ETV Bharat / city

Amravati wet drought : ओल्या दुष्काळासाठी अमरावतीत काँग्रेस आक्रमक; आमदार एकवटले - अमरावती ग्रामीण काँग्रेस आक्रमक

जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा ( Demand to declare wet drought in amravati ) या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक झाली असून कार्यकर्ते जिल्हा कचेरीवर धडकले होते. त्यामुळे झालेल्या नुकसानाचे त्वरित पंचनामा करून ( panchanamas of damage due to heavy rain ) नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी केली. प्रशासनाकडून कार्यवाही झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई तातडीने देण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा बबलू देशमुख यांनी दिला आहे. ( Amravati Rural Congress Aggressive )

Amravati wet drought
अमरावती
author img

By

Published : Sep 16, 2022, 10:21 AM IST

अमरावती : जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी ( Demand to declare wet drought in amravati ) काँग्रेस आक्रमक झाली असून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे ( panchanamas of damage due to heavy rain ) व भरपाईसाठी जिल्हा ग्रामीण काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत गुरुवारी माजी मंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे व माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वखाली कार्यकर्ते जिल्हा कचेरीवर धडकले होते. ( Amravati Rural Congress Aggressive )

झालेल्या नुकसानाचा त्वरित पंचनामा व्हावा : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तूर, सोयाबीन, कापूस, मूग, उडीद या पिकांचे व संत्रा फळबागांचे प्रंचड नुकसान झाले आहे. नदी व नाल्यांचे प्रवाह बदलल्यामुळे शेतात पाणी घुसल्याने जमीन खरडून निघाली आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानाचे त्वरित पंचनामा करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत मिळवून द्यावी व अमरावती जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावे. चांदूरबाजार तालुक्यातील तळेगाव मोहना आणि आसेगाव मंडळांतर्गत येणार्या गावांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवले आहे. दोन्ही मंडळांत पर्जन्यमापक यंत्र बंद असल्याचे उघड झाले. या प्रकरणाची देखील चौकशी व्हावी, अशी मागणी माजी मंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे यांनी केली आहे.



विनाविलंब मदत जाहीर कराण्याची मागणी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिकांची स्थिती अतिशय खराब झाली आहे. असे असतानाही राज्यशासन याकडे दुर्लक्ष करीत आहेत. शेतकरी संकटात असल्याने चिंतेत पडला आहे. त्यामुळे शासनाने शेतकर्यांना तत्काळ आर्थिक मदत करावी व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे.


अन्यथा तीव्र आंदोलन- बबलू देशमुख : गत दोन महिन्यांपासून जिल्ह्यात अतिवृष्टीने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या संपूर्ण पिकाचे नुकसान झालेले आहे. अशा परिस्थितीत हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक नुकसानाची भरपाई गरजेची आहे, परंतु अद्यापही प्रशासनाकडून कार्यवाही झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई तातडीने देण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा बबलू देशमुख यांनी दिला आहे. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे, हरिभाऊ मोहोड, जयंत देशमुख, गणेश आरेकर, नितीन गोंडाणे, पंकज मोरे, वैभव वानखेडे,सागर कलाने, वैकुंठ देशमुख, श्या प्रजापती, नीलेश गुहे, पंकज विध डॉ. काशीकर, सुरेश लंगोटे, सदाशि खापरे, राजेंद्र खापरे, जयकुमार निकम आदी उपस्थित होते.

अमरावती : जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी ( Demand to declare wet drought in amravati ) काँग्रेस आक्रमक झाली असून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे ( panchanamas of damage due to heavy rain ) व भरपाईसाठी जिल्हा ग्रामीण काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत गुरुवारी माजी मंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे व माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वखाली कार्यकर्ते जिल्हा कचेरीवर धडकले होते. ( Amravati Rural Congress Aggressive )

झालेल्या नुकसानाचा त्वरित पंचनामा व्हावा : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तूर, सोयाबीन, कापूस, मूग, उडीद या पिकांचे व संत्रा फळबागांचे प्रंचड नुकसान झाले आहे. नदी व नाल्यांचे प्रवाह बदलल्यामुळे शेतात पाणी घुसल्याने जमीन खरडून निघाली आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानाचे त्वरित पंचनामा करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत मिळवून द्यावी व अमरावती जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावे. चांदूरबाजार तालुक्यातील तळेगाव मोहना आणि आसेगाव मंडळांतर्गत येणार्या गावांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवले आहे. दोन्ही मंडळांत पर्जन्यमापक यंत्र बंद असल्याचे उघड झाले. या प्रकरणाची देखील चौकशी व्हावी, अशी मागणी माजी मंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे यांनी केली आहे.



विनाविलंब मदत जाहीर कराण्याची मागणी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिकांची स्थिती अतिशय खराब झाली आहे. असे असतानाही राज्यशासन याकडे दुर्लक्ष करीत आहेत. शेतकरी संकटात असल्याने चिंतेत पडला आहे. त्यामुळे शासनाने शेतकर्यांना तत्काळ आर्थिक मदत करावी व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे.


अन्यथा तीव्र आंदोलन- बबलू देशमुख : गत दोन महिन्यांपासून जिल्ह्यात अतिवृष्टीने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या संपूर्ण पिकाचे नुकसान झालेले आहे. अशा परिस्थितीत हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक नुकसानाची भरपाई गरजेची आहे, परंतु अद्यापही प्रशासनाकडून कार्यवाही झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई तातडीने देण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा बबलू देशमुख यांनी दिला आहे. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे, हरिभाऊ मोहोड, जयंत देशमुख, गणेश आरेकर, नितीन गोंडाणे, पंकज मोरे, वैभव वानखेडे,सागर कलाने, वैकुंठ देशमुख, श्या प्रजापती, नीलेश गुहे, पंकज विध डॉ. काशीकर, सुरेश लंगोटे, सदाशि खापरे, राजेंद्र खापरे, जयकुमार निकम आदी उपस्थित होते.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.