ETV Bharat / city

वडाळी स्मशानभूमीकडे पालिकेचे दुर्लक्ष; स्वच्छतेसाठी नागरिकांचा पुढाकार - citizens cleaned shrub in crematorium

वडाळी स्मशानभूमीतील वाढलेल्या झुडुपांसदर्भात महापालिकेकडे तक्रार करुनही दखल घेतली गेली नव्हती. अखेर नागरिकांनी स्वखर्चाने वडाळी स्मशानभूमीतील गाजर गवत, झुडूप काढण्यास सुरुवात केली आहे. पालिका प्रशासनाला वडाळी स्मशानभूमीची स्वच्छता करण्याची जबाबदारी वाटत नसेल, मात्र आम्ही स्वच्छता करत आहोत, असे नागरिकांनी म्हटले आहे.

crematorium cleaned by citizens
अमरावतीत नागरिकांकडून स्मशानभूमीची स्वच्छता
author img

By

Published : Sep 13, 2020, 6:15 PM IST

Updated : Sep 13, 2020, 6:33 PM IST

अमरावती - शहरातील वडाळी स्मशानभूमीतील वाढलेली झुडूपे हटवण्यासंदर्भात महापालिकेकडे नागरिकांनी तक्रार केली होती. पालिका प्रशासनाने या संदर्भात दखल न घेतल्याने अखेर नागरिकांनीच पुढाकार घेत स्मशानभूमीचा परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहे. नागरिक स्वखर्चाने हे काम करत आहेत.

अमरावतीत नागरिकांकडून स्मशानभूमीची स्वच्छता

मागील चार महिन्यांपासून वडाळी स्मशानभूमीत सर्वत्र झुडूपं वाढलेली आहेत. स्मशानभूमीतील गवत आणि झुडूप साफ करण्यासाठी परिसरातील स्वच्छता निरीक्षकास वारंवार सांगूनही काहीही उपयोग होत नसल्याने नागरिकांनी थेट महापालिका आयुक्तांकडे तक्रार दिली. मात्र, यासंदर्भात काहीच कारवाई झाली नाही.

हेही वाचा-अभिनेता अल्लू अर्जुन पर्यटनासाठी टिपेश्वर अभयारण्यात

चार महिन्यांत या स्मशानभूमीत वडाळी, राहुल नगर, बिच्चू टेकडी, राज्य राखीव पोलीस दल वसाहत अशा विविध भागातील जवळपास 55 ते 60 मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यापैकी वडाळी परिसरातील एखाद्या मृत व्यक्तीचे अंत्यविधी सुरू तिथे आलेल्या अनेक नागरिकांनी तिथली झुडूपं काढण्याचा प्रयत्न केला होता.

महापालिका प्रशासन दाखल घेत नसल्याने वडाळी परिसरातील रहिवासी असणारे शहराचे माजी महापौर अशोक डोंगरे यांच्या पुढाकाराने आता मजूर लावून स्मशानाला झुडुपांपासून मुक्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमात वडाळी परिसरातील सतीश प्रेमालवार, सोमेश्वर मुंजाळे, रंगराब शेंडे आदी नागरिक सहभागी झाले आहेत.

अमरावती - शहरातील वडाळी स्मशानभूमीतील वाढलेली झुडूपे हटवण्यासंदर्भात महापालिकेकडे नागरिकांनी तक्रार केली होती. पालिका प्रशासनाने या संदर्भात दखल न घेतल्याने अखेर नागरिकांनीच पुढाकार घेत स्मशानभूमीचा परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहे. नागरिक स्वखर्चाने हे काम करत आहेत.

अमरावतीत नागरिकांकडून स्मशानभूमीची स्वच्छता

मागील चार महिन्यांपासून वडाळी स्मशानभूमीत सर्वत्र झुडूपं वाढलेली आहेत. स्मशानभूमीतील गवत आणि झुडूप साफ करण्यासाठी परिसरातील स्वच्छता निरीक्षकास वारंवार सांगूनही काहीही उपयोग होत नसल्याने नागरिकांनी थेट महापालिका आयुक्तांकडे तक्रार दिली. मात्र, यासंदर्भात काहीच कारवाई झाली नाही.

हेही वाचा-अभिनेता अल्लू अर्जुन पर्यटनासाठी टिपेश्वर अभयारण्यात

चार महिन्यांत या स्मशानभूमीत वडाळी, राहुल नगर, बिच्चू टेकडी, राज्य राखीव पोलीस दल वसाहत अशा विविध भागातील जवळपास 55 ते 60 मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यापैकी वडाळी परिसरातील एखाद्या मृत व्यक्तीचे अंत्यविधी सुरू तिथे आलेल्या अनेक नागरिकांनी तिथली झुडूपं काढण्याचा प्रयत्न केला होता.

महापालिका प्रशासन दाखल घेत नसल्याने वडाळी परिसरातील रहिवासी असणारे शहराचे माजी महापौर अशोक डोंगरे यांच्या पुढाकाराने आता मजूर लावून स्मशानाला झुडुपांपासून मुक्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमात वडाळी परिसरातील सतीश प्रेमालवार, सोमेश्वर मुंजाळे, रंगराब शेंडे आदी नागरिक सहभागी झाले आहेत.

Last Updated : Sep 13, 2020, 6:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.