ETV Bharat / briefs

विनामास्क २५ लाख ५३ हजार नागरिकांवर कारवाई, ५१ कोटी ४६ लाखांचा दंड वसूल

author img

By

Published : Apr 12, 2021, 5:17 PM IST

मुंबईत मास्क न वापरणाऱ्या एकूण २५ लाख ५३ हजार ५४६ नागरिकांवर कारवाई करत ५१ कोटी ४६ लाख ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Mumbai
Mumbai

मुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रसार होत असल्याने मास्कचा वापर करावा, असे आवाहन सरकार आणि पालिकेकडून करण्यात आले आहे. मात्र त्यानंतरही अनेक नागरिक मास्कचा वापर करत नसल्याचे निदर्शनास येत आहे. विनामास्क नागरिकांवर, रेल्वे प्रवाशांवर पालिका, क्लिनअप मार्शल तसेच पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण २५ लाख ५३ हजार ५४६ नागरिकांवर कारवाई करत ५१ कोटी ४६ लाख ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

51 कोटी 46 लाख 400 रुपये दंड वसूल

बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार व प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याकरिता मार्च २०२० पासून विविध उपाययोजना वेळोवेळी नागरिकांच्या हितासाठी अंमलात आणलेल्या आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे नागरिकांनी मास्क वापरणे आवश्यक आणि जरुरीचे आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विना मास्क घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना २०० रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले होते. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर अधिकाधिक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, २० एप्रिल २०२० पासून कारवाई केली जात आहे. एकूण २५ लाख ५३ हजार ५४६ नागरिकांवर कारवाई करत ५१ कोटी ४६ लाख ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पालिकेची कारवाई

मुंबई महापालिकेने आतापर्यंत २२ लाख ५५ हजार ४३ नागरिकांवर कारवाई केली आहे. या कारवाई मधून ४५ कोटी ४६ लाख ३८ हजार ८०० रुपये इतका दंड वसूल केला आहे.

पोलिसांची कारवाई

मुंबई पोलिसांनी २ लाख ७५ हजार २०९ नागरिकांवर कारवाई करत ५ कोटी ५० लाख ४१ हजार ८०० रुपये इतका दंड वसूल केला आहे. पोलिसांनी जो दंड वसूल केला आहे त्यापैकी ५० टक्के दंड पोलीस विभागाला तर ५० टक्के दंड महापालिकेला दिला जाणार आहे.

रेल्वेची कारवाई

फेब्रुवारीपासून मुंबईमध्ये सर्वसामान्य नागरिकांना रेल्वेमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. तेव्हापासून मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वमधून प्रवास करणाऱ्या विना मास्क प्रवाशांवर करावाई केली जात आहे. आतापर्यंत रेल्वेमध्ये २३ हजार २९४ प्रवाशांवर कारवाई केली, त्यातून ४९ लाख १९ हजार ८०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

कारवाईनंतर मास्क मोफत

मास्क न लावता किंवा अयोग्य रीतीने लावून फिरणाऱ्या नागरिकांना मास्कची आवश्यकता देखील समजावून सांगितली जात आहे. मास्क नसल्यास दंड केल्यानंतर संबंधित नागरिक पुन्हा विना मास्क पुढे जातात. त्यामुळे मास्क वापराच्या मूळ उद्दिष्टांची पूर्तता व्हावी, यासाठी दंड करण्यासोबत संबंधित नागरिकास एक मास्क देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मोफत पुरविला जात आहे. मास्क मोफत दिल्याची नोंद संबंधित दंडाच्या पावतीवर देखील केली जात आहे.

कोणत्या विभागात किती कारवाई?

