ETV Bharat / bharat

Navratri 2022 : नवरात्रीत 9 दिवसाच्या उपवासात काय करावे आणि काय करू नये?

नवरात्रीच्या नऊ ( Navratri 2022 ) दिवसात उपवासाचा आहार हा संतुलित आणि पौष्टिक असायला हवा. नऊ दिवसांची उठण्यापासून झोपण्यापर्यंत आहारापासून व्यायामापर्यंतची दिनचर्या मध्ये काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेऊयात. ( What To Do And What Not To Do During The 9 Day Fast During Navratri )

author img

By

Published : Sep 19, 2022, 12:19 PM IST

What to do for nine days
उपवासात काय करावे आणि काय करू नये

नवरात्रीच्या नऊ दिवसात ( Navratri 2022 ) उपवासाचा आहार हा संतुलित आणि पौष्टिक असायला हवा. नऊ दिवसांची उठण्यापासून झोपण्यापर्यंत आहारापासून व्यायामापर्यंतची दिनचर्या मध्ये काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेऊयात. उपवासामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. शरीर विषमुक्त होण्यास उपवास फायदेशीर ठरतो. यामुळे केवळ शरीरालाच फायदा होतो असे नाही तर मनही उत्साही होते. ( What To Do And What Not To Do During The 9 Day Fast During Navratri )

नऊ दिवस काय करावे? ( What to do for nine days )

  • कमीत कमी सात ते आठ तास झोप घ्यावी. अपुर्‍या झोपेमुळे थकवा जाणवतो.
  • दिवसभरात दोन ते तीन लिटर पाणी प्यावे. उपवासादरम्यान पाणी पिण्याकडे दुर्लक्ष झाल्यास डिहायड्रेशनचा त्रास होतो. पाण्यासोबतच इतर द्रव पदार्थही शरीरात जाणे आवश्यक आहे. जसे लिंबू पाणी, नारळाचं पाणी, दही, ताक. यामुळे शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य राहाते.
  • दर दोन तीन तासांच्या अंतराने थोडे पौष्टिक खायला हवे. जे खाणार ते तेलकट, तळलेले नसावे याची काळजी घ्यायला हवी.
  • उपवास आहे थकवा येईल म्हणून अनेकजण व्यायाम करणं टाळतात. पण फिटनेस तज्ज्ञ म्हणतात की उपवास असला तरी रोज अर्धा तास फिरायला जावं किंवा योग सारखा व्यायाम करावा. व्यायामामुळे पचनक्रिया सुधारते. व्यायामामुळे शरीरातील अतिरिक्त उष्मांकही जळतात.
  • आपली विचार करण्याची पध्दत सकारात्मक ठेवावी. यामुळे शरीर आणि मनास ऊर्जा मिळते. नकारात्मक विचारसरणीने ऊर्जा खर्च होते.
  • उपवासाच्या काळात कोणताच मानसिक तणाव घेऊ नये.आपली विचार करण्याची पद्धत सकारात्मक ठेवावी.
  • उपवास आहे म्हणून खूप वेळा चहा पिऊ नये. दुपारी किंवा संध्याकाळी चहा प्यायचा असल्यास जिर्‍याचा किंवा ओव्याचा चहा प्यावा. या दोन प्रकारच्या चहामुळे शरीर डिटॉक्स होते. शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. शरीरातील फॅटस या दोन प्रकारच्या चहाने कमी होतात. संध्याकाळी नाश्त्याला नारळाचे पाणी पिणे फायदेशीर ठरते. नारळ पाण्यात पोटॅशियम भरपूर असते. शिवाय त्यात ब1, ब2, ब3 हे जीवनसत्त्वं असतात. ही जीवनसत्त्वं शरीरासाठी फायदेशीर असतात.
  • रोजच्या आहारात तीन चमचे साजूक तूप असायला हवे. वजन कमी करण्यासाठी साजूक तू मदत करत आहे. तुप हृदय हाडं मजबूत मार्ग. साजूक तुपात ओमेगा 6 हे फॅटी अँसिड सिग्नल. शरीरासाठी हा घटक खूप आवश्यक असतो.
  • उपवासाच्या बळावर शेंगदाण्याची अँगलर्जी रोज आनंदी भाजले शेंगदाणे गुळा स्थानिक खात. तसेच जवळ जवळ मखाना खाण्याचे फायदे. मखान्यात पक्ष फायदेबर. फॅट नसलेले वजन कमी करण्यासाठी मखाने उपयुक्त ठरतात.
  • उपवासाच्या खाली ठेवलेल्या पदार्थ ताजं दही, फळां, सुका मेवा खावा. रोज एकाच प्रकारचा सुकामेवा न खाते अदलून खावा. या नऊ दिवसात प्रकारची फळे न खाता एकाच फळांत खावीत आत्मीय शरीरास आवश्यक ती जीवनसत्त्वे, आणि सर्व खाणीत. पपई, अननस, सफरचंद, केळ, नाशिक ही फळं आलटून पालटून खावीत.

