ETV Bharat / business

वाहतुकीचा नियमभंग करणाऱ्याला पकडून देणारे संशोधन, १२ वर्षांच्या रेवंतचे ४ पेटंट दाखल

author img

By

Published : Jul 28, 2019, 5:32 PM IST

बी.एस. रेवंत नाम्बुरी याने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींना संशोधनाचे सादरीकरण दाखविले. यावेळी गडकरींनी रेवंतच्या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्षात वापर करण्यासाठी विभागाकडून मंजूरी देण्यात येईल, असे सांगितले.

संपादित छायाचित्र

नवी दिल्ली - पेटंटची संख्या वाढविण्यासाठी सरकारसह अनेक संशोधकांना कसरत करावी लागते. अशी स्थिती असताना केवळ १२ वर्षाच्या नागपुरातील मुलाने ४ पेटंट दाखल केली आहेत. रेवंतच्या संशोधनातून तयार केलेल्या अॅपमुळे अपघात टाळणे, वाहन चोरी झाल्यास पकडणे आदी कामे सहजशक्य होतात. बी.एस. रेवंत नाम्बुरी असे या देशातील सर्वात कमी वयाच्या संशोधकाचे नाव आहे.

बी.एस. रेवंत नाम्बुरी याने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींना संशोधनाचे सादरीकरण दाखविले. यावेळी गडकरींनी रेवंतच्या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्षात वापर करण्यासाठी विभागाकडून मंजूरी देण्यात येईल, असे सांगितले.

त्याने तयार केलेल्या क्विक रिस्पॉन्स कोडने नेटवर्क नसले तरी डाटाची छपाई (प्रिंट) करणे शक्य होते. या तंत्रज्ञानाचा लोकांच्या हिताकरिता मोठ्या प्रमाणात सरकार अथवा खासगी कंपनीकडून मोठ्या प्रमाणात वापर व्हावा, ही त्यामागे कल्पना असल्याचे रेवंतने सांगितले.

रेवंतचे असे आहे संशोधन-
रेवंत हा नागपूरमधील माउंट लिटेरा झी स्कूलमध्ये आठवीत शिक्षण घेत आहे. त्याने तयार केलेल्या अॅपमध्ये वाहतुकीच्या नियमभंगाचे रिअल टाईम पाहणे, सीटबेल्ट सेन्सर, ब्रिथलायझर, ह्रदय ठोके मोजणे अशा सुविधा आहेत. ही माहिती सीपीयूमध्ये संग्रहित होते. त्याबाबतचे वेळोवेळी अलर्ट संबंधित यंत्रणेला देण्यात येतात.

नितीन गडकरी म्हणाले, विभागाकडून नेहमीच नवसंशोधकांना आणि नवसंशोधन तंत्रज्ञानाना प्रोत्साहन देण्यात येते. हे तंत्रज्ञान जर तांत्रिक मुद्द्यावर योग्य ठरले तर त्याचा अपघात टाळण्यासाठी विभाग वापर करू शकते.

रेवंतची आईने दिली ही प्रतिक्रिया-

रेवंतची आई डॉ. शिल्पा शेखर नाम्बुरी म्हणाल्या, वाहतुकीचा रेड सिग्नल तोडून मालवाहतूक करणाऱ्या ट्रकने माझ्या चारचाकीला धडक दिली होती. त्यावेळी ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेनंतर कारमध्ये बसलेल्या रेवंतने अॅप शोधून काढण्याचा निर्णय घेतला. त्याच्या अॅपमुळे अपघातामधील दोषींवर कारवाई करणे अॅप शक्य आहे. वयाच्या १२ व्या वर्षी पेटंट दाखल करणारा रेवंत हा देशातील सर्वात कमी वयाचा संशोधक ठरला आहे.

देशात दरवर्षी रस्ते अपघातामध्ये १.५ लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे रेवंतचे पेटंट हे उपयोगी ठरणार आहेत.

नवी दिल्ली - पेटंटची संख्या वाढविण्यासाठी सरकारसह अनेक संशोधकांना कसरत करावी लागते. अशी स्थिती असताना केवळ १२ वर्षाच्या नागपुरातील मुलाने ४ पेटंट दाखल केली आहेत. रेवंतच्या संशोधनातून तयार केलेल्या अॅपमुळे अपघात टाळणे, वाहन चोरी झाल्यास पकडणे आदी कामे सहजशक्य होतात. बी.एस. रेवंत नाम्बुरी असे या देशातील सर्वात कमी वयाच्या संशोधकाचे नाव आहे.

बी.एस. रेवंत नाम्बुरी याने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींना संशोधनाचे सादरीकरण दाखविले. यावेळी गडकरींनी रेवंतच्या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्षात वापर करण्यासाठी विभागाकडून मंजूरी देण्यात येईल, असे सांगितले.

त्याने तयार केलेल्या क्विक रिस्पॉन्स कोडने नेटवर्क नसले तरी डाटाची छपाई (प्रिंट) करणे शक्य होते. या तंत्रज्ञानाचा लोकांच्या हिताकरिता मोठ्या प्रमाणात सरकार अथवा खासगी कंपनीकडून मोठ्या प्रमाणात वापर व्हावा, ही त्यामागे कल्पना असल्याचे रेवंतने सांगितले.

रेवंतचे असे आहे संशोधन-
रेवंत हा नागपूरमधील माउंट लिटेरा झी स्कूलमध्ये आठवीत शिक्षण घेत आहे. त्याने तयार केलेल्या अॅपमध्ये वाहतुकीच्या नियमभंगाचे रिअल टाईम पाहणे, सीटबेल्ट सेन्सर, ब्रिथलायझर, ह्रदय ठोके मोजणे अशा सुविधा आहेत. ही माहिती सीपीयूमध्ये संग्रहित होते. त्याबाबतचे वेळोवेळी अलर्ट संबंधित यंत्रणेला देण्यात येतात.

नितीन गडकरी म्हणाले, विभागाकडून नेहमीच नवसंशोधकांना आणि नवसंशोधन तंत्रज्ञानाना प्रोत्साहन देण्यात येते. हे तंत्रज्ञान जर तांत्रिक मुद्द्यावर योग्य ठरले तर त्याचा अपघात टाळण्यासाठी विभाग वापर करू शकते.

रेवंतची आईने दिली ही प्रतिक्रिया-

रेवंतची आई डॉ. शिल्पा शेखर नाम्बुरी म्हणाल्या, वाहतुकीचा रेड सिग्नल तोडून मालवाहतूक करणाऱ्या ट्रकने माझ्या चारचाकीला धडक दिली होती. त्यावेळी ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेनंतर कारमध्ये बसलेल्या रेवंतने अॅप शोधून काढण्याचा निर्णय घेतला. त्याच्या अॅपमुळे अपघातामधील दोषींवर कारवाई करणे अॅप शक्य आहे. वयाच्या १२ व्या वर्षी पेटंट दाखल करणारा रेवंत हा देशातील सर्वात कमी वयाचा संशोधक ठरला आहे.

देशात दरवर्षी रस्ते अपघातामध्ये १.५ लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे रेवंतचे पेटंट हे उपयोगी ठरणार आहेत.

Intro:Body:

business


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.