ETV Bharat / business

कोरोनाविरोधातील लढ्याकरता आनंद महिंद्रा यांनी सरकारला दिला 'हा' महत्त्वपूर्ण सल्ला - Anand Mahindra on vaccine distribution

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओग्राफिक्स ट्विट करत केंद्र सरकारचे कोरोनाविरोधातील लसीकरणाकडे लक्ष वेधले आहे. लसीकरणात भारत जगात चौथ्या क्रमांकावर असणे हे पुरेसे नाही, असे महिंद्रा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

आनंद महिंद्रा
आनंद महिंद्रा
author img

By

Published : Feb 16, 2021, 7:58 PM IST

Updated : Feb 16, 2021, 10:54 PM IST

नवी दिल्ली - महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी कोरोनाविरोधातील लसीच्या वितरणासाठी सरकारला महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. कोरोनाची लाट हा गंभीर धोका आहे. अशा नव्या लाटेविरोधात मोठ्या प्रमाणात लसीकरण ही भारतासाठी सर्वात मोठी आशा असल्याचे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे.

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओग्राफिक्स ट्विट करत केंद्र सरकारचे कोरोनाविरोधातील लसीकरणाकडे लक्ष वेधले आहे. लसीकरणात भारत जगात चौथ्या क्रमांकावर असणे हे पुरेसे नाही. आपल्याकडे उत्पादन क्षमता असल्याचे महिंद्रा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. कोरोनाविरोधातील लसीकरणासाठी खासगी क्षेत्राच्या क्षमतेचा वापर करणे आवश्यक आहे. हे ट्विट त्यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना टॅग केले आहे.

आनंद महिंद्रा यांनी सरकारला दिला 'हा' महत्त्वपूर्ण सल्ला
आनंद महिंद्रा यांनी सरकारला दिला 'हा' महत्त्वपूर्ण सल्ला

हेही वाचा-सोन्याच्या दरात किंचित घसरण; चांदी प्रति किलो ९५ रुपयांनी महाग

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात ८५ लाख १६ हजार ७७१ जणांना कोरोनाविरोधातील लस देण्यात आली आहे. युरोपासह अनेक देशांत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. तर इंग्लंडमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली आहे. दरम्यान, देशात कोरोनाच्या नवीन रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे.

हेही वाचा-देशाच्या जीडीपीत डिसेंबरच्या तिमाहीत होणार १ टक्के घसरण

केंद्र सरकारने आपत्कालीन स्थितीत लसीकरण करण्यासाठी कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सीन या लशींना परवानगी दिली आहे.

नवी दिल्ली - महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी कोरोनाविरोधातील लसीच्या वितरणासाठी सरकारला महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. कोरोनाची लाट हा गंभीर धोका आहे. अशा नव्या लाटेविरोधात मोठ्या प्रमाणात लसीकरण ही भारतासाठी सर्वात मोठी आशा असल्याचे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे.

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओग्राफिक्स ट्विट करत केंद्र सरकारचे कोरोनाविरोधातील लसीकरणाकडे लक्ष वेधले आहे. लसीकरणात भारत जगात चौथ्या क्रमांकावर असणे हे पुरेसे नाही. आपल्याकडे उत्पादन क्षमता असल्याचे महिंद्रा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. कोरोनाविरोधातील लसीकरणासाठी खासगी क्षेत्राच्या क्षमतेचा वापर करणे आवश्यक आहे. हे ट्विट त्यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना टॅग केले आहे.

आनंद महिंद्रा यांनी सरकारला दिला 'हा' महत्त्वपूर्ण सल्ला
आनंद महिंद्रा यांनी सरकारला दिला 'हा' महत्त्वपूर्ण सल्ला

हेही वाचा-सोन्याच्या दरात किंचित घसरण; चांदी प्रति किलो ९५ रुपयांनी महाग

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात ८५ लाख १६ हजार ७७१ जणांना कोरोनाविरोधातील लस देण्यात आली आहे. युरोपासह अनेक देशांत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. तर इंग्लंडमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली आहे. दरम्यान, देशात कोरोनाच्या नवीन रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे.

हेही वाचा-देशाच्या जीडीपीत डिसेंबरच्या तिमाहीत होणार १ टक्के घसरण

केंद्र सरकारने आपत्कालीन स्थितीत लसीकरण करण्यासाठी कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सीन या लशींना परवानगी दिली आहे.

Last Updated : Feb 16, 2021, 10:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.