ETV Bharat / city

Protest Against Nupur Sharma : राज्यातील विविध भागात झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर अमरावतीत पोलिसांचा बंदोबस्त

author img

By

Published : Jun 10, 2022, 9:30 PM IST

भारतीय जनता पार्टीच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा ( nupur sharma controversial Statement ) आणि नवीन जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद या देशाच्या विविध भागात उमटत असताना अमरावती शहरात काही भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Protest Against Nupur Sharma
Protest Against Nupur Sharma

अमरावती - भारतीय जनता पार्टीच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा ( nupur sharma controversial Statement ) आणि नवीन जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद या देशाच्या विविध भागात उमटत असताना अमरावती शहरात काही भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अमरावतीत पोलीस बंदोबस्त

राज्य राखीव पोलीस दल तैनात - अमरावती शहरातील चित्रा चौक परीसरात राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. यासह टांगा पाडा परिसरातही पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. एकूण शहरात शांततेचे वातावरण आहे.

सात महिन्यांपूर्वी झाला होता राडा - अमरावती शहरात नोव्हेंबर महिन्यात दोन समुदायात राडा झाल्यामुळे जिल्ह्याचे वातावरण बिघडले होते. त्यावेळी शहरात दहा दिवस संचारबंदी होती. इंटरनेट सेवा सुद्धा बंद होती. आज मात्र पोलीसांनी संवेदनशील परिसरात गस्त वाढवली आहे.

हेही वाचा - Valse Patil On Morcha : शांतता राखा, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मुस्लिम समाजाला आवाहन

अमरावती - भारतीय जनता पार्टीच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा ( nupur sharma controversial Statement ) आणि नवीन जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद या देशाच्या विविध भागात उमटत असताना अमरावती शहरात काही भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अमरावतीत पोलीस बंदोबस्त

राज्य राखीव पोलीस दल तैनात - अमरावती शहरातील चित्रा चौक परीसरात राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. यासह टांगा पाडा परिसरातही पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. एकूण शहरात शांततेचे वातावरण आहे.

सात महिन्यांपूर्वी झाला होता राडा - अमरावती शहरात नोव्हेंबर महिन्यात दोन समुदायात राडा झाल्यामुळे जिल्ह्याचे वातावरण बिघडले होते. त्यावेळी शहरात दहा दिवस संचारबंदी होती. इंटरनेट सेवा सुद्धा बंद होती. आज मात्र पोलीसांनी संवेदनशील परिसरात गस्त वाढवली आहे.

हेही वाचा - Valse Patil On Morcha : शांतता राखा, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मुस्लिम समाजाला आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.