ETV Bharat / city

अकरावीचे प्रवेश होणार कधी? विद्यार्थ्यांसह शिक्षकही संभ्रमात

author img

By

Published : Aug 7, 2021, 8:08 AM IST

दहावीचा निकाल लागल्यावर गुणपत्रक आणि शाळेचा दाखला मिळेल. महाविद्यालयात प्रवेश मिळून पुढील प्रक्रिया सुरू होईल असा विश्वास व्यक्त केला जात होता. मात्र, ऑनलाइन निकाल लावून विद्यार्थ्यांचे गुण जाहीर करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात गुणपत्रक देण्यात आले नाहीत. परिणामी शाळांनी दाखला देखील दिला नाही.

When will eleventh admission? Teachers and students confused
अकरावीचे प्रवेश होणार कधी?

औरंगाबाद - दहावीचा निकाल लागून 20 दिवस झाले असले तरी अद्याप अकरावीच्या प्रवेशाबाबत निर्णय झालेला नाही. त्यात सीईटीबाबत शासनाचे धोरण अस्पष्ट असल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे ऑनलाइन निकाल लावून फायदा काय? असा प्रश्न शिक्षक आणि पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

अकरावीचे प्रवेश होणार कधी? विद्यार्थ्यांसह शिक्षकही संभ्रमात

सीईटी बाबत संभ्रम -

16 जुलै रोजी दहावीचा निकाल लावण्यात आला. ऑनलाईन पद्धतीने निकाल लावत असताना अनेक त्रुटी त्यावेळी दिसून आल्या. मात्र, आधीच दीड वर्ष कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याने लागलेल्या निकालानंतर पुढील प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरु होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु, अकरावीत प्रवेश घेत असताना सीईटी घेण्याचा निर्णय शासनाने घेतला. यामध्ये विद्यार्थ्यांना सीईटीचा अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली होती, असे असले तरी सर्व विद्यार्थ्यांना सीईटी बंधनकारक नसल्याचे सांगण्यात आले. ज्यामध्ये महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल, असे सांगण्यात आल्याने आपल्या आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल का? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. याबाबत विद्यार्थी विचारणा करत असल्याची माहिती वंदे मातरम शाळेचे मुख्याध्यापक वाल्मिक सुरवसे यांनी दिली आहे.

गुणपत्रक नसल्याने दाखला मिळेना -

दहावीचा निकाल लागल्यावर गुणपत्रक आणि शाळेचा दाखला मिळेल. महाविद्यालयात प्रवेश मिळून पुढील प्रक्रिया सुरू होईल असा विश्वास व्यक्त केला जात होता. मात्र, ऑनलाइन निकाल लावून विद्यार्थ्यांचे गुण जाहीर करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात गुणपत्रक देण्यात आले नाही. परिणामी शाळांनी दाखला देखील दिला नाही. मिळालेल्या गुणपत्रिकेचा क्रमांक दाखल्यावर टाकणे बंधनकारक आहे. त्यामुळे गुणपत्रक मिळाल्याशिवाय दाखला देणे शक्य नाही. त्यात आता नऊ ऑगस्ट रोजी गुणपत्रक मिळतील असे बोर्डाने सांगितले आहे. गुणपत्रक वेळेवर दिले तरी शाळा सोडण्याचा दाखला तयार करण्यासाठी वेळ लागेल. त्यानंतर सीईटी होईल असा क्रम पाहता विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश विलंब होईल, अशी शक्यता वाल्मिक सुरवसे यांनी वर्तवली आहे.

हेही वाचा - 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याचा प्रयत्न; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

औरंगाबाद - दहावीचा निकाल लागून 20 दिवस झाले असले तरी अद्याप अकरावीच्या प्रवेशाबाबत निर्णय झालेला नाही. त्यात सीईटीबाबत शासनाचे धोरण अस्पष्ट असल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे ऑनलाइन निकाल लावून फायदा काय? असा प्रश्न शिक्षक आणि पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

अकरावीचे प्रवेश होणार कधी? विद्यार्थ्यांसह शिक्षकही संभ्रमात

सीईटी बाबत संभ्रम -

16 जुलै रोजी दहावीचा निकाल लावण्यात आला. ऑनलाईन पद्धतीने निकाल लावत असताना अनेक त्रुटी त्यावेळी दिसून आल्या. मात्र, आधीच दीड वर्ष कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याने लागलेल्या निकालानंतर पुढील प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरु होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु, अकरावीत प्रवेश घेत असताना सीईटी घेण्याचा निर्णय शासनाने घेतला. यामध्ये विद्यार्थ्यांना सीईटीचा अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली होती, असे असले तरी सर्व विद्यार्थ्यांना सीईटी बंधनकारक नसल्याचे सांगण्यात आले. ज्यामध्ये महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल, असे सांगण्यात आल्याने आपल्या आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल का? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. याबाबत विद्यार्थी विचारणा करत असल्याची माहिती वंदे मातरम शाळेचे मुख्याध्यापक वाल्मिक सुरवसे यांनी दिली आहे.

गुणपत्रक नसल्याने दाखला मिळेना -

दहावीचा निकाल लागल्यावर गुणपत्रक आणि शाळेचा दाखला मिळेल. महाविद्यालयात प्रवेश मिळून पुढील प्रक्रिया सुरू होईल असा विश्वास व्यक्त केला जात होता. मात्र, ऑनलाइन निकाल लावून विद्यार्थ्यांचे गुण जाहीर करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात गुणपत्रक देण्यात आले नाही. परिणामी शाळांनी दाखला देखील दिला नाही. मिळालेल्या गुणपत्रिकेचा क्रमांक दाखल्यावर टाकणे बंधनकारक आहे. त्यामुळे गुणपत्रक मिळाल्याशिवाय दाखला देणे शक्य नाही. त्यात आता नऊ ऑगस्ट रोजी गुणपत्रक मिळतील असे बोर्डाने सांगितले आहे. गुणपत्रक वेळेवर दिले तरी शाळा सोडण्याचा दाखला तयार करण्यासाठी वेळ लागेल. त्यानंतर सीईटी होईल असा क्रम पाहता विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश विलंब होईल, अशी शक्यता वाल्मिक सुरवसे यांनी वर्तवली आहे.

हेही वाचा - 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याचा प्रयत्न; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.