ETV Bharat / bharat

Rahul Gandhi Disqualification : माफी मागायला मी सावरकर नाही -राहुल गांधी

author img

By

Published : Mar 25, 2023, 1:20 PM IST

Updated : Mar 25, 2023, 4:13 PM IST

लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधानांवर भारतातील लोकशाही आणि अदानी वादावरून टीकेची झोड उठवली आहे.

Rahul Gandhi
राहुल गांधी

नवी दिल्ली : मोदी आडनावावरून मानहानी प्रकरणात खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींनी आज पहिली पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या काळात देशात लोकशाहीवर आक्रमण होत आहे.

  • मेरा नाम सावरकर नहीं है, मेरा नाम गांधी है।

    गांधी किसी ने माफी नहीं मांगते। pic.twitter.com/SGJvRv9q6u

    — Congress (@INCIndia) March 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भाजप खासदारांनी माझ्यावर खोटे आरोप केले : पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, 'संसदेत भाजप खासदारांनी माझ्यावर खोटे आरोप केले. मी खूप वेळा बोलण्यास वेळ मागितला, पण त्यांनी मला वेळ दिला नाही. मी या आधी पण बऱ्याच वेळा म्हटलं आहे की भारतात लोकशाहीवर हल्ला होतो आहे. याचे अनेक उदाहरणं वारंवार समोर येत आहेत. मी संसदेत यावर पुरावे देखील दिले आहेत'. देशात लोकशाही वाचविण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

'अदानीवरील भाषणाने पंतप्रधान घाबरले' : राहुल गांधींनी अदानी आणि मोदींच्या संबंधावरही भाष्य केले. अदानींना फायदा करून देण्यासाठी विमानतळाच्या नियमांमध्ये बदल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अदानीवरील माझ्या पुढच्या भाषणाने पंतप्रधान घाबरले आहेत, आणि मी त्यांच्या डोळ्यात ते पाहिले आहे, असे ते म्हणाले. अदानीच्या शेल कंपन्यांमध्ये 20 हजार कोटी रुपये कोणाचे गेले?, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. गांधी कुटुंबातील कोणी वायनाडमधून निवडणूक लढवणार असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, हा निर्णय काँग्रेस अध्यक्ष घेणार आहेत. नरेंद्र मोदींनी घाबरून जे काम केले त्याचा फायदा विरोधकांना होईल, असे देखील ते म्हणाले.

'मी देशासाठी लढत राहणार' : ते पुढे म्हणाले की, 'मला कायमचे अपात्र केले तरी मी माझे काम करत राहीन. मी संसदेत असलो किंवा नसलो तरी काही फरक पडत नाही. मी देशासाठी लढत राहणार. मला सत्याशिवाय कशातही रस नाही. मी फक्त खरे बोलतो, ते माझे काम आहे आणि मी अपात्र झालो किंवा अटक झालो तरी ते करत राहीन. या देशाने मला सर्व काही दिले आहे आणि म्हणूनच मी हे करतो आहे. पंतप्रधानांच्या बचावासाठी हे सारं नाटक रचलं जातंय. मला या धमक्या, अपात्रता किंवा तुरुंगवासाची भीती वाटत नाही'.

'माफी मागायला मी सावरकर नाही' : सुरत न्यायालयाच्या भूमिकेच्या प्रश्नावर ते म्हणाले की, मला भारताच्या कायद्यावर विश्वास आहे. या विषयावर इथे जास्त बोलू शकत नाही. या वक्तव्याचा पश्चाताप होत असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, हे प्रकरण न्यायालयात आहे. यात मी फार काही बोलणार नाही. ते म्हणाले की मी जे काही बोलतो ते विचार करून बोलतो. माफी मागण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, मी माफी मागितली नाही, कारण मी सावरकर नाही, मी गांधी आहे. ते म्हणाले की, मी मोदींना प्रश्न विचारत नाही. माझा प्रश्न अदानींना आहे.

