद दिसून येत होता. तर महाविद्यालयाचा परिसर आठ महिन्यानंतर गजबजून गेला आहे.

महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी

कोरोना काळात विद्यार्थ्यांची काळजी महाविद्यालयाकडून घेतली जात आहे. येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सॅनिटायझर बंधनकारक केले असून तोंडावर मास्क आणि सामाजिक अंतराचे बंधन घालण्यात आले आहे. तसेच एका बेंचवर एकाच विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. वर्ग संपल्यानंतर पुन्हा त्या वर्गाचे डायजेशन महाविद्यालयाकडून केले जात आहे.

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षणाचा फायदा

कोरोनामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाकडे लक्ष द्यावे लागत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्या जाणवत होत्या. विद्यार्थ्यांची आकलन शक्ती कमजोर होत असल्याचे समोर आले होते. मात्र शासनाच्या नियमानुसार प्रत्यक्षात वर्गात उपस्थित राहून तास सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. असे अनेक विद्यार्थ्यांनी बोलून दाखवले.

Last Updated : Dec 11, 2020, 4:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.