ETV Bharat / bharat

​कर्नाटकात भीषण अपघात; महाराष्ट्रातील दोन कबड्डीपटूंचा मृत्यू

author img

By

Published : Mar 17, 2021, 1:22 PM IST

कर्नाटकातील विजयपुरा शहराजवळ दोन वाहनांची धडक झाल्याने मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये महाराष्ट्रातील दोन कबड्डीपटूंनी आपला जीव गमावला.

अपघात
अपघात

विजयपुरा - कर्नाटकातील विजयपुरा शहराजवळ बुधवारी पहाटे दोन वाहनांची धडक झाल्याने मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये महाराष्ट्रातील दोन कबड्डीपटूंनी आपला जीव गमावला. तर 6 जण जखमी झाले. सोहेल (वय 22) आणि महादेव (वय 20) अशी मृतांची नावे आहेत.

कर्नाटकातील बागलकोटे जिल्ह्यातील तुळसीगेरी गावात कबड्डी प्रो लीग स्पर्धेत भाग घेण्यासाठी महाराष्ट्रातील बारामती येथून खेळाडू जात होते. तेव्हा हा अपघात झाल्याची माहिती आहे. एकूण आठ खेळाडू या वाहनातून प्रवास करीत होते. त्यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला.

जखमींना कोल्हारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले व नंतर पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. कोल्हारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप अपघाताचे कारण निश्चित झालेले नाही.

दररोज सरासरी 415 जणांचा मृत्यू -

देशातील वेगवेगळ्या भागात सातत्याने अपघातांच्या घटना घडत आहेत. रस्ते अपघात आणि त्यातील मृतांची संख्या बघितली तर आपल्या देशात रस्ता सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे स्पष्टपणे जाणवते. सरकारी आकडेवारीनुसार देशात रस्ते अपघातात दररोज सरासरी 415 जणांचा मृत्यू होतो. तर दरवर्षी साडेतीन लाखांहून अधिक लोकांना अपघातामुळे कायमच्या अपंगत्वाला सामोरे जावे लागते.

हेही वाचा - 'दंगल गर्ल' बबिता फोगटच्या बहिणीची आत्महत्या

विजयपुरा - कर्नाटकातील विजयपुरा शहराजवळ बुधवारी पहाटे दोन वाहनांची धडक झाल्याने मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये महाराष्ट्रातील दोन कबड्डीपटूंनी आपला जीव गमावला. तर 6 जण जखमी झाले. सोहेल (वय 22) आणि महादेव (वय 20) अशी मृतांची नावे आहेत.

कर्नाटकातील बागलकोटे जिल्ह्यातील तुळसीगेरी गावात कबड्डी प्रो लीग स्पर्धेत भाग घेण्यासाठी महाराष्ट्रातील बारामती येथून खेळाडू जात होते. तेव्हा हा अपघात झाल्याची माहिती आहे. एकूण आठ खेळाडू या वाहनातून प्रवास करीत होते. त्यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला.

जखमींना कोल्हारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले व नंतर पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. कोल्हारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप अपघाताचे कारण निश्चित झालेले नाही.

दररोज सरासरी 415 जणांचा मृत्यू -

देशातील वेगवेगळ्या भागात सातत्याने अपघातांच्या घटना घडत आहेत. रस्ते अपघात आणि त्यातील मृतांची संख्या बघितली तर आपल्या देशात रस्ता सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे स्पष्टपणे जाणवते. सरकारी आकडेवारीनुसार देशात रस्ते अपघातात दररोज सरासरी 415 जणांचा मृत्यू होतो. तर दरवर्षी साडेतीन लाखांहून अधिक लोकांना अपघातामुळे कायमच्या अपंगत्वाला सामोरे जावे लागते.

हेही वाचा - 'दंगल गर्ल' बबिता फोगटच्या बहिणीची आत्महत्या

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.