ETV Bharat / bharat

कोटींची विमानं घेण्यासाठी पैसा आहे, पण शेतकऱ्यांसाठी नाही - प्रियांका गांधी

author img

By

Published : Feb 15, 2021, 9:51 PM IST

सोमवारी चांदपूर येथे किसान पंचायतीला संबोधित करताना कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविला. तसेच यावेळी त्यांनी केंद्र सरकारला फटकारले. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे १६ हजार कोटींची विमानं घेण्यासाठी पैसा आहे, पण शेतकऱ्यांचे १५ हजार कोटी देण्यासाठी नाही, असे त्या म्हणाल्या

प्रियांका गांधी
प्रियांका गांधी

बिजनौर (उत्तर प्रदेश) - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहेत. यातच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. चांदपूरमध्ये त्यांनी किसान पंचायतीला संबोधीत केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: साठी दोन विमान खरेदी करण्यासाठी 16 हजार कोटी खर्च केले. त्या पैशातून शेतकर्‍यांचे संपूर्ण ऊस देय देणे शक्य झाले असते, असे त्या म्हणाल्या.

पंतप्रधान मोदींकडे प्रवासासाठी पैसे आहेत. शेतकऱ्यांसाठी नाही. नव्या कृषी कायद्यांमुळे भांडवलदार त्यांचे भांडार भरू शकतील. पण शेतकऱयांना किमान आधारभूत किंमतही मिळणार नाही, असे त्या म्हणाल्या. जे देवाचाही सौदा करतात त्यांना माणसांची काय किंमत? ऊसाची पैसे देऊ शकत नाही त्यांना जीवाचं मोल काय कळणार, असा घणाघात त्यांनी केला.

मी येथे भाषण करायला आलेली नाही. मी तुझ्याशी बोलण्यासाठी आले आहे. मोदी आपल्या धोरणांद्वारे प्रगती करतील. म्हणून तुम्ही नरेंद्र मोदींवर दोनदा विश्वास ठेवला. मात्र, त्यांनी तुमचा विश्वास तोडला, अशी टीका त्यांनी केली.

पंतप्रधान आपल्या भांडवलशाही मित्रांच्या हितासाठी काम करत आहेत. ते इतर देशांचे दौरे करू शकतात. मात्र, शेतकऱ्यांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, असे त्या म्हणाल्या. काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असल्याची ग्वाही प्रियांका यांनी दिली.

बिजनौर (उत्तर प्रदेश) - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहेत. यातच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. चांदपूरमध्ये त्यांनी किसान पंचायतीला संबोधीत केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: साठी दोन विमान खरेदी करण्यासाठी 16 हजार कोटी खर्च केले. त्या पैशातून शेतकर्‍यांचे संपूर्ण ऊस देय देणे शक्य झाले असते, असे त्या म्हणाल्या.

पंतप्रधान मोदींकडे प्रवासासाठी पैसे आहेत. शेतकऱ्यांसाठी नाही. नव्या कृषी कायद्यांमुळे भांडवलदार त्यांचे भांडार भरू शकतील. पण शेतकऱयांना किमान आधारभूत किंमतही मिळणार नाही, असे त्या म्हणाल्या. जे देवाचाही सौदा करतात त्यांना माणसांची काय किंमत? ऊसाची पैसे देऊ शकत नाही त्यांना जीवाचं मोल काय कळणार, असा घणाघात त्यांनी केला.

मी येथे भाषण करायला आलेली नाही. मी तुझ्याशी बोलण्यासाठी आले आहे. मोदी आपल्या धोरणांद्वारे प्रगती करतील. म्हणून तुम्ही नरेंद्र मोदींवर दोनदा विश्वास ठेवला. मात्र, त्यांनी तुमचा विश्वास तोडला, अशी टीका त्यांनी केली.

पंतप्रधान आपल्या भांडवलशाही मित्रांच्या हितासाठी काम करत आहेत. ते इतर देशांचे दौरे करू शकतात. मात्र, शेतकऱ्यांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, असे त्या म्हणाल्या. काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असल्याची ग्वाही प्रियांका यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.