ETV Bharat / business

येस बँकेवरील संकटावर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 'ही' दिली प्रतिक्रिया

author img

By

Published : Mar 6, 2020, 2:45 PM IST

निर्मला सीतारामन म्हणाल्या, भारतीय रिझर्व्ह बँकेशी सतत संपर्कात आहे. मध्यवर्ती बँकेने सर्व प्रकरणाची माहिती घेतली आहे. त्यांनी लवकर उपाय शोधणार असल्याचे आश्वासन दिले आहे. प्रत्येक ठेवीदाराचे पैसे सुरक्षित असल्याचे मी ग्वाही देते.

Nirmala Sitaraman
निर्मला सीतारामन

नवी दिल्ली - येस बँकेच्या ठेवीदारांचे पैसे सुरक्षित असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे. येस बँकेच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक काम करत असल्याची त्यांनी माहिती दिली.

निर्मला सीतारामन म्हणाल्या, भारतीय रिझर्व्ह बँकेशी सतत संपर्कात आहे. मध्यवर्ती बँकेने सर्व प्रकरणाची माहिती घेतली आहे. त्यांनी लवकर उपाय शोधणार असल्याचे आश्वासन दिले आहे. प्रत्येक ठेवीदाराचे पैसे सुरक्षित असल्याचे मी ग्वाही देते.

ठेवीदार, बँक आणि अर्थव्यवस्थेच्या हितासाठी पावले उचलली आहेत. कोणत्याही ठेवीदाराचे नुकसान होणार नसल्याचे आरबीआयचे गव्हर्नर यांनी आश्वासन दिले. भारतीय रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर गुरुवारी निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे खातेदारांना ५० हजार रुपयांहून अधिक रक्कम काढता येत नाही. त्यामुळे बँकेला कोणतेही नवीन कर्ज घेता येत नाही. तसेच कोणतीही गुंतवणूक करता येत नाही.

हेही वाचा-शेअर बाजार गडगडला; निर्देशांकात तब्बल 1400 अंशांची घसरण, रुपयाचेही अवमूल्यन

स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी प्रमुख वित्तीय अधिकारी प्रशांत कुमार यांची पुढील महिन्यात आरबीआयचे प्रशासक म्हणून येस बँकेवर नियुक्ती होणार आहे.

हेही वाचा-'आरबीआय'ने येस बँकेवर लादले निर्बंध, खात्यातून ५० हजारपर्यंतचीच रक्कम काढता येणार

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संचालक मंडळाने येस बँकेमध्ये गुंतवणूक करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून येस बँकेकडून भांडवल निधी जमविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. बँकेने डिसेंबरच्या तिमाहीमधील वित्तीय कामगिरीची आकडेवारी जाहीर केलेली नाही.

नवी दिल्ली - येस बँकेच्या ठेवीदारांचे पैसे सुरक्षित असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे. येस बँकेच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक काम करत असल्याची त्यांनी माहिती दिली.

निर्मला सीतारामन म्हणाल्या, भारतीय रिझर्व्ह बँकेशी सतत संपर्कात आहे. मध्यवर्ती बँकेने सर्व प्रकरणाची माहिती घेतली आहे. त्यांनी लवकर उपाय शोधणार असल्याचे आश्वासन दिले आहे. प्रत्येक ठेवीदाराचे पैसे सुरक्षित असल्याचे मी ग्वाही देते.

ठेवीदार, बँक आणि अर्थव्यवस्थेच्या हितासाठी पावले उचलली आहेत. कोणत्याही ठेवीदाराचे नुकसान होणार नसल्याचे आरबीआयचे गव्हर्नर यांनी आश्वासन दिले. भारतीय रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर गुरुवारी निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे खातेदारांना ५० हजार रुपयांहून अधिक रक्कम काढता येत नाही. त्यामुळे बँकेला कोणतेही नवीन कर्ज घेता येत नाही. तसेच कोणतीही गुंतवणूक करता येत नाही.

हेही वाचा-शेअर बाजार गडगडला; निर्देशांकात तब्बल 1400 अंशांची घसरण, रुपयाचेही अवमूल्यन

स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी प्रमुख वित्तीय अधिकारी प्रशांत कुमार यांची पुढील महिन्यात आरबीआयचे प्रशासक म्हणून येस बँकेवर नियुक्ती होणार आहे.

हेही वाचा-'आरबीआय'ने येस बँकेवर लादले निर्बंध, खात्यातून ५० हजारपर्यंतचीच रक्कम काढता येणार

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संचालक मंडळाने येस बँकेमध्ये गुंतवणूक करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून येस बँकेकडून भांडवल निधी जमविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. बँकेने डिसेंबरच्या तिमाहीमधील वित्तीय कामगिरीची आकडेवारी जाहीर केलेली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.