हेही वाचा : Rahul Gandhi Social Media : राहुल गांधींच्या सोशल मीडिया अकाऊंटवर खासदार असे लिहिण्यास भाजपची हरकत, कायदेशीर कारवाईचा इशारा

नवी दिल्ली : मोदी आडनावावरून मानहानी प्रकरणात खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींनी आज पहिली पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या काळात देशात लोकशाहीवर आक्रमण होत आहे.

  • मेरा नाम सावरकर नहीं है, मेरा नाम गांधी है।

    गांधी किसी ने माफी नहीं मांगते। pic.twitter.com/SGJvRv9q6u

    — Congress (@INCIndia) March 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भाजप खासदारांनी माझ्यावर खोटे आरोप केले : पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, 'संसदेत भाजप खासदारांनी माझ्यावर खोटे आरोप केले. मी खूप वेळा बोलण्यास वेळ मागितला, पण त्यांनी मला वेळ दिला नाही. मी या आधी पण बऱ्याच वेळा म्हटलं आहे की भारतात लोकशाहीवर हल्ला होतो आहे. याचे अनेक उदाहरणं वारंवार समोर येत आहेत. मी संसदेत यावर पुरावे देखील दिले आहेत'. देशात लोकशाही वाचविण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

'अदानीवरील भाषणाने पंतप्रधान घाबरले' : राहुल गांधींनी अदानी आणि मोदींच्या संबंधावरही भाष्य केले. अदानींना फायदा करून देण्यासाठी विमानतळाच्या नियमांमध्ये बदल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अदानीवरील माझ्या पुढच्या भाषणाने पंतप्रधान घाबरले आहेत, आणि मी त्यांच्या डोळ्यात ते पाहिले आहे, असे ते म्हणाले. अदानीच्या शेल कंपन्यांमध्ये 20 हजार कोटी रुपये कोणाचे गेले?, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. गांधी कुटुंबातील कोणी वायनाडमधून निवडणूक लढवणार असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, हा निर्णय काँग्रेस अध्यक्ष घेणार आहेत. नरेंद्र मोदींनी घाबरून जे काम केले त्याचा फायदा विरोधकांना होईल, असे देखील ते म्हणाले.

'मी देशासाठी लढत राहणार' : ते पुढे म्हणाले की, 'मला कायमचे अपात्र केले तरी मी माझे काम करत राहीन. मी संसदेत असलो किंवा नसलो तरी काही फरक पडत नाही. मी देशासाठी लढत राहणार. मला सत्याशिवाय कशातही रस नाही. मी फक्त खरे बोलतो, ते माझे काम आहे आणि मी अपात्र झालो किंवा अटक झालो तरी ते करत राहीन. या देशाने मला सर्व काही दिले आहे आणि म्हणूनच मी हे करतो आहे. पंतप्रधानांच्या बचावासाठी हे सारं नाटक रचलं जातंय. मला या धमक्या, अपात्रता किंवा तुरुंगवासाची भीती वाटत नाही'.

'माफी मागायला मी सावरकर नाही' : सुरत न्यायालयाच्या भूमिकेच्या प्रश्नावर ते म्हणाले की, मला भारताच्या कायद्यावर विश्वास आहे. या विषयावर इथे जास्त बोलू शकत नाही. या वक्तव्याचा पश्चाताप होत असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, हे प्रकरण न्यायालयात आहे. यात मी फार काही बोलणार नाही. ते म्हणाले की मी जे काही बोलतो ते विचार करून बोलतो. माफी मागण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, मी माफी मागितली नाही, कारण मी सावरकर नाही, मी गांधी आहे. ते म्हणाले की, मी मोदींना प्रश्न विचारत नाही. माझा प्रश्न अदानींना आहे.

हेही वाचा : Rahul Gandhi Social Media : राहुल गांधींच्या सोशल मीडिया अकाऊंटवर खासदार असे लिहिण्यास भाजपची हरकत, कायदेशीर कारवाईचा इशारा

Last Updated : Mar 25, 2023, 4:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.