ETV Bharat / bharat

कोरोनाने भारतात ४ लाख नव्हे तर ४७ लाखांचा मृत्यू; अमेरिकेन संशोधन संस्थेचा दावा

author img

By

Published : Jul 22, 2021, 3:13 AM IST

वॉशिंग्टनमधील सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंटने जगभरातील कोरोनाने मृत्यू झालेली आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये सरकारी आकडेवारी, आंतरराष्ट्रीय अंदाज आणि घरांमधील सर्वेक्षणानुसारची आकडेवारीचा समावेश आहे. या अहवामध्ये भारत सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे.

COVID deaths In India
COVID deaths In India

हैदराबाद - भारतामध्ये सरकारी आकडेवारीच्या तुलनेत १० पट अधिक कोरोनाने मृत्यू झाले आहेत? असा दावा करणारी आकडेवारी एका अमेरिकन संस्थेने जाहीर केली आहे. या संस्थेच्या माहितीनुसार भारतात कोरोनाने सुमारे ५० लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

वॉशिंग्टनमधील सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंटने जगभरातील कोरोनाने मृत्यू झालेली आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये सरकारी आकडेवारी, आंतरराष्ट्रीय अंदाज आणि घरांमधील सर्वेक्षणानुसारची आकडेवारीचा समावेश आहे. या अहवामध्ये भारत सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे. या अहवालाच्या लेखकामध्ये मोदी सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांचादेखील समावेश आहे.

अहवालानुसार भारतात कोरोनाने ३४ ते ४७ लाखांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सरकारी आकडेवारीनुसार कोरोनाच्या मृत्युची आकडेवारी ४.१४ लाख आहे. याचा अर्थ सरकारी आकडेवारीच्या तुलनेत अहवालातील आकडेवारी ही १२ पटीने जास्त आहे. स्वातंत्र्य आणि भारत-पाकिस्तानच्या फाळणीनंतर देशातील मृत्यूची ही सर्वाधिक आकडेवारी आहे.

हेही वाचा-माळीण फाटा येथे 15 कोटी खर्चूनही खचला रस्ता! बारा गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता

सरकारी आकडेवारीबाबत संशय

एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उच्चांक गाठला होता. देशभरातील अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी जागा नव्हती. देशात ऑक्सिजनचा साठा कमी असल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण होता. जानेवारी २०२० ते जून २०२१ पर्यंत भारतात कोरोनाने ३४ लाख ते ४७ लाख जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज अहवालात करण्यात आला आहे.

हेही वाचा- Maharashtra Corona : चिंताजनक.. राज्यात रुग्णसंख्या व मृत्यूदरात वाढ, ८१५९ नवीन रुग्ण तर १६५ रुग्णांचा मृत्यू

१.१९ लाख मुलांनी गमाविले आई-वडील

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन ड्रग एब्यूज (एनआयडीए) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या अभ्यासानुसार भारतामध्ये २५,५०० मुलांनी आपल्या आईला गमाविले आहे. तर ९०,७५१ मुलांना पित्याला गमाविले आहे. महामारीच्या पूर्वी १४ महिन्यांत देशातील १.९९ लाख मुलांना आई-वडिलांना गमाविले होते. तर कोरोना काळात २१ देशांमध्ये १५ लाखांहून अधिक मुलांनी आई-वडिलांना गमाविले आहे.

हेही वाचा-जुन्या कसारा घाटात पुन्हा कोसळली दरड; उंबरमाळी स्थानकात ३ फूट पाणी

कोरोनाची तिसरी लाट येण्याची अंदाज

देशात कोरोनाचा कहर आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र असले तरी तिसऱ्या लाटेचा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. येत्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस देशात कोरोनाची तिसरी लाट धडकेल, असा इशारा इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चमधील (ICMR) महामारी विज्ञान आणि संक्रमन रोगांचे प्रमुख डॉ. समीरण पांडा यांनी दिली. तसेच पहिल्या दोन लाटेचा प्रभाव न झालेल्या राज्यांनाही त्यांनी सतर्क राहण्यास सांगितले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जर निर्बंध लादले नाहीत. तर तीव्र तिसर्‍या लाटेचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे. प्रत्येक राज्यांनी रुग्णांची तपासणी करणे आणि तेथील कोरोना परिस्थितीचे परीक्षण करणे महत्वाचे असल्याचे डॉ पांडा म्हणाले.

