ETV Bharat / city

रेड्डीची नागपूरला बदली म्हणजे शाबासकीच; भाजप महिला मोर्चाचा आरोप

author img

By

Published : Mar 29, 2021, 5:05 PM IST

Updated : Mar 29, 2021, 5:14 PM IST

हरिसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जितका जबाबदार उपवनसंरक्षक शिवकुमार आहे तितकाच अपर प्रधान उपवनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी आहे, असा आरोप भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री अश्विनी जिचकार यांनी केला आहे.

BJP Mahila Morcha
भाजप महिला मोर्चा

अमरावती - हरिसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जितका जबाबदार उपवनसंरक्षक शिवकुमार आहे तितकाच अपर प्रधान उपवनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी आहे. दीपाली चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात रेड्डीच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. असे असताना राज्य सरकार रेड्डीची बदली नागपूरला करते. खरंतर रेड्डीची नागपूरला झालेली बदली ही राज्य शासनाकडून मिळालेली शाबासकीच आहे, असा आरोप भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री अश्विनी जिचकार यांनी आज अमरावतीत पत्रकार परिषद घेऊन केला आहे.

प्रतिक्रिया देताना अश्विनी जिचकार

हेही वाचा - मुरूड महिला पोस्टमास्तरची आत्महत्या, दीपाली चव्हाण प्रकरण ताजे असतानाच घडली दुसरी घटना

तिघाडी सरकारमध्ये महिला असुरक्षित

राज्यात असणाऱ्या तिघाडी सरकारच्या कार्यकाळात महिला कुठेही सुरक्षित नाहीत. महिलांच्या सुरक्षेबाबत हे सरकार गंभीर नसल्याचा आरोप अश्विनी जिचकार यांनी केला. प्रशासकीय अधिकाऱ्यांवर या सरकारचा वचक नाही. हे सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे, असे आमचे ठाम मत असून रेड्डी गुन्हेगार असताना त्याला अमरातीतून नागपूरसारख्या शहरात पाठवणे ही कसली शिक्षा? हा कसला न्याय? असा सवाल अश्विनी जिचकार यांनी केला.

राज्यभर आंदोलन

एक महिला अधिकारी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या करते ही अतिशय गंभीर बाब आहे. महिला व बाल विकास मंत्री असणाऱ्या यशोमती ठाकूर यांच्या जिल्ह्यात ही घटना घडते हे त्यापेक्षा गंभीर आहे. हे सरकार रेड्डीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असे स्पष्ट होत असून आम्ही रेड्डी विराधात राज्यभर आंदोलन छेडणार, असा इशाराही अश्विनी जिचकार यांनी दिला.

यांची होती उपस्थिती

पत्रकार परिषदेला अश्विनी जिचकार यांच्यासह नगरसेवक सुरेखा लुंगारे, भाजप शहर अध्यक्ष किरण पातूरकर, शिल्पा पाचघरे, आसावरी देशमुख, लता देशमुख, रश्मी नावंदर आदी उपस्थित होते.

हेही वाचा -'दीपाली चव्हाणने मृत्यूपुर्वी लिहिलेले पत्र नीट वाचा अन् रेड्डीला सहआरोपी करा'

अमरावती - हरिसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जितका जबाबदार उपवनसंरक्षक शिवकुमार आहे तितकाच अपर प्रधान उपवनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी आहे. दीपाली चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात रेड्डीच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. असे असताना राज्य सरकार रेड्डीची बदली नागपूरला करते. खरंतर रेड्डीची नागपूरला झालेली बदली ही राज्य शासनाकडून मिळालेली शाबासकीच आहे, असा आरोप भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री अश्विनी जिचकार यांनी आज अमरावतीत पत्रकार परिषद घेऊन केला आहे.

प्रतिक्रिया देताना अश्विनी जिचकार

हेही वाचा - मुरूड महिला पोस्टमास्तरची आत्महत्या, दीपाली चव्हाण प्रकरण ताजे असतानाच घडली दुसरी घटना

तिघाडी सरकारमध्ये महिला असुरक्षित

राज्यात असणाऱ्या तिघाडी सरकारच्या कार्यकाळात महिला कुठेही सुरक्षित नाहीत. महिलांच्या सुरक्षेबाबत हे सरकार गंभीर नसल्याचा आरोप अश्विनी जिचकार यांनी केला. प्रशासकीय अधिकाऱ्यांवर या सरकारचा वचक नाही. हे सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे, असे आमचे ठाम मत असून रेड्डी गुन्हेगार असताना त्याला अमरातीतून नागपूरसारख्या शहरात पाठवणे ही कसली शिक्षा? हा कसला न्याय? असा सवाल अश्विनी जिचकार यांनी केला.

राज्यभर आंदोलन

एक महिला अधिकारी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या करते ही अतिशय गंभीर बाब आहे. महिला व बाल विकास मंत्री असणाऱ्या यशोमती ठाकूर यांच्या जिल्ह्यात ही घटना घडते हे त्यापेक्षा गंभीर आहे. हे सरकार रेड्डीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असे स्पष्ट होत असून आम्ही रेड्डी विराधात राज्यभर आंदोलन छेडणार, असा इशाराही अश्विनी जिचकार यांनी दिला.

यांची होती उपस्थिती

पत्रकार परिषदेला अश्विनी जिचकार यांच्यासह नगरसेवक सुरेखा लुंगारे, भाजप शहर अध्यक्ष किरण पातूरकर, शिल्पा पाचघरे, आसावरी देशमुख, लता देशमुख, रश्मी नावंदर आदी उपस्थित होते.

हेही वाचा -'दीपाली चव्हाणने मृत्यूपुर्वी लिहिलेले पत्र नीट वाचा अन् रेड्डीला सहआरोपी करा'

Last Updated : Mar 29, 2021, 5:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.