ETV Bharat / city

औरंगाबादेतील ऑरीक सिटी प्रकल्पामुळे अनेकांना रोजगाराची संधी - पंतप्रधान

राज्यातील बचतगटांतील जवळपास एक लाख महिलांचा मेळावा औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ऑरीक सिटीचे उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आले.

author img

By

Published : Sep 7, 2019, 9:43 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी

औरंगाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑरीकच्या महत्त्वाच्या इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी मोदी म्हणाले की, औरंगाबादेत अनेक व्यवस्थांची सुरुवात होऊन स्मार्ट शहर होत आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी औरंगाबादेत काम करायला सुरुवात केली असून या माध्यमातून लाखो युवकांना रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. राज्यातील बचतगटांतील जवळपास एक लाख महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी ऑरीक सिटीचे उद्धाटन केले.

ऑरीक सिटी प्रकल्पामुळे अनेकांना रोजगाराची संधी

हेही वाचा - 2022 पर्यंत देशातील गरिबांना पक्की घरे देणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी

कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, सुभाष देसाई, हरिभाऊ बागडे, दादा भुसे, अतुल सावे, एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांनी महिलांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. ते म्हणाले की, धुरात जीवन घालणाऱ्या बहिणींना मुक्त करण्यासाठी उज्वला योजना राबवण्यात आली. यामध्ये पाच कोटी गॅस वितरित करण्याचे उद्दिष्ठ होते. त्यानंतर ते आठ कोटी झाले. परंतु, मला आनंद आहे की, सरकारने 100 दिवसाच्या आत उद्दिष्ठ पूर्ण केले. तसेच येणाऱ्या पाच वर्षात साडेतीन लाख कोटी रुपये पाण्याच्या अभियानात खर्च केले जाणार आहेत.

औरंगाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑरीकच्या महत्त्वाच्या इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी मोदी म्हणाले की, औरंगाबादेत अनेक व्यवस्थांची सुरुवात होऊन स्मार्ट शहर होत आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी औरंगाबादेत काम करायला सुरुवात केली असून या माध्यमातून लाखो युवकांना रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. राज्यातील बचतगटांतील जवळपास एक लाख महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी ऑरीक सिटीचे उद्धाटन केले.

ऑरीक सिटी प्रकल्पामुळे अनेकांना रोजगाराची संधी

हेही वाचा - 2022 पर्यंत देशातील गरिबांना पक्की घरे देणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी

कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, सुभाष देसाई, हरिभाऊ बागडे, दादा भुसे, अतुल सावे, एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांनी महिलांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. ते म्हणाले की, धुरात जीवन घालणाऱ्या बहिणींना मुक्त करण्यासाठी उज्वला योजना राबवण्यात आली. यामध्ये पाच कोटी गॅस वितरित करण्याचे उद्दिष्ठ होते. त्यानंतर ते आठ कोटी झाले. परंतु, मला आनंद आहे की, सरकारने 100 दिवसाच्या आत उद्दिष्ठ पूर्ण केले. तसेच येणाऱ्या पाच वर्षात साडेतीन लाख कोटी रुपये पाण्याच्या अभियानात खर्च केले जाणार आहेत.

Intro:ऑरीकच्या महत्वाच्या इमारतीचे उदघाटन केले, आता औरंजगाबादेत अनेक व्यवस्थांची सुरुवात होऊन स्मार्ट शहर होत आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी औरंगाबादेत काम करायला सुरुवात केली असून या माध्यमातून लाखो युवकांना रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. Body:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते औरंगाबादेत ऑरीक सिटीच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं उदघाटन करण्यात आलं. त्याच बरोबर राज्यातील बचतगटांच्या जवळपास एक लाख महिलांचा मेळावा देखील या निमित्ताने घेण्यात आला. या मेळाव्यात पाच महिलांना मोफत उज्वला गैस देऊन सरकारने आठ कोटी महिलांना गॅस देण्याचं उद्दिष्ठ गाठल्याच नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, सुभाष देसाई, हरिभाऊ बागडे, दादा भुसे ,अतुल सावे, एकनाथ शिंदे उपस्थित होते.Conclusion:माझ्या सर्व माता भगिनींना माझा नमस्कार, महालक्ष्मी विसर्जन असताना आलात त्याबद्दल धन्यवाद म्हणत मोदींनी केली भाषणाला सुरुवात केली. धुरात जीवन उद्धवस्त करणाऱ्या बहिणींना मुक्त करण्यासाठी पाहिले पाच कोटींचे उद्धिष्ट होते त्यानंतर ते आठ कोटी झाले.
मला आनंद आहे सरकार येऊन 100 दिवस होण्याआधी आमचं उद्दिष्ठ पूर्ण झालं. अस मोदी म्हणाले. पाण्यामुळे अनेक महिलांना त्रास होतोय याची जाणीव असल्याने जल जीवन योजना सुरू केली आहे. येणाऱ्या पाच वर्षात साडेतीन लाख करोड रुपये पाण्याच्या अभियानात खर्च केले जाणार असल्याचं मोदी यांनी मेळाव्यात सांगितलं.
समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांनी 70 च्या कालखंडात सांगितलं होतं महिलांच्या दोन समस्या आहेत, त्या म्हणजे शौचालय आणि पाणी, या दोन समस्या मिटल्या तर महिला सक्षम होतील. ते गेले, त्यानंतर अनेक आले आणि गेले मात्र काही झालं नाही मात्र आम्ही ते करत असल्याच मोदी म्हणाले. मराठवाड्यात तयार केली जाणारी वॉटर ग्रीड प्रशंसनीय असल्याचं कौतुक मोदींनी केलं. गावागावात वीज देणे, गॅस देणे असे काम वेळेच्या आधी झालेत, 2022 पर्यंत आमचे संकल्प पूर्ण होणार, गरिबांना त्यांचं छत देण्याच उद्दिष्ठ पूर्ण होणार असून कमीत कमी वेळात कमी पैसे लावून चांगली सुविधा देणे हे आमचं लक्ष, आम्ही स्थानिक लोकांना लक्षात घेऊन घर देण्याची योजना दिली असल्याचं मोदींनी जाहीर कार्यक्रमात सांगितलं.
Byte -
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.