ETV Bharat / business

पीएमसी प्रकरण : तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी ठेवीदारांना मिळू शकतात १ लाख रुपये

author img

By

Published : Nov 19, 2019, 7:46 PM IST

Updated : Nov 19, 2019, 8:01 PM IST

आरबीआयने लादलेल्या निर्बंधावर  पीएमसीच्या ठेवीदारांनी  मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर आरबीआयने प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर देत लग्न, शिक्षण व दैनंदिन अशा अडचणींच्या काळासाठी ५० हजार रुपये ठेवीदारांना काढता येतील, असे  म्हटले आहे.

संग्रहित - पीएमसी बँक

मुंबई - पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील पैसे खातेदारांना तातडीच्या वैद्यकीय खर्चासाठी काढता येवू शकतात. अशा ठेवीदारांनी पीएमसीच्या प्रशासकाशी संपर्क साधू शकतात, अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने मुंबई उच्च न्यायालयाला दिली.

आरबीआयने लादलेल्या निर्बंधावर पीएमसीच्या ठेवीदारांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर आरबीआयने प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर देत लग्न, शिक्षण व दैनंदिन अशा अडचणींच्या काळासाठी ५० हजार रुपये ठेवीदारांना काढता येतील, असे म्हटले आहे. वैद्यकीय खर्चाकरिता ठेवीदार हे १ लाख रुपयापर्यंतचे पैसे काढण्यासाठी आरबीआय प्रशासकाशी संपर्क करू शकतात, असे आरबीआयचे वकील व्यंकटेश धोंड यांनी न्यायालयात सांगितले. बँक आणि ठेवीदारांचे हितसंरक्षण करण्यासाठी पैसे काढण्यावर निर्बंध असण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा-व्यापाऱ्यांकडून १ हजार टन कांदा आयात; महिनाअखेर देशात होणार उपलब्ध


याप्रकरणी पुढील सुनावणी ही ४ डिसेंबरला होणार आहे. दरम्यान उच्च न्यायालयाच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू असताना शेकडो पीएमसी ठेवीदारांनी परिसरात गर्दी केली. तसेच आरबीआय इमारतीसमोर पीएमसीच्या खातेदारांनी निदर्शने केली. पीएमसीमधील घोटाळा उघडकीला आल्यानंतर १० ठेवीदारांचे मृत्यू झाले आहेत. तर मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने ६ हून अधिक आरोपींना अटक केली आहे.

हेही वाचा- आयटी कंपन्यांमधील ३० ते ४० हजार नोकऱ्यांवर येणार गदा

मुंबई - पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील पैसे खातेदारांना तातडीच्या वैद्यकीय खर्चासाठी काढता येवू शकतात. अशा ठेवीदारांनी पीएमसीच्या प्रशासकाशी संपर्क साधू शकतात, अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने मुंबई उच्च न्यायालयाला दिली.

आरबीआयने लादलेल्या निर्बंधावर पीएमसीच्या ठेवीदारांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर आरबीआयने प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर देत लग्न, शिक्षण व दैनंदिन अशा अडचणींच्या काळासाठी ५० हजार रुपये ठेवीदारांना काढता येतील, असे म्हटले आहे. वैद्यकीय खर्चाकरिता ठेवीदार हे १ लाख रुपयापर्यंतचे पैसे काढण्यासाठी आरबीआय प्रशासकाशी संपर्क करू शकतात, असे आरबीआयचे वकील व्यंकटेश धोंड यांनी न्यायालयात सांगितले. बँक आणि ठेवीदारांचे हितसंरक्षण करण्यासाठी पैसे काढण्यावर निर्बंध असण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा-व्यापाऱ्यांकडून १ हजार टन कांदा आयात; महिनाअखेर देशात होणार उपलब्ध


याप्रकरणी पुढील सुनावणी ही ४ डिसेंबरला होणार आहे. दरम्यान उच्च न्यायालयाच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू असताना शेकडो पीएमसी ठेवीदारांनी परिसरात गर्दी केली. तसेच आरबीआय इमारतीसमोर पीएमसीच्या खातेदारांनी निदर्शने केली. पीएमसीमधील घोटाळा उघडकीला आल्यानंतर १० ठेवीदारांचे मृत्यू झाले आहेत. तर मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने ६ हून अधिक आरोपींना अटक केली आहे.

हेही वाचा- आयटी कंपन्यांमधील ३० ते ४० हजार नोकऱ्यांवर येणार गदा

Intro:Body:

Dummy Business News


Conclusion:
Last Updated : Nov 19, 2019, 8:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.