औरंगाबाद - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंध हळूहळू हटवण्यात येत आहेत. असे असले तरी पर्यटन व्यवसाय अद्याप सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे पर्यटन व्यवसायावर आधारित व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पर्यटन व्यवसाय सुरू होत नसल्याने सरकार विराधात व्यावसायिकांनी ऑनलाईन पद्धतीने निषेध नोंदवला आहे.
कोरोनामुळे मागील नऊ महिन्यांपासून देशात लावण्यात आलेले निर्बंध हळूहळू उठवण्यात आले. त्यात सर्वात उशिरा पर्यटन उद्योगाला परवानगी मिळाली आहे. ताजमहल सुरू झाल्यावर महाराष्ट्रात असलेले मुंबई येथील एलिफंटा कॅव्हस सुरू करण्यात आल्या आहेत. रायगड येथील किल्ला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सुरू करण्यात आला. मात्र पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील जगातील मान्यता असलेले अजिंठा व वेरूळसारखे पर्यटन स्थळच का बंद आहेत? असा प्रश्न पर्यटन व्यावसायिकांनी उपस्थित केला.
औरंगाबादचे जागतिक पर्यटनस्थळ उघडा; व्यावसायिकांची सरकारविरोधात ऑनलाईन निदर्शने - Tourism industry issue in Aurangabad
रायगड येथील किल्ला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सुरू करण्यात आला. मात्र पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील जगातील मान्यता असलेले अजिंठा व वेरूळसारखे पर्यटन स्थळच का बंद आहेत? असा प्रश्न पर्यटन व्यवसायिकांनी उपस्थित केला.
![औरंगाबादचे जागतिक पर्यटनस्थळ उघडा; व्यावसायिकांची सरकारविरोधात ऑनलाईन निदर्शने व्यावसायिक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9687176-1058-9687176-1606486871804.jpg?imwidth=3840)
औरंगाबाद - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंध हळूहळू हटवण्यात येत आहेत. असे असले तरी पर्यटन व्यवसाय अद्याप सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे पर्यटन व्यवसायावर आधारित व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पर्यटन व्यवसाय सुरू होत नसल्याने सरकार विराधात व्यावसायिकांनी ऑनलाईन पद्धतीने निषेध नोंदवला आहे.
कोरोनामुळे मागील नऊ महिन्यांपासून देशात लावण्यात आलेले निर्बंध हळूहळू उठवण्यात आले. त्यात सर्वात उशिरा पर्यटन उद्योगाला परवानगी मिळाली आहे. ताजमहल सुरू झाल्यावर महाराष्ट्रात असलेले मुंबई येथील एलिफंटा कॅव्हस सुरू करण्यात आल्या आहेत. रायगड येथील किल्ला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सुरू करण्यात आला. मात्र पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील जगातील मान्यता असलेले अजिंठा व वेरूळसारखे पर्यटन स्थळच का बंद आहेत? असा प्रश्न पर्यटन व्यावसायिकांनी उपस्थित केला.