चेन्नई/नवी दिल्ली: तामिळनाडू काँग्रेस पक्षाच्या एका नेत्याने गुजरात सुरत न्यायालयाच्या न्यायाधीशांची 'जीभ कापण्याची' धमकी दिली आहे. ज्यांनी 2019 च्या गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना दोषी ठरवले आणि त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. 'सर्व चोरांची नाव मोदी का आहेत' या विधानासाठी 23 मार्च रोजी कर्नाटकातील कोलार येथे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी दोषी आढळले. त्यानंतर लोकप्रतिनिधी कायद्याच्या तरतुदीनुसार त्यांना लोकसभेतून खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले.
त्यांना तुरुंगात टाकणारे तुम्ही कोण? : तामिळनाडूतील काँग्रेसचे नेते मणिकंदन यांनी न्यायमूर्ती एच वर्मा यांना काँग्रेस सत्तेवर आल्यावर त्यांची जीभ कापून टाकू, अशी धमकी दिली आहे. ते म्हणाले, '23 मार्च रोजी सुरत न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आमचे नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. न्यायमूर्ती एच वर्मा, काँग्रेस सत्तेवर आल्यावर तुमची जीभ कापून टाकू. त्यांना तुरुंगात टाकणारे तुम्ही कोण?' असही ते म्हणाले आहेत.
मणिकंदनविरुद्ध दिंडीगुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : काँग्रेस पक्षाच्या एसटी/एससी शाखा तामिळनाडूच्या दिंडीगुलमध्ये राहुल गांधींना खासदार म्हणून अपात्र ठरवल्याबद्दल निषेध करत होते, तेव्हा पक्षाचे जिल्हा प्रमुख मणिकंदन यांनी सुरत न्यायालयाच्या न्यायाधीशाविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली. भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) तीन कलमान्वये मणिकंदनविरुद्ध दिंडीगुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपचे प्रत्युत्तर : भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी मणिकंदनच्या टिप्पण्यांबद्दल काँग्रेसवर ताशेरे ओढले आहेत. म्हणाले, न्यायालयाने स्वतःहून दखल घ्यावी आणि 'न्यायव्यवस्थेला धमकावणारे पक्षाचे लोक' यासाठी राहुल गांधींना जबाबदार धरले पाहिजे असही ते म्हणाले आहेत.
न्यायालयाने स्वत:हून दखल घ्यावी : त्यांनी ट्विट केले की, 'तामिळनाडू काँग्रेसचे नेते म्हणतात की, पक्षाची सत्ता आल्यानंतर ते राहुल गांधींविरोधात निकाल देणाऱ्या न्यायाधीशाची 'जीभ कापून टाकतील'. न्यायालयाने स्वत:हून दखल घेऊन राहुलला अटक करावी. आपल्या पक्षाचे लोक न्यायपालिकेला धमकावत आहेत यासाठी राहुल जबाबदार आहेत का?' असही ते म्हणाले आहेत.
सार्वजनिक संस्थांचा गैरवापर : राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवल्यानंतर संपूर्ण देशात राजकीय खळबळ उडाली आहे. काँग्रेस केंद्र सरकारवर सार्वजनिक संस्थांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत असतानाच, भाजप न्यायालयीन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह आणि दबाव आणण्यासाठी काँग्रेसवर जोरदार प्रहार करत आहे.
हेही वाचा : CM Eknath Shinde Ayodhya Visit : मुख्यमंत्री स्पेशल विमानाने अयोध्येसाठी रवाना; भाजपचे अनेक मंत्री उपस्थित