झोन- व्यक्ती - दंड रुपये

झोन १ - ३,१७४८० - ६,४०,६६,५००

झोन २ - ४,००,०१६ - ८,०३,३४,५००

झोन ३ - ३,०५,०५८ - ६,२२,९७,२००

झोन ४ - ३,७४,८०१ - ७,५५,०५,६००

झोन ५ - २,५२,३०४ - ५,०६,७७,५००

झोन ६ - २,८२,७३८ - ५,६५,९२,२००

झोन ७ - ३,२२,६४६ - ६,५१,६५,३००

एकूण - २५,५३,५४६ - ५१,४६,००,४००

मुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रसार होत असल्याने मास्कचा वापर करावा, असे आवाहन सरकार आणि पालिकेकडून करण्यात आले आहे. मात्र त्यानंतरही अनेक नागरिक मास्कचा वापर करत नसल्याचे निदर्शनास येत आहे. विनामास्क नागरिकांवर, रेल्वे प्रवाशांवर पालिका, क्लिनअप मार्शल तसेच पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण २५ लाख ५३ हजार ५४६ नागरिकांवर कारवाई करत ५१ कोटी ४६ लाख ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

51 कोटी 46 लाख 400 रुपये दंड वसूल

बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार व प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याकरिता मार्च २०२० पासून विविध उपाययोजना वेळोवेळी नागरिकांच्या हितासाठी अंमलात आणलेल्या आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे नागरिकांनी मास्क वापरणे आवश्यक आणि जरुरीचे आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विना मास्क घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना २०० रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले होते. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर अधिकाधिक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, २० एप्रिल २०२० पासून कारवाई केली जात आहे. एकूण २५ लाख ५३ हजार ५४६ नागरिकांवर कारवाई करत ५१ कोटी ४६ लाख ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पालिकेची कारवाई

मुंबई महापालिकेने आतापर्यंत २२ लाख ५५ हजार ४३ नागरिकांवर कारवाई केली आहे. या कारवाई मधून ४५ कोटी ४६ लाख ३८ हजार ८०० रुपये इतका दंड वसूल केला आहे.

पोलिसांची कारवाई

मुंबई पोलिसांनी २ लाख ७५ हजार २०९ नागरिकांवर कारवाई करत ५ कोटी ५० लाख ४१ हजार ८०० रुपये इतका दंड वसूल केला आहे. पोलिसांनी जो दंड वसूल केला आहे त्यापैकी ५० टक्के दंड पोलीस विभागाला तर ५० टक्के दंड महापालिकेला दिला जाणार आहे.

रेल्वेची कारवाई

फेब्रुवारीपासून मुंबईमध्ये सर्वसामान्य नागरिकांना रेल्वेमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. तेव्हापासून मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वमधून प्रवास करणाऱ्या विना मास्क प्रवाशांवर करावाई केली जात आहे. आतापर्यंत रेल्वेमध्ये २३ हजार २९४ प्रवाशांवर कारवाई केली, त्यातून ४९ लाख १९ हजार ८०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

कारवाईनंतर मास्क मोफत

मास्क न लावता किंवा अयोग्य रीतीने लावून फिरणाऱ्या नागरिकांना मास्कची आवश्यकता देखील समजावून सांगितली जात आहे. मास्क नसल्यास दंड केल्यानंतर संबंधित नागरिक पुन्हा विना मास्क पुढे जातात. त्यामुळे मास्क वापराच्या मूळ उद्दिष्टांची पूर्तता व्हावी, यासाठी दंड करण्यासोबत संबंधित नागरिकास एक मास्क देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मोफत पुरविला जात आहे. मास्क मोफत दिल्याची नोंद संबंधित दंडाच्या पावतीवर देखील केली जात आहे.

कोणत्या विभागात किती कारवाई?

झोन- व्यक्ती - दंड रुपये

झोन १ - ३,१७४८० - ६,४०,६६,५००

झोन २ - ४,००,०१६ - ८,०३,३४,५००

झोन ३ - ३,०५,०५८ - ६,२२,९७,२००

झोन ४ - ३,७४,८०१ - ७,५५,०५,६००

झोन ५ - २,५२,३०४ - ५,०६,७७,५००

झोन ६ - २,८२,७३८ - ५,६५,९२,२००

झोन ७ - ३,२२,६४६ - ६,५१,६५,३००

एकूण - २५,५३,५४६ - ५१,४६,००,४००

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.