ETV Bharat / city

'यांची कोरोनासोबत बैठक झालीय का?'

author img

By

Published : Mar 9, 2021, 12:31 PM IST

निर्णय घेताना लोकप्रतिनिधींना का विचारात घेतले नाही. आम्हाला इतकी अक्कल नसेल, मात्र घेतलेले निर्णय कसे बरोबर आहेत हे तरी समजून सांगायला हवं अशी टीका त्यांनी केली.

इम्तियाज जलील यांनी या निर्णयावर टीका केली आहे
इम्तियाज जलील यांनी या निर्णयावर टीका केली आहे

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये अंशतः लॉकडाऊन लावण्यासंदर्भात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतलेल्या निर्णयावर खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे. कोरोना सोबत यांची बैठक झाली आहे का? की त्यांनी सांगितलं की मी फक्त शनिवार आणि रविवार नागरिकांना त्रास देणार आहे आणि इतर दिवशी नाही अशा शब्दांत जलील यांनी या निर्णयावर टीका केली आहे.

इम्तियाज जलील यांनी या निर्णयावर टीका केली आहे

लोकप्रतिनिधींना विचारात का घेतले नाही

निर्णय घेताना लोकप्रतिनिधींना का विचारात घेतले नाही. आम्हाला इतकी अक्कल नसेल, मात्र घेतलेले निर्णय कसे बरोबर आहेत हे तरी समजून सांगायला हवं अशी टीका त्यांनी केली. नियोजित विवाह रद्द करायला कसं सांगू शकता. नोंदणी पद्धतीने लग्न करायला एक महिना आधी नोंदणी करावी लागते. हे जिल्हाधिकाऱ्यांना माहीती नाही का? लग्न म्हणजे मुला-मुलींच्या आई वडिलांचे वेगळे स्वप्न असते याची जाणीव ठेवायला हवी होती. तुम्ही काही निर्बंध घालायला हवे होते. मंगल कार्यालयासमोर पोलीस नेमून पाहणी करून नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करणे असे उपाय शक्य झाले असते. मात्र तसे का केलं नाही असा प्रश्न इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला.

जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला निर्णय

शहरातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी 11 मार्च ते 4 एप्रिल याकाळात अंशतः लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. यात शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, घाटी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ नीता पाडळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी यांच्या झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.
चार एप्रिल पर्यंत पर्यटन स्थळ राहणार बंद
औरंगाबाद जिल्हा पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखला जातो. पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला. त्याआधी जिल्ह्यातील पर्यटन स्थळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. चार महिन्यांआधी पर्यटन स्थळ पुन्हा सुरू करण्यात आली होती. मात्र कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने चार एप्रिलपर्यंत पुन्हा पर्यटन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच बरोबर धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांना मान्यता असणार नाही, त्यामुळे कुणीही मोर्चे, आंदोलन करू नये असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत.
भाजी मंडई राहणार सात दिवस बंद
शहरातील गर्दीचे ठिकाण कोरोना वाढीसाठी कारणीभूत असल्याचं दिसून येत आहे. विशेषतः भाजी मार्केटमध्ये गर्दी वाढत असून तिथे कोणीही कोविड नियमांचं पालन करताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर 11 मार्च ते 17 मार्च या कालावधीत जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजी मंडई बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरात अपुरी बेड व्यवस्था?
औरंगाबाद शहरात जवळपास 2250 बेड कोरोना रुग्णांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. त्यापैकी अवघे नऊशे बेड रिक्त राहिले आहेत. त्यात रोज किमान 450 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत आहे. रविवारी रात्री पर्यंत 3218 ऍक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाचे वाढते रुग्ण बघता बेड अपुरे पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा - औरंगाबाद जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊन, लग्न-समारंभांवर बंदी

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये अंशतः लॉकडाऊन लावण्यासंदर्भात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतलेल्या निर्णयावर खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे. कोरोना सोबत यांची बैठक झाली आहे का? की त्यांनी सांगितलं की मी फक्त शनिवार आणि रविवार नागरिकांना त्रास देणार आहे आणि इतर दिवशी नाही अशा शब्दांत जलील यांनी या निर्णयावर टीका केली आहे.

इम्तियाज जलील यांनी या निर्णयावर टीका केली आहे

लोकप्रतिनिधींना विचारात का घेतले नाही

निर्णय घेताना लोकप्रतिनिधींना का विचारात घेतले नाही. आम्हाला इतकी अक्कल नसेल, मात्र घेतलेले निर्णय कसे बरोबर आहेत हे तरी समजून सांगायला हवं अशी टीका त्यांनी केली. नियोजित विवाह रद्द करायला कसं सांगू शकता. नोंदणी पद्धतीने लग्न करायला एक महिना आधी नोंदणी करावी लागते. हे जिल्हाधिकाऱ्यांना माहीती नाही का? लग्न म्हणजे मुला-मुलींच्या आई वडिलांचे वेगळे स्वप्न असते याची जाणीव ठेवायला हवी होती. तुम्ही काही निर्बंध घालायला हवे होते. मंगल कार्यालयासमोर पोलीस नेमून पाहणी करून नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करणे असे उपाय शक्य झाले असते. मात्र तसे का केलं नाही असा प्रश्न इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला.

जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला निर्णय

शहरातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी 11 मार्च ते 4 एप्रिल याकाळात अंशतः लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. यात शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, घाटी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ नीता पाडळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी यांच्या झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.
चार एप्रिल पर्यंत पर्यटन स्थळ राहणार बंद
औरंगाबाद जिल्हा पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखला जातो. पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला. त्याआधी जिल्ह्यातील पर्यटन स्थळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. चार महिन्यांआधी पर्यटन स्थळ पुन्हा सुरू करण्यात आली होती. मात्र कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने चार एप्रिलपर्यंत पुन्हा पर्यटन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच बरोबर धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांना मान्यता असणार नाही, त्यामुळे कुणीही मोर्चे, आंदोलन करू नये असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत.
भाजी मंडई राहणार सात दिवस बंद
शहरातील गर्दीचे ठिकाण कोरोना वाढीसाठी कारणीभूत असल्याचं दिसून येत आहे. विशेषतः भाजी मार्केटमध्ये गर्दी वाढत असून तिथे कोणीही कोविड नियमांचं पालन करताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर 11 मार्च ते 17 मार्च या कालावधीत जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजी मंडई बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरात अपुरी बेड व्यवस्था?
औरंगाबाद शहरात जवळपास 2250 बेड कोरोना रुग्णांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. त्यापैकी अवघे नऊशे बेड रिक्त राहिले आहेत. त्यात रोज किमान 450 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत आहे. रविवारी रात्री पर्यंत 3218 ऍक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाचे वाढते रुग्ण बघता बेड अपुरे पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा - औरंगाबाद जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊन, लग्न-समारंभांवर बंदी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.