ETV Bharat / business

केंद्रीय अर्थमंत्री आर्थिक पॅकेजचा चौथा टप्पा आज जाहीर करणार

author img

By

Published : May 16, 2020, 1:35 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्यानंतर सलग तीन दिवस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तीन पत्रकार परिषद घेत आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे.

निर्मला सीतारामन
निर्मला सीतारामन

नवी दिल्ली - कोरोना महामारी आणि टाळेबंदी अशा दुहेरी संकटात अर्थव्यवस्था सापडली आहे. या संकटात विविध क्षेत्रांना दिलासा देण्यासाठी घोषित करण्यात येणाऱ्या आर्थिक पॅकेजचा चौथा टप्पा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज जाहीर करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्यानंतर सलग तीन दिवस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तीन पत्रकार परिषद घेत आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. सीतारामन या चौथ्या टप्प्यातील अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्राला दिलासा देणारे पॅकेज जाहीर करणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील आर्थिक पॅकेज-

निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी तिसऱ्या टप्प्यातील कृषी केंद्रीत आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. यामध्ये कृषी उद्योगाला तत्काळ १ लाख कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

काही महत्त्वाच्या योजना जाहीर

  • मधुमक्षिका पालनासाठी ५०० कोटींची योजना
  • दुग्ध उत्पादन क्षेत्रासाठी १५ हजार कोटींची मदत
  • औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी ४ हजार कोटींची मदत
  • पीएम मत्स्य संपदा योजनेतून मत्स्य उद्योगासाठी २० हजार कोटींची मदत

संबंधित बातमी वाचा-आता देशात कोठेही मिळणार रेशनकार्डवर धान्य; स्थलांतरीत मजुरांना २ महिन्यांचे धान्य मोफत

दुसऱ्या टप्प्यातील आर्थिक पॅकेज-

स्थलांतरीत मजूरांना दोन महिन्यांचे धान्य देण्यात येणार

८ कोटी मजूरांसाठी २ महिन्यांच धान्य देण्यात येणार आहे. यासाठी सरकारने ३५ हजार कोटी रुपयांची तरतुद केली आहे. प्रत्येक व्यक्तीला ५ किलो धान्य देण्यात येणार आहे. यामध्ये १ किलो डाळीचा समावेश आहे. तसेच कोरोनामुळे माघारी परतणाऱ्या नागरिकांसाठी मनरेगा योजेनेद्वारे मदत करण्यात येणार आहे.

कामगार कायदा संहितेतही बदल करण्यात येणार

देशभरातील किमान वेतनातील तफावत दूर करण्यात येईल, अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. रात्रीचं काम करणाऱ्या महिल्यांच्या नियमावलीत बदल करण्यात येईल. गरिबांच्या फायद्यासाठी किमान वेतनात बदल करण्यात येणार आहे.

'वन नेशन वन राशन'

'एक देश एक राशनकार्ड' आता देशात कोठेही धान्य घेता येणार - निर्मला सीतारामन.

रेशन कार्डचा वापर देशात कोठेही करता येणार आहे. प्रवासी मजूरांसाठी घराची व्यवस्था. योजनेद्वारे देशात कोठेही असाल तरी धान्य घेता येणार

फेरीवाल्यांसाठी विशेष योजना

मुद्रा योजनेतून ५० हजारापर्यंत कर्ज घेणाऱ्यांना २ टक्क्यांपर्यंत व्याजातून सुट. फेरीवाल्यांना ५ हजार कोटींचे कर्ज देणार. याद्वारे ५० लाख फेरीवाल्यांना फायदा होणार. बीजभांडवल १० हजार रुपये देण्यात येणार.

संबंधित बातमी वाचा-अर्थमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेमधील ठळक मुद्दे.. लघुकुटीर उद्योगांसाठी सहा मोठ्या तरतूदी!

पहिल्या टप्प्यातील आर्थिक पॅकेज

अर्थमंत्रालयाकडून जाहीर होणाऱ्या १५ योजनांपैकी ६ योजना 'एमएसएमई'साठी..

  • ४५ लाख लघु उद्योगांना मिळणार दिलासा..
  • १०० कोटींपर्यंतच्या उद्योगांना कर्जामध्ये मिळणार सवलत..
  • एकूण तीन लाख कोटींची तरतूद..
  • लघुकुटीर उद्योगांसाठी तारण विरहीत कर्ज मिळणार..
  • कर्जाची मूळ रक्कम परत करण्याची अट नसणार..