हैदराबाद - भारतामध्ये सरकारी आकडेवारीच्या तुलनेत १० पट अधिक कोरोनाने मृत्यू झाले आहेत? असा दावा करणारी आकडेवारी एका अमेरिकन संस्थेने जाहीर केली आहे. या संस्थेच्या माहितीनुसार भारतात कोरोनाने सुमारे ५० लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

वॉशिंग्टनमधील सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंटने जगभरातील कोरोनाने मृत्यू झालेली आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये सरकारी आकडेवारी, आंतरराष्ट्रीय अंदाज आणि घरांमधील सर्वेक्षणानुसारची आकडेवारीचा समावेश आहे. या अहवामध्ये भारत सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे. या अहवालाच्या लेखकामध्ये मोदी सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांचादेखील समावेश आहे.

अहवालानुसार भारतात कोरोनाने ३४ ते ४७ लाखांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सरकारी आकडेवारीनुसार कोरोनाच्या मृत्युची आकडेवारी ४.१४ लाख आहे. याचा अर्थ सरकारी आकडेवारीच्या तुलनेत अहवालातील आकडेवारी ही १२ पटीने जास्त आहे. स्वातंत्र्य आणि भारत-पाकिस्तानच्या फाळणीनंतर देशातील मृत्यूची ही सर्वाधिक आकडेवारी आहे.

हेही वाचा-माळीण फाटा येथे 15 कोटी खर्चूनही खचला रस्ता! बारा गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता

सरकारी आकडेवारीबाबत संशय

एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उच्चांक गाठला होता. देशभरातील अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी जागा नव्हती. देशात ऑक्सिजनचा साठा कमी असल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण होता. जानेवारी २०२० ते जून २०२१ पर्यंत भारतात कोरोनाने ३४ लाख ते ४७ लाख जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज अहवालात करण्यात आला आहे.

हेही वाचा- Maharashtra Corona : चिंताजनक.. राज्यात रुग्णसंख्या व मृत्यूदरात वाढ, ८१५९ नवीन रुग्ण तर १६५ रुग्णांचा मृत्यू

१.१९ लाख मुलांनी गमाविले आई-वडील

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन ड्रग एब्यूज (एनआयडीए) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या अभ्यासानुसार भारतामध्ये २५,५०० मुलांनी आपल्या आईला गमाविले आहे. तर ९०,७५१ मुलांना पित्याला गमाविले आहे. महामारीच्या पूर्वी १४ महिन्यांत देशातील १.९९ लाख मुलांना आई-वडिलांना गमाविले होते. तर कोरोना काळात २१ देशांमध्ये १५ लाखांहून अधिक मुलांनी आई-वडिलांना गमाविले आहे.

हेही वाचा-जुन्या कसारा घाटात पुन्हा कोसळली दरड; उंबरमाळी स्थानकात ३ फूट पाणी

कोरोनाची तिसरी लाट येण्याची अंदाज

देशात कोरोनाचा कहर आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र असले तरी तिसऱ्या लाटेचा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. येत्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस देशात कोरोनाची तिसरी लाट धडकेल, असा इशारा इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चमधील (ICMR) महामारी विज्ञान आणि संक्रमन रोगांचे प्रमुख डॉ. समीरण पांडा यांनी दिली. तसेच पहिल्या दोन लाटेचा प्रभाव न झालेल्या राज्यांनाही त्यांनी सतर्क राहण्यास सांगितले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जर निर्बंध लादले नाहीत. तर तीव्र तिसर्‍या लाटेचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे. प्रत्येक राज्यांनी रुग्णांची तपासणी करणे आणि तेथील कोरोना परिस्थितीचे परीक्षण करणे महत्वाचे असल्याचे डॉ पांडा म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.