ETV Bharat / briefs

'या' कारणाने लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होणार; शरद पवारांचे भाकीत

लोकसभा निवडणुकीत यावेळी भाजपच्या जागा कमी होणार असल्याचे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजपच्या विरोधात जनमत तयार करण्याचे काम करत आहेत. याचा फायदा आघाडीलाच होणार असल्याचे पवार यांनी सांगितले आहे.

author img

By

Published : Apr 18, 2019, 10:48 PM IST

रायगडमध्ये पत्रकारांशी बोलताना शरद पवार

रायगड - लोकसभा निवडणुकीत यावेळी भाजपच्या जागा कमी होणार असल्याचे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजपच्या विरोधात जनमत तयार करण्याचे काम करत आहेत. याचा फायदा आघाडीलाच होणार असल्याचे पवार यांनी सांगितले आहे.

रायगडमध्ये पत्रकारांशी बोलताना शरद पवार


अलिबाग येथे आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचार सभेसाठी शरद पवार आले होते. त्यावेळी शेतकरी भवन मध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रश्न विचारले असता त्यांनी सर्व प्रश्नांची मार्मिक उत्तरे दिली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक भाषणात आपल्या विरोधात बोलत असतात. याबाबत विचारले असता त्याचे माझ्यावर प्रेम आहे, असे ते हसून म्हणाले. देशात लोकसभेची निवडणूक सुरू आहे. याबाबत विचारले असता ते म्हणाले, २०१४ ची परिस्थिती आता नाही आहे. या निवडणुकीत सपा व बसपा आघाडी झाली आहे. याचा फटका भाजपला बसू शकतो. जयललिता याच्या निधनानंतर त्याच्या पक्षाचे दोन पक्ष झाले आहेत. त्यामुळे याचा फटकाही भाजपला बसणार आहे. त्याचबरोबर छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान याठिकाणी काँग्रेस पक्ष विधानसभेत निवडून आलेला आहेत. या सर्व परिस्थितीतचा फटकाही भाजपला बसेल, असे पवार म्हणाले.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे आघाडीचा प्रचार करत आहेत. याबाबत त्याचा आघाडीला किती फायदा होईल याबाबत पवार म्हणाले, राज ठाकरे यांचा पक्ष लोकसभा निवडणूक लढवीत नाही. राज ठाकरे हे दोघांवर उद्देशून बोलत असून त्याच्यासोबत तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत. राज ठाकरे हे भाजपच्या विरोधात बोलत असून त्याच्या विरोधात जनमत तयार करत आहे. त्यामुळे त्याचा फायदा आघाडीला होऊ शकतो.

रायगड - लोकसभा निवडणुकीत यावेळी भाजपच्या जागा कमी होणार असल्याचे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजपच्या विरोधात जनमत तयार करण्याचे काम करत आहेत. याचा फायदा आघाडीलाच होणार असल्याचे पवार यांनी सांगितले आहे.

रायगडमध्ये पत्रकारांशी बोलताना शरद पवार


अलिबाग येथे आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचार सभेसाठी शरद पवार आले होते. त्यावेळी शेतकरी भवन मध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रश्न विचारले असता त्यांनी सर्व प्रश्नांची मार्मिक उत्तरे दिली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक भाषणात आपल्या विरोधात बोलत असतात. याबाबत विचारले असता त्याचे माझ्यावर प्रेम आहे, असे ते हसून म्हणाले. देशात लोकसभेची निवडणूक सुरू आहे. याबाबत विचारले असता ते म्हणाले, २०१४ ची परिस्थिती आता नाही आहे. या निवडणुकीत सपा व बसपा आघाडी झाली आहे. याचा फटका भाजपला बसू शकतो. जयललिता याच्या निधनानंतर त्याच्या पक्षाचे दोन पक्ष झाले आहेत. त्यामुळे याचा फटकाही भाजपला बसणार आहे. त्याचबरोबर छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान याठिकाणी काँग्रेस पक्ष विधानसभेत निवडून आलेला आहेत. या सर्व परिस्थितीतचा फटकाही भाजपला बसेल, असे पवार म्हणाले.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे आघाडीचा प्रचार करत आहेत. याबाबत त्याचा आघाडीला किती फायदा होईल याबाबत पवार म्हणाले, राज ठाकरे यांचा पक्ष लोकसभा निवडणूक लढवीत नाही. राज ठाकरे हे दोघांवर उद्देशून बोलत असून त्याच्यासोबत तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत. राज ठाकरे हे भाजपच्या विरोधात बोलत असून त्याच्या विरोधात जनमत तयार करत आहे. त्यामुळे त्याचा फायदा आघाडीला होऊ शकतो.

Intro:
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होणार - शरद पवार

रायगड : लोकसभा निवडणुकीत यावेळी भाजपच्या जागा कमी होणार असल्याचे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजपच्या विरोधात जनमत तयार करण्याचे काम करीत असल्याने त्याचा फायदा हा आघाडीलाच होणार आल्याचे पवार यांनी सांगितले.

अलिबाग येथे आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचार सभेसाठी शरद पवार आले होते. त्यावेळी शेतकरी भवन मध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रश्न विचारले असता सर्व प्रश्नांची मार्मिक उत्तरे दिली.Body:पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक भाषणात आपल्या विरोधात बोलत असतात याबाबत विचारले असता त्याचे माझ्यावर प्रेम आहे असे हसून उत्तर दिले. तर देशात लोकसभेची निवडणूक सुरू आहे याबाबत विचारले असता ते म्हणाले, 2014 ची परिस्थिती आता नाही आहे. या निवडणुकीत सपा व बसपा आघाडी झाली आहे याचा फटका भाजपच्या जागेवर होऊ शकतो. जयललिता याच्या निधनानंतर त्याच्या पक्षाचे दोन पक्ष झाले आहेत. त्यामुळे याचा फटकाही भाजपला बसणार. त्याचबरोबर छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान याठिकाणी काँग्रेस पक्ष विधानसभेत निवडून आलेले आहेत. त्यामुळे या सर्व परिस्थितीत भाजपच्या जागांवर होणार असे उत्तर दिले.Conclusion:मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आघाडीचा प्रचार करीत आहेत याबाबत त्याचा आघाडीला किती फायदा होईल याबाबत पवार म्हणाले की, राज ठाकरे यांचा पक्ष लोकसभा निवडणूक लढवीत नाही. राज ठाकरे हे दोघांवर उद्देशून बोलत असून त्याच्यासोबत तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत. राज ठाकरे हे भाजपच्या विरोधात बोलत असून त्याच्या विरोधात जनमत तयार करीत आहे. त्यामुळे त्याचा फायदा आघाडीला होऊ शकतो.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.