संबंधित बातमी वाचा-कृषी उद्योगाला तत्काळ १ लाख कोटींचे पॅकेज जाहीर

नवी दिल्ली - कोरोना महामारी आणि टाळेबंदी अशा दुहेरी संकटात अर्थव्यवस्था सापडली आहे. या संकटात विविध क्षेत्रांना दिलासा देण्यासाठी घोषित करण्यात येणाऱ्या आर्थिक पॅकेजचा चौथा टप्पा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज जाहीर करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्यानंतर सलग तीन दिवस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तीन पत्रकार परिषद घेत आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. सीतारामन या चौथ्या टप्प्यातील अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्राला दिलासा देणारे पॅकेज जाहीर करणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील आर्थिक पॅकेज-

निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी तिसऱ्या टप्प्यातील कृषी केंद्रीत आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. यामध्ये कृषी उद्योगाला तत्काळ १ लाख कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

काही महत्त्वाच्या योजना जाहीर

  • मधुमक्षिका पालनासाठी ५०० कोटींची योजना
  • दुग्ध उत्पादन क्षेत्रासाठी १५ हजार कोटींची मदत
  • औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी ४ हजार कोटींची मदत
  • पीएम मत्स्य संपदा योजनेतून मत्स्य उद्योगासाठी २० हजार कोटींची मदत

संबंधित बातमी वाचा-आता देशात कोठेही मिळणार रेशनकार्डवर धान्य; स्थलांतरीत मजुरांना २ महिन्यांचे धान्य मोफत

दुसऱ्या टप्प्यातील आर्थिक पॅकेज-

स्थलांतरीत मजूरांना दोन महिन्यांचे धान्य देण्यात येणार

८ कोटी मजूरांसाठी २ महिन्यांच धान्य देण्यात येणार आहे. यासाठी सरकारने ३५ हजार कोटी रुपयांची तरतुद केली आहे. प्रत्येक व्यक्तीला ५ किलो धान्य देण्यात येणार आहे. यामध्ये १ किलो डाळीचा समावेश आहे. तसेच कोरोनामुळे माघारी परतणाऱ्या नागरिकांसाठी मनरेगा योजेनेद्वारे मदत करण्यात येणार आहे.

कामगार कायदा संहितेतही बदल करण्यात येणार

देशभरातील किमान वेतनातील तफावत दूर करण्यात येईल, अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. रात्रीचं काम करणाऱ्या महिल्यांच्या नियमावलीत बदल करण्यात येईल. गरिबांच्या फायद्यासाठी किमान वेतनात बदल करण्यात येणार आहे.

'वन नेशन वन राशन'

'एक देश एक राशनकार्ड' आता देशात कोठेही धान्य घेता येणार - निर्मला सीतारामन.

रेशन कार्डचा वापर देशात कोठेही करता येणार आहे. प्रवासी मजूरांसाठी घराची व्यवस्था. योजनेद्वारे देशात कोठेही असाल तरी धान्य घेता येणार

फेरीवाल्यांसाठी विशेष योजना

मुद्रा योजनेतून ५० हजारापर्यंत कर्ज घेणाऱ्यांना २ टक्क्यांपर्यंत व्याजातून सुट. फेरीवाल्यांना ५ हजार कोटींचे कर्ज देणार. याद्वारे ५० लाख फेरीवाल्यांना फायदा होणार. बीजभांडवल १० हजार रुपये देण्यात येणार.

संबंधित बातमी वाचा-अर्थमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेमधील ठळक मुद्दे.. लघुकुटीर उद्योगांसाठी सहा मोठ्या तरतूदी!

पहिल्या टप्प्यातील आर्थिक पॅकेज

अर्थमंत्रालयाकडून जाहीर होणाऱ्या १५ योजनांपैकी ६ योजना 'एमएसएमई'साठी..

  • ४५ लाख लघु उद्योगांना मिळणार दिलासा..
  • १०० कोटींपर्यंतच्या उद्योगांना कर्जामध्ये मिळणार सवलत..
  • एकूण तीन लाख कोटींची तरतूद..
  • लघुकुटीर उद्योगांसाठी तारण विरहीत कर्ज मिळणार..
  • कर्जाची मूळ रक्कम परत करण्याची अट नसणार..

संबंधित बातमी वाचा-कृषी उद्योगाला तत्काळ १ लाख कोटींचे पॅकेज जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.