ETV Bharat / bharat

'लोकांचे प्राण जाऊ शकतात, पण पंतप्रधानांची जीएसटी वसूली थांबत नाही'

author img

By

Published : May 8, 2021, 3:43 PM IST

लशींवर ५ टक्के जीएसटी लागू होत असल्याने राज्यांना लशींच्या प्रति डोससाठी १५ ते २० रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत. भारतामध्ये उत्पादन होणाऱ्या लशींवर लागू होणाऱ्या जीएसटीवर राजस्थान आणि छत्तीसगडने विरोध केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधी

नवी दिल्ली - कोरोना लशींवर वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू होत असल्याने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. लोकांचे प्राण जाऊ शकतात. मात्र, पंतप्रधानांची कर वसुली थांबू शकत नाही, असा टोला गांधी यांनी सरकारला लगावला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करून कोरोना लशींवर लागू होणाऱ्या जीएसटीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी कोरोना लशींवर लागू होणाऱ्या ५ टक्के जीएसटीवरून प्रश्न उपस्थित केले होते.

हेही वाचा-ओडिशाच्या आईन्स्टाइनची ही कहाणी बघायलाच हवी!

राज्यांचाही कोरोना लशींवरील जीएसटीला विरोध

  • लशींवर ५ टक्के जीएसटी लागू होत असल्याने राज्यांना लशींच्या प्रति डोससाठी १५ ते २० रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत.
  • भारतामध्ये उत्पादन होणाऱ्या लशींवर लागू होणाऱ्या जीएसटीवर राजस्थान आणि छत्तीसगडने विरोध केला आहे.
  • ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून कोरोना लशींवरील जीएसटी माफ करण्याची मागणीदेखील केली आहे.

हेही वाचा- कोरोनाने संकट; सुमारे १५.२० कोटी लोकांचा अन्न असुरक्षेबरोबर सामना

कोरोनाचा संसर्ग वाढत असताने कोरोनावर विजय मिळाल्याची सरकारची घोषणा

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कोरोना लसीकरणासाठी सुसंगत आणि स्पष्ट रणनीती नसल्याचे म्हटले आहे. देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असताना आधीच सरकारने विजयी झाल्याची घोषणा केली. त्यामुळे देशाला अत्यंत धोकादायक स्थिती ठेवण्यात आल्याची टीकाही काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी केली.

देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत असल्यानेही राहुल यांनी केंद्र सरकावर टीका केली आहे.

नवी दिल्ली - कोरोना लशींवर वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू होत असल्याने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. लोकांचे प्राण जाऊ शकतात. मात्र, पंतप्रधानांची कर वसुली थांबू शकत नाही, असा टोला गांधी यांनी सरकारला लगावला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करून कोरोना लशींवर लागू होणाऱ्या जीएसटीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी कोरोना लशींवर लागू होणाऱ्या ५ टक्के जीएसटीवरून प्रश्न उपस्थित केले होते.

हेही वाचा-ओडिशाच्या आईन्स्टाइनची ही कहाणी बघायलाच हवी!

राज्यांचाही कोरोना लशींवरील जीएसटीला विरोध

  • लशींवर ५ टक्के जीएसटी लागू होत असल्याने राज्यांना लशींच्या प्रति डोससाठी १५ ते २० रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत.
  • भारतामध्ये उत्पादन होणाऱ्या लशींवर लागू होणाऱ्या जीएसटीवर राजस्थान आणि छत्तीसगडने विरोध केला आहे.
  • ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून कोरोना लशींवरील जीएसटी माफ करण्याची मागणीदेखील केली आहे.

हेही वाचा- कोरोनाने संकट; सुमारे १५.२० कोटी लोकांचा अन्न असुरक्षेबरोबर सामना

कोरोनाचा संसर्ग वाढत असताने कोरोनावर विजय मिळाल्याची सरकारची घोषणा

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कोरोना लसीकरणासाठी सुसंगत आणि स्पष्ट रणनीती नसल्याचे म्हटले आहे. देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असताना आधीच सरकारने विजयी झाल्याची घोषणा केली. त्यामुळे देशाला अत्यंत धोकादायक स्थिती ठेवण्यात आल्याची टीकाही काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी केली.

देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत असल्यानेही राहुल यांनी केंद्र सरकावर टीका केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.