ETV Bharat / bharat

Urvashi and Rishabh controversy : पंतच्या व्हायरल इन्स्टाग्राम स्टोरीवर उर्वशीची प्रतिक्रिया; म्हणाली, छोटू भैया...!

author img

By

Published : Aug 12, 2022, 12:51 PM IST

Updated : Aug 12, 2022, 1:23 PM IST

ऋषभ पंतसोबतचा तिचा वाद पुढे रेटत बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने ट्विट ( Bollywood actress Urvashi Rautela tweet ) करून उत्तर दिले आहे. आपल्या ट्विटमध्ये तिने पंतला छोटू भैया म्हणण्यासोबतच क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला आहे.

Urvashi and Rishabh controversy
उर्वशी आणि ऋषभचा वाद

हैदराबाद : भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत ( Wicketkeeper Rishabh Pant ) सध्या बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत ( Bollywood actress Urvashi Rautela ) चर्चेत आहे. उर्वशीच्या एका वक्तव्यानंतर दोघेही पुन्हा एकदा चर्चेत आले. खरं तर, नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, बॉलीवूड अभिनेत्रीने 'मिस्टर आरपी' बद्दल एक किस्सा सांगितला होता. त्यानंतर पंतची इन्स्टा स्टोरी सांगून एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये असे लिहिले होते की 'माझा पाठलाग सोड बहिणी, खोटे बोलण्याची पण मर्यादा असते.' आता हा वाद पुढे नेत उर्वशी रौतेलाने ट्विट करून उत्तर दिले आहे.

या ट्विटमध्ये ( Actress Urvashi Rautela tweet ) उर्वशीने ऋषभ पंतला छोटू भैया असे संबोधले ( Urvashi called Rishabh Pant Chotu Bhaiya ) असून पंतला क्रिकेट खेळण्याचा सल्लाही दिला आहे. उर्वशीने तिच्या ताज्या ट्विटमध्ये लिहिले की, 'छोटू भैय्याने बॅट बॉल खेळावा. मी कुठली मुन्नी नाही, जी बदनाम होईल तुझ्यासाठी, यंग किड्डो डार्लिंग.'

उर्वशी रौतेलाने नुकतीच एक मुलाखत ( Urvashi Rautela Interview ) दिली होती, ज्यामध्ये तिने मिस्टर आरपीबद्दल एक किस्सा सांगताना म्हणालील होती, 'मी वाराणसीमध्ये शूटिंग करून दिल्लीला आले होते, जिथे माझा शो होणार होता. मी दिवसभर शूटिंग केले. मिस्टर आरपी मला भेटायला आले होते आणि ते लॉबीमध्ये माझी वाट पाहत होते. 10 तासांच्या शूटिंगनंतर मी परत आले, तेव्हा मी खुप थकले होती आणि त्यामुळे मी झोपी गेली. मला कितीतरी वेळा फोन आला, पण मला कळले नाही. मला जाग आली तेव्हा मला 16-17 मिस्ड कॉल्स दिसले. तेव्हा मला खूप वाईट वाटलं. मग मी त्याला म्हणाले की, तू मुंबईला आल्यावर आपण तिथे भेटू.''

यानंतर, पंतची इन्स्टा स्टोरी सांगून एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल ( Rishabh Pant Instagram Story ) झाला आहे. ज्यामध्ये असे लिहिले आहे की, "काही लोक मुलाखतींमध्ये खोटे बोलतात जेणेकरून ते लोकप्रियता मिळवू शकतील आणि हेडलाइनमध्ये येतील. काही लोक लोकप्रियतेचे भुकेले आहेत हे किती वाईट आहे. देव त्यांना सुखी ठेवो. माझा पाठलाग सोड बहिणी, खोटं बोलायला पण मर्यादा असतात.'

काही वृत्तांच्या माहितीनुसार, ऋषभ पंतने ही इन्स्टा स्टोरी काही वेळातच डिलीट केली. पण पंतने अशी स्टोरी पोस्ट केली होती की नाही, याची पुष्टी झालेली नाही.

हेही वाचा - Virat Kohli Training Session : आशिया चषक २०२२ पूर्वी विराट कोहलीने सरावाला केली सुरुवात

हैदराबाद : भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत ( Wicketkeeper Rishabh Pant ) सध्या बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत ( Bollywood actress Urvashi Rautela ) चर्चेत आहे. उर्वशीच्या एका वक्तव्यानंतर दोघेही पुन्हा एकदा चर्चेत आले. खरं तर, नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, बॉलीवूड अभिनेत्रीने 'मिस्टर आरपी' बद्दल एक किस्सा सांगितला होता. त्यानंतर पंतची इन्स्टा स्टोरी सांगून एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये असे लिहिले होते की 'माझा पाठलाग सोड बहिणी, खोटे बोलण्याची पण मर्यादा असते.' आता हा वाद पुढे नेत उर्वशी रौतेलाने ट्विट करून उत्तर दिले आहे.

या ट्विटमध्ये ( Actress Urvashi Rautela tweet ) उर्वशीने ऋषभ पंतला छोटू भैया असे संबोधले ( Urvashi called Rishabh Pant Chotu Bhaiya ) असून पंतला क्रिकेट खेळण्याचा सल्लाही दिला आहे. उर्वशीने तिच्या ताज्या ट्विटमध्ये लिहिले की, 'छोटू भैय्याने बॅट बॉल खेळावा. मी कुठली मुन्नी नाही, जी बदनाम होईल तुझ्यासाठी, यंग किड्डो डार्लिंग.'

उर्वशी रौतेलाने नुकतीच एक मुलाखत ( Urvashi Rautela Interview ) दिली होती, ज्यामध्ये तिने मिस्टर आरपीबद्दल एक किस्सा सांगताना म्हणालील होती, 'मी वाराणसीमध्ये शूटिंग करून दिल्लीला आले होते, जिथे माझा शो होणार होता. मी दिवसभर शूटिंग केले. मिस्टर आरपी मला भेटायला आले होते आणि ते लॉबीमध्ये माझी वाट पाहत होते. 10 तासांच्या शूटिंगनंतर मी परत आले, तेव्हा मी खुप थकले होती आणि त्यामुळे मी झोपी गेली. मला कितीतरी वेळा फोन आला, पण मला कळले नाही. मला जाग आली तेव्हा मला 16-17 मिस्ड कॉल्स दिसले. तेव्हा मला खूप वाईट वाटलं. मग मी त्याला म्हणाले की, तू मुंबईला आल्यावर आपण तिथे भेटू.''

यानंतर, पंतची इन्स्टा स्टोरी सांगून एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल ( Rishabh Pant Instagram Story ) झाला आहे. ज्यामध्ये असे लिहिले आहे की, "काही लोक मुलाखतींमध्ये खोटे बोलतात जेणेकरून ते लोकप्रियता मिळवू शकतील आणि हेडलाइनमध्ये येतील. काही लोक लोकप्रियतेचे भुकेले आहेत हे किती वाईट आहे. देव त्यांना सुखी ठेवो. माझा पाठलाग सोड बहिणी, खोटं बोलायला पण मर्यादा असतात.'

काही वृत्तांच्या माहितीनुसार, ऋषभ पंतने ही इन्स्टा स्टोरी काही वेळातच डिलीट केली. पण पंतने अशी स्टोरी पोस्ट केली होती की नाही, याची पुष्टी झालेली नाही.

हेही वाचा - Virat Kohli Training Session : आशिया चषक २०२२ पूर्वी विराट कोहलीने सरावाला केली सुरुवात

Last Updated : Aug 12, 2022, 1:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.