ETV Bharat / city

Amravati Wedding Ceremony : लग्न समारंभात दोन गटात फिल्मी स्टाईल हाणामारी - लग्न समारंभात दोन गटात फिल्मी स्टाईल हाणामारी

मुलीकडील मंडळींनी मुलाकडील मंडळींना लग्न समारंभात मारहाण केली आहे. अंजनगाव तालुक्यातील सातेगाव येथे हा फिल्म स्टाईल धुमधडाका ( brawl between two groups during the wedding ceremony in amravati ) घडला.

A film style brawl between
A film style brawl between
author img

By

Published : Jul 28, 2022, 9:40 PM IST

अमरावती - आई, वडिलांचा विरोध झुगारुन सहा महिन्यापूर्वी एका तरुण-तरुणीने नोंदणी विवाह केला होता. मात्र, गावातील प्रतिष्ठीत नागरिकांनी मध्यस्ती करुन बुधवारी ( 27 जुलै ) साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पडणार होता. पण, तेव्हाच मुलीकडील मंडळींनी मुलाकडील मंडळींना लग्न समारंभात मारहाण केली. तसेच, मुलीला घेऊन गेले. अंजनगाव तालुक्यातील सातेगाव येथे हा फिल्म स्टाईल धुमधडाका घडला. मात्र, मोठ्या नाट्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा शेवट गोड ( brawl between two groups during the wedding ceremony in amravati ) झाला.

असे आहे संपूर्ण प्रकरण - मलकापुर येथील एका घरी मिस्री काम करणाऱ्या तरुणाचे 19 वर्षीय मुलीसोबत सुत जुळलं. जानेवारी महिन्यात त्यांनी 'साथ जियेंगे साथ मरेंगे'च्या आणा भाका खात नोंदणी पध्दतीने विवाह केला. परंतू, सहा महिन्यानंतर त्यांनी घरातून पळून जाऊन सोबत राहण्याचा निर्णय घेत २२ जुलैला सुरत येथे नातेवाईकांच्या घरी रहायला गेले. याबाबतचे वृत्त वाऱ्यासारखे दोन्ही गावात पसरले. दोन्ही गावातील प्रतिष्ठीत नागरिकांनी दोघांच्याही आई-वडिलांची समजूत काढून विवाह लावून देण्याचे ठरवलं. त्याप्रमाणे २७ जुलैला सातेगाव येथे १०० लोकांच्या उपस्थितीत विवाह पार पडला. मात्र, मनात असलेली खदखद मुलीकडील मंडळींना आवरली नाही. क्षुल्लक कारणावरुन त्यांनी नवरदेवासह पाहुणे मंडळींना मारहाण करणे सुरु केले. त्यातच नवरी मुलीला तिच्या नातेवाईकांनी गाडीत घालून लग्नमंडपातून पसार झाले. ही घटना रहीमापुर पोलिसांना कळताच त्यांनी तात्काळ मुलीला परत आणण्याच्या हालचाली सुरु केल्या. तोपर्यंत रहीमापुर पोलीस ठाण्यात दोन्हीकडील नागरिक तक्रार देण्यास गेले.

शेवट झाला गोड - त्यात मुलगी अमरावती येथे पोलीस अधीक्षक कार्यालयात असल्याची बातमी आली अन् नवरदेवाच्या चेहऱ्यावर हास्य आले. रात्री मुलीला अमरावतीवरुन रहीमापुर पोलीस ठाण्यात आणले. दोन्ही कडील तक्रारी मागे घेण्यात आल्या. मुलीला मुलाच्या ताब्यात देण्यात आलं. पोलिसांची या कामात चांगलीच मदत झाली. फिल्मिस्टाईल घडलेल्या घटनेचा शेवटही गोड झाल्याची चर्चा तालूक्यात रंगली आहे.

हेही वाचा - Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहाला सावरकरांचं नाव; वाद पेटणार?

अमरावती - आई, वडिलांचा विरोध झुगारुन सहा महिन्यापूर्वी एका तरुण-तरुणीने नोंदणी विवाह केला होता. मात्र, गावातील प्रतिष्ठीत नागरिकांनी मध्यस्ती करुन बुधवारी ( 27 जुलै ) साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पडणार होता. पण, तेव्हाच मुलीकडील मंडळींनी मुलाकडील मंडळींना लग्न समारंभात मारहाण केली. तसेच, मुलीला घेऊन गेले. अंजनगाव तालुक्यातील सातेगाव येथे हा फिल्म स्टाईल धुमधडाका घडला. मात्र, मोठ्या नाट्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा शेवट गोड ( brawl between two groups during the wedding ceremony in amravati ) झाला.

असे आहे संपूर्ण प्रकरण - मलकापुर येथील एका घरी मिस्री काम करणाऱ्या तरुणाचे 19 वर्षीय मुलीसोबत सुत जुळलं. जानेवारी महिन्यात त्यांनी 'साथ जियेंगे साथ मरेंगे'च्या आणा भाका खात नोंदणी पध्दतीने विवाह केला. परंतू, सहा महिन्यानंतर त्यांनी घरातून पळून जाऊन सोबत राहण्याचा निर्णय घेत २२ जुलैला सुरत येथे नातेवाईकांच्या घरी रहायला गेले. याबाबतचे वृत्त वाऱ्यासारखे दोन्ही गावात पसरले. दोन्ही गावातील प्रतिष्ठीत नागरिकांनी दोघांच्याही आई-वडिलांची समजूत काढून विवाह लावून देण्याचे ठरवलं. त्याप्रमाणे २७ जुलैला सातेगाव येथे १०० लोकांच्या उपस्थितीत विवाह पार पडला. मात्र, मनात असलेली खदखद मुलीकडील मंडळींना आवरली नाही. क्षुल्लक कारणावरुन त्यांनी नवरदेवासह पाहुणे मंडळींना मारहाण करणे सुरु केले. त्यातच नवरी मुलीला तिच्या नातेवाईकांनी गाडीत घालून लग्नमंडपातून पसार झाले. ही घटना रहीमापुर पोलिसांना कळताच त्यांनी तात्काळ मुलीला परत आणण्याच्या हालचाली सुरु केल्या. तोपर्यंत रहीमापुर पोलीस ठाण्यात दोन्हीकडील नागरिक तक्रार देण्यास गेले.

शेवट झाला गोड - त्यात मुलगी अमरावती येथे पोलीस अधीक्षक कार्यालयात असल्याची बातमी आली अन् नवरदेवाच्या चेहऱ्यावर हास्य आले. रात्री मुलीला अमरावतीवरुन रहीमापुर पोलीस ठाण्यात आणले. दोन्ही कडील तक्रारी मागे घेण्यात आल्या. मुलीला मुलाच्या ताब्यात देण्यात आलं. पोलिसांची या कामात चांगलीच मदत झाली. फिल्मिस्टाईल घडलेल्या घटनेचा शेवटही गोड झाल्याची चर्चा तालूक्यात रंगली आहे.

हेही वाचा - Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहाला सावरकरांचं नाव; वाद पेटणार?

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.