औरंगाबाद - आझादी का अमृत महोत्सव ( Azadi Ka Amrit Mahotsav ) साजरा करत असताना बिडकीन येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी ३७५ मीटर लांब तिरंगा हातात घेत प्रभात फेरी काढली. गावात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती ( Awareness students about Tricolor ) करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती शाळेतर्फे देण्यात आली.
हर घर तिरंगा साठी जनजागृती.. सरकार तर्फे हर घर तिरंगा मोहीम ( Har Ghar Tricolor Campaign ) राबवण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील शाळांना विविध उपक्रम राबवण्याचा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. या मोहीम अंतर्गत बिडकीन येथील किलबिल बालक मंदिर, एचपीसी शाळेने अनोखा उपक्रम राबवला. या उपक्रमात गावात हरघर तिरंगा उपक्रम बाबत जनजागृती करण्यासाठी दीड हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी ३७५ मीटर लांब तिरंगा हातात घेऊन प्रभात फेरी काढली. यासाठी चार दिवस तयारी करण्यात आली. ११ ते १६ ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर ध्वज लावण्याबाबत जनजागृती केल्याची माहिती प्राचार्य एस. एस जाधव, मुख्याध्यापक दीपक मोरे यांनी दिली.