ETV Bharat / bharat

Eastern Ladakh Situation : पूर्व लडाखमध्ये परिस्थिती स्थिर परंतु भविष्यात... लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांचे भारत-चीन वादावर भाष्य

author img

By

Published : Nov 13, 2022, 9:41 AM IST

भारत चिमनधील वादाच्या सात मुद्यांपैकी पाच मुद्यांवर चर्चेतून मुद्दे सोडवले गेले आहेत असे लष्करप्रमुख म्हणाले आहेत. त्यांनी असेही सांगितले की लदाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चिनी सैन्याच्या संख्येत कोणतीही घट झालेली नाही, परंतू हिवाळा सुरू झाल्याने काही भारतीय पीएलए ब्रिगेड परत येण्याचे संकेत ( eastern Ladakh Situation stable but not permanent ) आहेत.

Manoj Pandey
मनोज पांडे

नवी दिल्ली : लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी शनिवारी सांगितले की, चीनच्या सीमेवर 30 महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या गतिरोधाच्या दरम्यान पूर्व लडाखमध्ये 'परिस्थिती स्थिर आहे, परंतु ( eastern Ladakh Situation stable but not permanent ) भविष्याचा अंदाज सांगता येत नाही . एका थिंक टँकला संबोधित करताना जनरल पांडे पुढे म्हणाले की, भारत आणि चीन यांच्यात लष्करी चर्चेची पुढची फेरी होणार आहे. या वादाच्या उर्वरित दोन मुद्द्यांशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यावर यात भर असेल. डेमचोक आणि डेपसांगचा उल्लेख करताना त्यांनी हे म्हटल्याचा अंदाज बांधला जात आहे.

चर्चेतून मुद्दे सोडवले : लष्करप्रमुख म्हणाले की, वादाच्या सात मुद्यांपैकी पाच मुद्यांवर चर्चेतून मुद्दे सोडवले गेले ( Army Chief General Manoj Pandey ) आहेत. त्यांनी असेही सांगितले की या प्रदेशात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) चिनी सैन्याच्या संख्येत कोणतीही घट झालेली नाही, परंतु हिवाळा सुरू झाल्याने काही पीएलए ब्रिगेड परत येण्याचे संकेत आहेत. त्यांनी 'चाणक्य संवाद' मध्ये म्हटले आहे की, वास्तविक नियंत्रण रेषेवरील त्याच्या कृतीचे व्यापक संदर्भात काळजीपूर्वक मूल्यांकन करणे आवश्यक आहे जेणेकरून भारताकडून आपल्या नागरिकांचे रक्षण करू शकेल.

चीनसोबत उच्चस्तरीय चर्चा : जनरल पांडे एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले, "जर मला त्या परिस्थितीची एक वाक्यात व्याख्या करायची असेल, तर परिस्थिती स्थिर आहे असे मी म्हणेन. परंतू कायम स्वरूपी नसेल." उर्वरित प्रश्न सोडवण्यासाठी चीनसोबत उच्चस्तरीय लष्करी चर्चेच्या पुढील फेरीबाबत भारत आशावादी आहे, असे ते म्हणाले. आम्ही चर्चेच्या 17 व्या फेरीच्या तारखेचा विचार करत आहोत. सीमा भागात चीनच्या पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या विषयावर हे सातत्याने घडत आहे असे लष्करप्रमुख ( high level talks with china ) म्हणाले.

नियंत्रण रेषेवरील कृती काळजीपूर्वक : या भागातील भारतीय लष्कराच्या तयारीबाबत ते म्हणाले, हिवाळ्याच्या ऋतूला अनुकूल अशी तयारी सुरू आहे. जनरल पांडे म्हणाले की, नागरिकांचे हित जपण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील आमच्या कृती "खूप काळजीपूर्वक असण्याची गरज आहे. असे ते म्हणाले.

नवी दिल्ली : लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी शनिवारी सांगितले की, चीनच्या सीमेवर 30 महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या गतिरोधाच्या दरम्यान पूर्व लडाखमध्ये 'परिस्थिती स्थिर आहे, परंतु ( eastern Ladakh Situation stable but not permanent ) भविष्याचा अंदाज सांगता येत नाही . एका थिंक टँकला संबोधित करताना जनरल पांडे पुढे म्हणाले की, भारत आणि चीन यांच्यात लष्करी चर्चेची पुढची फेरी होणार आहे. या वादाच्या उर्वरित दोन मुद्द्यांशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यावर यात भर असेल. डेमचोक आणि डेपसांगचा उल्लेख करताना त्यांनी हे म्हटल्याचा अंदाज बांधला जात आहे.

चर्चेतून मुद्दे सोडवले : लष्करप्रमुख म्हणाले की, वादाच्या सात मुद्यांपैकी पाच मुद्यांवर चर्चेतून मुद्दे सोडवले गेले ( Army Chief General Manoj Pandey ) आहेत. त्यांनी असेही सांगितले की या प्रदेशात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) चिनी सैन्याच्या संख्येत कोणतीही घट झालेली नाही, परंतु हिवाळा सुरू झाल्याने काही पीएलए ब्रिगेड परत येण्याचे संकेत आहेत. त्यांनी 'चाणक्य संवाद' मध्ये म्हटले आहे की, वास्तविक नियंत्रण रेषेवरील त्याच्या कृतीचे व्यापक संदर्भात काळजीपूर्वक मूल्यांकन करणे आवश्यक आहे जेणेकरून भारताकडून आपल्या नागरिकांचे रक्षण करू शकेल.

चीनसोबत उच्चस्तरीय चर्चा : जनरल पांडे एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले, "जर मला त्या परिस्थितीची एक वाक्यात व्याख्या करायची असेल, तर परिस्थिती स्थिर आहे असे मी म्हणेन. परंतू कायम स्वरूपी नसेल." उर्वरित प्रश्न सोडवण्यासाठी चीनसोबत उच्चस्तरीय लष्करी चर्चेच्या पुढील फेरीबाबत भारत आशावादी आहे, असे ते म्हणाले. आम्ही चर्चेच्या 17 व्या फेरीच्या तारखेचा विचार करत आहोत. सीमा भागात चीनच्या पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या विषयावर हे सातत्याने घडत आहे असे लष्करप्रमुख ( high level talks with china ) म्हणाले.

नियंत्रण रेषेवरील कृती काळजीपूर्वक : या भागातील भारतीय लष्कराच्या तयारीबाबत ते म्हणाले, हिवाळ्याच्या ऋतूला अनुकूल अशी तयारी सुरू आहे. जनरल पांडे म्हणाले की, नागरिकांचे हित जपण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील आमच्या कृती "खूप काळजीपूर्वक असण्याची गरज आहे. असे ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.