ETV Bharat / bharat

Sharad Pawar : "विजय उद्धव ठाकरेंचा होईल, चाळीस पन्नास आमदारांच्या..."; शरद पवारांनी केलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक

विजय उद्धव ठाकरेंचा होईल. चाळीस ते पन्नास आमदारांच्या बंडखोरींनी शिवसेनेवर परिणाम होणार नाही, असे शरद पवारांनी म्हटलं ( Sharad Pawar On Maharashtra Political Crisis ) आहे.

author img

By

Published : Jun 26, 2022, 6:41 PM IST

Updated : Jun 26, 2022, 7:13 PM IST

Sharad Pawar
Sharad Pawar

दिल्ली - नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळी सध्या सुरु असलेल्या सत्तासंघर्षांत विजय सत्याचा की प्रलोभनाचा होईल, असा सवाल प्रसारमाध्यमांनी पवार यांना केला होता. त्यावर विजय उद्धव ठाकरेंचा होईल. चाळीस ते पन्नास आमदारांच्या बंडखोरींनी शिवसेनेवर परिणाम होणार नाही, असे शरद पवारांनी म्हटलं ( Sharad Pawar On Maharashtra Political Crisis ) आहे.

"आमचा महाविकास आघाडीला पाठींबा" - शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रातील परिस्थिती कशी सुधरता येईल, याचा निर्णय आम्हाला तेथेच घ्यायचा आहे. आसाममध्ये गेलेल्या शिवसेनेच्या काही आमदारांची वक्तव्य समोर आली आहेत. त्यातून स्पष्ट होते आहे की त्यांना सत्तापरिवर्तन हवं आहे. शिवसेनेला खात्री आहे त्यांची लोक परत येतील आणि त्यांच्या भूमिकेत बदल होईल. आमचा महाविकास आघाडीला पाठींबा आहे.

"राष्ट्रपती राजवट लागू झाली तर..." - एकनाथ शिंदे सोबत गेलेल्या आमदारांनी नवा गट स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार टिकवण्यासाठी आम्ही शिवसेनेला पाठींबा देऊ. तसेच, राज्यात राष्ट्रपती राजवट लागल्यास बंडखोर शिवसेना आमदारांच्या मेहनतीवर पाणी फिरेल. राष्ट्रपती राजवट लागली तर पुन्हा निवडणुका होतील, असे पवारांनी स्पष्ट केलं आहे.

  • Eknath Shinde & other MLAs who've gone with him(to Guwahati)have said to form a new alliance but NCP & Congress policy is clear to support the coalition govt that we had formed. MVA govt is there(in Maharashtra) & we want to continue supporting it: NCP chief Sharad Pawar in Delhi pic.twitter.com/kMydLJyZl2

    — ANI (@ANI) June 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

"... राष्ट्रवादीचा त्रास झाला नाही" - शिंदे गटाकडे संख्याबळ आहे, तर ते तिकडे का बसले आहे. त्यांनी मुंबईमध्ये येऊन राज्यपालांकडे दावा का केला नाही?, असा सवाल उपस्थित करत पवार म्हणाले, अडीच वर्ष ते राष्ट्रवादीसोबत होते. तेव्हा त्यांना राष्ट्रवादीचा त्रास झाला नाही. आता का झाला आहे. ही फक्त कारणं आहेत, असा निशाणा पवार यांनी बंडखोर आमदारांवर साधला आहे.

"राष्ट्रवादी, सीपीएम आणि तृणमूलचा शिंदेंना..." - एकनाथ शिंदे यांनी एका राष्ट्रीय पक्षाचा पाठींबा त्यांना असल्याचे म्हटलं होतं. त्यावर शरद पवार यांनी सांगितले की, माझ्याकडे राष्ट्रीय पक्षाची यादी आहे. त्यात राष्ट्रवादी, सीपीएम आणि तृणमूलचा शिंदेंना पाठींबा नाही. मग कोणता राष्ट्रीय पक्ष उरला, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा - Kamat On Rebel MLAs Suspension : शिवसेनेचे बंडखोर आमदार अपात्र होणारच, सेनेचे वकील कामतांचा दावा

दिल्ली - नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळी सध्या सुरु असलेल्या सत्तासंघर्षांत विजय सत्याचा की प्रलोभनाचा होईल, असा सवाल प्रसारमाध्यमांनी पवार यांना केला होता. त्यावर विजय उद्धव ठाकरेंचा होईल. चाळीस ते पन्नास आमदारांच्या बंडखोरींनी शिवसेनेवर परिणाम होणार नाही, असे शरद पवारांनी म्हटलं ( Sharad Pawar On Maharashtra Political Crisis ) आहे.

"आमचा महाविकास आघाडीला पाठींबा" - शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रातील परिस्थिती कशी सुधरता येईल, याचा निर्णय आम्हाला तेथेच घ्यायचा आहे. आसाममध्ये गेलेल्या शिवसेनेच्या काही आमदारांची वक्तव्य समोर आली आहेत. त्यातून स्पष्ट होते आहे की त्यांना सत्तापरिवर्तन हवं आहे. शिवसेनेला खात्री आहे त्यांची लोक परत येतील आणि त्यांच्या भूमिकेत बदल होईल. आमचा महाविकास आघाडीला पाठींबा आहे.

"राष्ट्रपती राजवट लागू झाली तर..." - एकनाथ शिंदे सोबत गेलेल्या आमदारांनी नवा गट स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार टिकवण्यासाठी आम्ही शिवसेनेला पाठींबा देऊ. तसेच, राज्यात राष्ट्रपती राजवट लागल्यास बंडखोर शिवसेना आमदारांच्या मेहनतीवर पाणी फिरेल. राष्ट्रपती राजवट लागली तर पुन्हा निवडणुका होतील, असे पवारांनी स्पष्ट केलं आहे.

  • Eknath Shinde & other MLAs who've gone with him(to Guwahati)have said to form a new alliance but NCP & Congress policy is clear to support the coalition govt that we had formed. MVA govt is there(in Maharashtra) & we want to continue supporting it: NCP chief Sharad Pawar in Delhi pic.twitter.com/kMydLJyZl2

    — ANI (@ANI) June 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

"... राष्ट्रवादीचा त्रास झाला नाही" - शिंदे गटाकडे संख्याबळ आहे, तर ते तिकडे का बसले आहे. त्यांनी मुंबईमध्ये येऊन राज्यपालांकडे दावा का केला नाही?, असा सवाल उपस्थित करत पवार म्हणाले, अडीच वर्ष ते राष्ट्रवादीसोबत होते. तेव्हा त्यांना राष्ट्रवादीचा त्रास झाला नाही. आता का झाला आहे. ही फक्त कारणं आहेत, असा निशाणा पवार यांनी बंडखोर आमदारांवर साधला आहे.

"राष्ट्रवादी, सीपीएम आणि तृणमूलचा शिंदेंना..." - एकनाथ शिंदे यांनी एका राष्ट्रीय पक्षाचा पाठींबा त्यांना असल्याचे म्हटलं होतं. त्यावर शरद पवार यांनी सांगितले की, माझ्याकडे राष्ट्रीय पक्षाची यादी आहे. त्यात राष्ट्रवादी, सीपीएम आणि तृणमूलचा शिंदेंना पाठींबा नाही. मग कोणता राष्ट्रीय पक्ष उरला, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा - Kamat On Rebel MLAs Suspension : शिवसेनेचे बंडखोर आमदार अपात्र होणारच, सेनेचे वकील कामतांचा दावा

Last Updated : Jun 26, 2022, 7:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.