ETV Bharat / business

ऐतिहासिक घसरण:  देशाच्या आर्थिक विकासदरात 4.5 टक्के घसरणीचा अंदाज

author img

By

Published : Jun 25, 2020, 8:45 PM IST

अभूतपूर्वक अशा कोरोना महामारीमुळे आर्थिक चलनवलन प्रक्रिया पूर्णपणे ठप्प पडल्या होत्या. मात्र, भारत हा पुन्हा अर्थव्यस्थेच्या पूर्ववत स्थितीला 2021 मध्ये येईल, अशी आयएमएफने अपेक्षा व्यक्त केली आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

वॉशिंग्टन – फिच, मूडीजनंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही (आयएमएफम) देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर मोठ्या प्रमाणात घसरणार असल्याचा अंदाज केला आहे. चालू वर्षात अर्थव्यवस्थेचा विकासदर हा 4.5 टक्क्यांनी घसरणार असल्याचा अंदाज आयएमएफमने म्हटले आहे. ही ऐतिहासिक घसरण असेल, असे आयएमएफने म्हटले आहे.

अभूतपूर्वक अशा कोरोना महामारीमुळे आर्थिक चलनवलन प्रक्रिया पूर्णपणे ठप्प पडल्या होत्या. मात्र, भारत हा पुन्हा अर्थव्यस्थेच्या पूर्ववत स्थितीला 2021 मध्ये येईल, अशी आयएमएफने अपेक्षा व्यक्त केली आहे. देशाचा 2021 मध्ये विकासदर हा सहा टक्के राहिल, असा आयएमएफमने अंदाज व्यक्त केला आहे. आयएमएफने 2020 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर 4.9 टक्के राहिल, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर हा विकासदर वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलूक फॉरकास्टने एप्रिलमध्ये वर्तविलेल्या अंदाजाहून 1.9 टक्के कमी आहे.

आयएमएफच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी चालू वर्षात देशाचा विकासदर 4.5 टक्क्यांनी घसरेल, असा अंदाज केला आहे. कोरोनाच्या संकटामुळे बहुतांश देशांच्या विकासदरात ऐतिहासिक घसरण होणार असल्याचे गीता गोपीनाथ यांनी म्हटले आहे.

कोरोना महामारीचा चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत अपेक्षेहून मोठा परिणाम झाला आहे. मागील अंदाजाहून अधिक हळूहळू वेगाने अर्थव्यवस्थेत सुधारणा होणार आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर हा 2021 मध्ये 5.4 टक्के होईल, असा आयएमएफच्या अहवालात अंदाज व्यक्त केला आहे.

देशाचा विकासदर हा 1961 नंतर सर्वात कमी असणार आहे. त्यापूर्वीच्या विकासदराची आयएमएफकडे आकडेवारी नाही. दरम्यान, देशाचा विकासदर 2019 मध्ये 4.2 टक्के होता.

वॉशिंग्टन – फिच, मूडीजनंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही (आयएमएफम) देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर मोठ्या प्रमाणात घसरणार असल्याचा अंदाज केला आहे. चालू वर्षात अर्थव्यवस्थेचा विकासदर हा 4.5 टक्क्यांनी घसरणार असल्याचा अंदाज आयएमएफमने म्हटले आहे. ही ऐतिहासिक घसरण असेल, असे आयएमएफने म्हटले आहे.

अभूतपूर्वक अशा कोरोना महामारीमुळे आर्थिक चलनवलन प्रक्रिया पूर्णपणे ठप्प पडल्या होत्या. मात्र, भारत हा पुन्हा अर्थव्यस्थेच्या पूर्ववत स्थितीला 2021 मध्ये येईल, अशी आयएमएफने अपेक्षा व्यक्त केली आहे. देशाचा 2021 मध्ये विकासदर हा सहा टक्के राहिल, असा आयएमएफमने अंदाज व्यक्त केला आहे. आयएमएफने 2020 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर 4.9 टक्के राहिल, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर हा विकासदर वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलूक फॉरकास्टने एप्रिलमध्ये वर्तविलेल्या अंदाजाहून 1.9 टक्के कमी आहे.

आयएमएफच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी चालू वर्षात देशाचा विकासदर 4.5 टक्क्यांनी घसरेल, असा अंदाज केला आहे. कोरोनाच्या संकटामुळे बहुतांश देशांच्या विकासदरात ऐतिहासिक घसरण होणार असल्याचे गीता गोपीनाथ यांनी म्हटले आहे.

कोरोना महामारीचा चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत अपेक्षेहून मोठा परिणाम झाला आहे. मागील अंदाजाहून अधिक हळूहळू वेगाने अर्थव्यवस्थेत सुधारणा होणार आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर हा 2021 मध्ये 5.4 टक्के होईल, असा आयएमएफच्या अहवालात अंदाज व्यक्त केला आहे.

देशाचा विकासदर हा 1961 नंतर सर्वात कमी असणार आहे. त्यापूर्वीच्या विकासदराची आयएमएफकडे आकडेवारी नाही. दरम्यान, देशाचा विकासदर 2019 मध्ये 4.2 टक्के होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.