ETV Bharat / business

लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे तब्बल ३२० अब्ज डॉलर्सचे नुकसान..

author img

By

Published : May 3, 2020, 5:59 PM IST

भारताचा जीडीपी (ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट) हा एका दिवसाला ८ अब्ज डॉलर्स आहे. त्यावरुन ४० दिवसांच्या हिशोबाने आतापर्यंत देशाचे ३२० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. वाहतूक आणि हॉटेल क्षेत्रांतील दिग्गज ओयो, ओला आणि मेक माय ट्रिप अशा कंपन्यांची उलाढाल मोठ्या प्रमाणात कोसळली आहे.

40-day lockdown to inflict $320 bn loss on Indian economy: Report
लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे तब्बल ३२० अब्ज डॉलर्सचे नुकसान..

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा जगभरातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत, त्यामुळे अर्थव्यवस्थेचा चालना मिळण्याची कुठलीही संधी सध्या देशांना मिळत नाहीये. देशाबाबत बोलायचे झाल्यास, ४० दिवसांच्या लॉकडाऊनमुळे देशाचे ३२० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे.

भारताचा जीडीपी (ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट) हा एका दिवसाला ८ अब्ज डॉलर्स आहे. त्यावरुन ४० दिवसांच्या हिशोबाने आतापर्यंत देशाचे ३२० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. वाहतूक आणि हॉटेल क्षेत्रांतील दिग्गज ओयो, ओला आणि मेक माय ट्रिप अशा कंपन्यांची उलाढाल मोठ्या प्रमाणात कोसळली आहे. आयएनसी-४२ या संस्थेच्या 'डेटालॅब्स'ने दिलेल्या एका अहवालात ही बाब समोर आली आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाणारे एमएसएमई क्षेत्रही जवळपास पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे त्यात होणारी उलाढालही जवळपास बंद असल्याचे आणखी एका अहवालात समोर आले आहे.

दरम्यान, काही क्षेत्रांसाठी हा लॉकडाऊन फायद्याचा ठरला आहे. हायपरलोकल डिलिव्हरी, मीडिया, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि तंत्रज्ञानाशी संबंधित आणखी काही क्षेत्रांना या लॉकडाऊनचा फायदा होताना दिसून येत आहे.

हेही वाचा : मुंबई येथील सीकेपी को-ऑपरेटिव्ह बॅकेचा परवाना रद्द; आरबीआईची कारवाई

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा जगभरातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत, त्यामुळे अर्थव्यवस्थेचा चालना मिळण्याची कुठलीही संधी सध्या देशांना मिळत नाहीये. देशाबाबत बोलायचे झाल्यास, ४० दिवसांच्या लॉकडाऊनमुळे देशाचे ३२० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे.

भारताचा जीडीपी (ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट) हा एका दिवसाला ८ अब्ज डॉलर्स आहे. त्यावरुन ४० दिवसांच्या हिशोबाने आतापर्यंत देशाचे ३२० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. वाहतूक आणि हॉटेल क्षेत्रांतील दिग्गज ओयो, ओला आणि मेक माय ट्रिप अशा कंपन्यांची उलाढाल मोठ्या प्रमाणात कोसळली आहे. आयएनसी-४२ या संस्थेच्या 'डेटालॅब्स'ने दिलेल्या एका अहवालात ही बाब समोर आली आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाणारे एमएसएमई क्षेत्रही जवळपास पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे त्यात होणारी उलाढालही जवळपास बंद असल्याचे आणखी एका अहवालात समोर आले आहे.

दरम्यान, काही क्षेत्रांसाठी हा लॉकडाऊन फायद्याचा ठरला आहे. हायपरलोकल डिलिव्हरी, मीडिया, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि तंत्रज्ञानाशी संबंधित आणखी काही क्षेत्रांना या लॉकडाऊनचा फायदा होताना दिसून येत आहे.

हेही वाचा : मुंबई येथील सीकेपी को-ऑपरेटिव्ह बॅकेचा परवाना रद्द; आरबीआईची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.