ETV Bharat / bharat

Mobile Recharge : मोबाईल कंपन्यांना 30 दिवसांच्या वैधतेसह व्हाउचर ऑफर करण्याचे आदेश

author img

By

Published : Oct 3, 2022, 5:19 PM IST

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ( Telecom Regulatory Authority of India ) ने दूरसंचार कंपन्यांना 30 दिवसांच्या वैधतेसह व्हाउचर ऑफर करावे लागतील असे सोमवारी ( voucher validity of 30 days ) सांगितले .मात्र, यातून प्रत्यक्षात ग्राहकांचा फायदा होत नसल्याच्या तक्रारी आल्या. त्यामुळे दूरसंचार नियंत्रण प्राधिकरणाने (TRAI) देशभरातील सर्व मोबाईल ग्राहकांना दिलासा देणारा नवीन आदेश जारी केला आहे.

Mobile Recharge
Mobile Recharge

नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ( Telecom Regulatory Authority of India ) ने दूरसंचार कंपन्यांना 30 दिवसांच्या वैधतेसह व्हाउचर ऑफर करावे लागतील असे सोमवारी ( voucher validity of 30 days ) सांगितले .मात्र, यातून प्रत्यक्षात ग्राहकांचा फायदा होत नसल्याच्या तक्रारी आल्या. त्यामुळे दूरसंचार नियंत्रण प्राधिकरणाने ( TRAI ) देशभरातील सर्व मोबाईल ग्राहकांना दिलासा देणारा नवीन आदेश जारी केला ( Mobile Recharge ) आहे. या आधी ट्रायने त्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यावर कोणतीही दखल घेण्यात आली नाही.

एक नवा प्लॅन :"प्रत्येक दूरसंचार सेवा कंपनीने ( Telecom companies ) कमीत कमी एक प्लॅन व्हाउचर, एक स्पेशल टॅरिफ व्हाउचर आणि एक कॉम्बो व्हाउचर ऑफर जारी (Telecom companies offer voucher ) केले पाहिजे जे दर महिन्याच्या त्याच तारखेला संपतील. ज्या तारखेला त्याचा रिचार्ज केला होता. त्याची तारीख त्या महिन्यात उपलब्ध नसेल तर, ती पुढच्या महिन्याची पहिली तारीख असेल." असे दूरसंचार नियामकाने आदेशात म्हटले आहे.

व्हॅलिडीटी प्लॅन ३० दिवसांचा : आता दूरसंचार पुरवठा कंपन्यांना आपला किमान रिचार्ज व्हॅलिडीटी प्लॅन ३० दिवसांचा ठेवावा लागणार आहे. ग्राहकांकडून मागणी झाल्यानंतर यावर्षी एप्रिल महिन्यात ट्रायने या संदर्भात दूरसंचार कंपन्यांना सूचित केले होते. दूरसंचार कंपन्यांचा प्लॅन व्हाउचर नूतनीकरण करताना किमान एक असा दर आणावा तसेच त्याची किमान वैधता ३० दिवसांची असावी, असे म्हटले होते.

विशेष व्हाउचर ऑफर : मात्र, त्यात बदल होत नसल्याचे पाहून आता थेट आदेशच काढण्यात आला आहे. यानुसार आता दूरसंचार सेवा प्रदाता कंपन्यांना २४ व २८ दिवसांच्या ऐवजी ३० दिवसांच्या वैधतेसह रिचार्ज कूपन आणि विशेष व्हाउचर ऑफर करावे लागणार आहेत.

नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ( Telecom Regulatory Authority of India ) ने दूरसंचार कंपन्यांना 30 दिवसांच्या वैधतेसह व्हाउचर ऑफर करावे लागतील असे सोमवारी ( voucher validity of 30 days ) सांगितले .मात्र, यातून प्रत्यक्षात ग्राहकांचा फायदा होत नसल्याच्या तक्रारी आल्या. त्यामुळे दूरसंचार नियंत्रण प्राधिकरणाने ( TRAI ) देशभरातील सर्व मोबाईल ग्राहकांना दिलासा देणारा नवीन आदेश जारी केला ( Mobile Recharge ) आहे. या आधी ट्रायने त्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यावर कोणतीही दखल घेण्यात आली नाही.

एक नवा प्लॅन :"प्रत्येक दूरसंचार सेवा कंपनीने ( Telecom companies ) कमीत कमी एक प्लॅन व्हाउचर, एक स्पेशल टॅरिफ व्हाउचर आणि एक कॉम्बो व्हाउचर ऑफर जारी (Telecom companies offer voucher ) केले पाहिजे जे दर महिन्याच्या त्याच तारखेला संपतील. ज्या तारखेला त्याचा रिचार्ज केला होता. त्याची तारीख त्या महिन्यात उपलब्ध नसेल तर, ती पुढच्या महिन्याची पहिली तारीख असेल." असे दूरसंचार नियामकाने आदेशात म्हटले आहे.

व्हॅलिडीटी प्लॅन ३० दिवसांचा : आता दूरसंचार पुरवठा कंपन्यांना आपला किमान रिचार्ज व्हॅलिडीटी प्लॅन ३० दिवसांचा ठेवावा लागणार आहे. ग्राहकांकडून मागणी झाल्यानंतर यावर्षी एप्रिल महिन्यात ट्रायने या संदर्भात दूरसंचार कंपन्यांना सूचित केले होते. दूरसंचार कंपन्यांचा प्लॅन व्हाउचर नूतनीकरण करताना किमान एक असा दर आणावा तसेच त्याची किमान वैधता ३० दिवसांची असावी, असे म्हटले होते.

विशेष व्हाउचर ऑफर : मात्र, त्यात बदल होत नसल्याचे पाहून आता थेट आदेशच काढण्यात आला आहे. यानुसार आता दूरसंचार सेवा प्रदाता कंपन्यांना २४ व २८ दिवसांच्या ऐवजी ३० दिवसांच्या वैधतेसह रिचार्ज कूपन आणि विशेष व्हाउचर ऑफर करावे लागणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.