नऊ दिवस काय टाळावे? ( What to avoid for nine days )

  • उपवासाचे दिवस असले तरी अधिका काळ उपाशी राहू नये.
  • वजन कमी करायचं म्हणून नवरात्रीच्या उपवासाला सकाळी किंवा संध्याकाळी पूर्ण उपाशी राहू नये.
  • उपवास काळात बाहेर मिळणारे तयार ज्यूस, पॅकेटबंद ज्यूस पिऊ नये.
  • उपवासाला खूप तळलेले पदार्थ खाऊ नये. यामुळे पचन व्यवस्था बिघडून पोटाचे, पित्ताचे विकार होतात.
  • उपवासाचे पदार्थ खाताना एकाच वेळेस भरपूर न खाता नियमित अंतरानं थोडं थोडं पण पौष्टिक खावं. यामुळे पचन चांगलं होतं, शरीराला वेळोवेळी आवश्यक ऊर्जा मिळते. एकाच वेळी खूप खाल्ल्यास दिवसभर आळस राहातो. उपवासाच्या काळात हलका आहार हाच उत्तम असतो असं आहार तज्ज्ञ म्हणतात.
  • उपवासादरम्यान पाणी कमी प्यायल्यास शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते.

नवरात्रीच्या नऊ दिवसात ( Navratri 2022 ) उपवासाचा आहार हा संतुलित आणि पौष्टिक असायला हवा. नऊ दिवसांची उठण्यापासून झोपण्यापर्यंत आहारापासून व्यायामापर्यंतची दिनचर्या मध्ये काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेऊयात. उपवासामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. शरीर विषमुक्त होण्यास उपवास फायदेशीर ठरतो. यामुळे केवळ शरीरालाच फायदा होतो असे नाही तर मनही उत्साही होते. ( What To Do And What Not To Do During The 9 Day Fast During Navratri )

नऊ दिवस काय करावे? ( What to do for nine days )

  • कमीत कमी सात ते आठ तास झोप घ्यावी. अपुर्‍या झोपेमुळे थकवा जाणवतो.
  • दिवसभरात दोन ते तीन लिटर पाणी प्यावे. उपवासादरम्यान पाणी पिण्याकडे दुर्लक्ष झाल्यास डिहायड्रेशनचा त्रास होतो. पाण्यासोबतच इतर द्रव पदार्थही शरीरात जाणे आवश्यक आहे. जसे लिंबू पाणी, नारळाचं पाणी, दही, ताक. यामुळे शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य राहाते.
  • दर दोन तीन तासांच्या अंतराने थोडे पौष्टिक खायला हवे. जे खाणार ते तेलकट, तळलेले नसावे याची काळजी घ्यायला हवी.
  • उपवास आहे थकवा येईल म्हणून अनेकजण व्यायाम करणं टाळतात. पण फिटनेस तज्ज्ञ म्हणतात की उपवास असला तरी रोज अर्धा तास फिरायला जावं किंवा योग सारखा व्यायाम करावा. व्यायामामुळे पचनक्रिया सुधारते. व्यायामामुळे शरीरातील अतिरिक्त उष्मांकही जळतात.
  • आपली विचार करण्याची पध्दत सकारात्मक ठेवावी. यामुळे शरीर आणि मनास ऊर्जा मिळते. नकारात्मक विचारसरणीने ऊर्जा खर्च होते.
  • उपवासाच्या काळात कोणताच मानसिक तणाव घेऊ नये.आपली विचार करण्याची पद्धत सकारात्मक ठेवावी.
  • उपवास आहे म्हणून खूप वेळा चहा पिऊ नये. दुपारी किंवा संध्याकाळी चहा प्यायचा असल्यास जिर्‍याचा किंवा ओव्याचा चहा प्यावा. या दोन प्रकारच्या चहामुळे शरीर डिटॉक्स होते. शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. शरीरातील फॅटस या दोन प्रकारच्या चहाने कमी होतात. संध्याकाळी नाश्त्याला नारळाचे पाणी पिणे फायदेशीर ठरते. नारळ पाण्यात पोटॅशियम भरपूर असते. शिवाय त्यात ब1, ब2, ब3 हे जीवनसत्त्वं असतात. ही जीवनसत्त्वं शरीरासाठी फायदेशीर असतात.
  • रोजच्या आहारात तीन चमचे साजूक तूप असायला हवे. वजन कमी करण्यासाठी साजूक तू मदत करत आहे. तुप हृदय हाडं मजबूत मार्ग. साजूक तुपात ओमेगा 6 हे फॅटी अँसिड सिग्नल. शरीरासाठी हा घटक खूप आवश्यक असतो.
  • उपवासाच्या बळावर शेंगदाण्याची अँगलर्जी रोज आनंदी भाजले शेंगदाणे गुळा स्थानिक खात. तसेच जवळ जवळ मखाना खाण्याचे फायदे. मखान्यात पक्ष फायदेबर. फॅट नसलेले वजन कमी करण्यासाठी मखाने उपयुक्त ठरतात.
  • उपवासाच्या खाली ठेवलेल्या पदार्थ ताजं दही, फळां, सुका मेवा खावा. रोज एकाच प्रकारचा सुकामेवा न खाते अदलून खावा. या नऊ दिवसात प्रकारची फळे न खाता एकाच फळांत खावीत आत्मीय शरीरास आवश्यक ती जीवनसत्त्वे, आणि सर्व खाणीत. पपई, अननस, सफरचंद, केळ, नाशिक ही फळं आलटून पालटून खावीत.

नऊ दिवस काय टाळावे? ( What to avoid for nine days )

  • उपवासाचे दिवस असले तरी अधिका काळ उपाशी राहू नये.
  • वजन कमी करायचं म्हणून नवरात्रीच्या उपवासाला सकाळी किंवा संध्याकाळी पूर्ण उपाशी राहू नये.
  • उपवास काळात बाहेर मिळणारे तयार ज्यूस, पॅकेटबंद ज्यूस पिऊ नये.
  • उपवासाला खूप तळलेले पदार्थ खाऊ नये. यामुळे पचन व्यवस्था बिघडून पोटाचे, पित्ताचे विकार होतात.
  • उपवासाचे पदार्थ खाताना एकाच वेळेस भरपूर न खाता नियमित अंतरानं थोडं थोडं पण पौष्टिक खावं. यामुळे पचन चांगलं होतं, शरीराला वेळोवेळी आवश्यक ऊर्जा मिळते. एकाच वेळी खूप खाल्ल्यास दिवसभर आळस राहातो. उपवासाच्या काळात हलका आहार हाच उत्तम असतो असं आहार तज्ज्ञ म्हणतात.
  • उपवासादरम्यान पाणी कमी प्यायल्यास शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.