ETV Bharat / bharat

Seema Haider : 'अदनान सामीला नागरिकत्व दिले, सीमा हैदरला का नाही?', सीमाच्या वकिलांचा सवाल

author img

By

Published : Jul 24, 2023, 4:01 PM IST

Updated : Jul 24, 2023, 5:37 PM IST

आपल्या चार मुलांसह भारतात आलेल्या सीमा हैदर या पाकिस्तानी महिलेवरून दोन्ही देशांमध्ये गदारोळ सुरू आहे. सीमा हैदरला ग्रेटर नोएडाच्या सचिनशी लग्न करून भारतात स्थायिक व्हायचे आहे. मात्र दोन्ही देशांमधील तणावाच्या संबंधामुळे तिच्या प्रेमाला अद्याप कायदेशीर मान्यता मिळालेली नाही.

Seema Haider
सीमा हैदर

पहा काय म्हणाले एपी सिंह

डेहराडून (उत्तराखंड) : आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरची चर्चा सध्या दोन्ही देशांमध्ये सुरू आहे. एकीकडे सीमा हैदरवर गुप्तहेर असल्याचा आरोप होत आहे. तर यासोबतच तिला पाकिस्तानात परत पाठवण्याची देखील मागणी होत आहे. दरम्यान, सीमा हैदरचे वकील एपी सिंह यांनी सीमा हैदरची पॉलीग्राफ चाचणी करण्याची मागणी करणारा अर्ज दिला आहे. जेणेकरून सीमा हैदर खरंच प्रेमाखातर भारतात आली की आणखी काही उद्देश पूर्ण करण्यासाठी ती प्रेमाचे नाटक करत आहे हे कळू शकेल.

सीमा हैदरचे वकील काय म्हणाले : सीमा हैदर प्रकरणात सीमाचे वकील एपी सिंह यांनी ईटीव्ही भारतशी केलेल्या विशेष संवादात सांगितले की, सीमाने पाकिस्तानमध्ये हिंदू धर्म स्वीकारला आणि ती नेपाळमार्गे भारतात आली. सीमाने बुलंदशहरमध्ये लग्नाची नोंदणी करण्यासाठी अर्ज केला. त्याचवेळी तिच्यावर एफआयआर नोंदवण्यात आला. सीमा हैदरचा यावर कोणताही आक्षेप नाही. कारण सीमाने तिच्या जन्मापासून आतापर्यंतची सर्व कागदपत्रे सोबत आणली आहेत. ती सर्व कागदपत्रे पोलिसांना देण्यात आली आहेत. या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे, असे ते म्हणाले.

सीमा आणि सचिन यांना एकत्र राहण्याची परवानगी द्यावी : सीमा हैदरच्या वकिलांनी सांगितले की, सध्या एजन्सी तपास करत आहे. असे असतानाही त्यांची सीबीआय, एनआयए, रॉ आणि आयबी या सारख्या बड्या एजन्सींकडून तपास करण्याला काही हरकत नाही. मात्र सध्या या प्रकरणी मानवी हक्कांची पायमल्ली होत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. सचिन आणि सीमा यांना वेगळे ठेवले जात असल्याने त्यांची मुले अन्न खात नाहीत. अशा स्थितीत तपास सुरूच ठेवला पाहिजे, पण दोघांनाही एकत्र ठेवावे, अशी मागणी सीमाच्या वकिलांनी केली आहे.

पोलिसांनी तपास करावा : सीमा हैदरबाबत देशभरात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यावर वकिलांनी सांगितले की, 'पाच पासपोर्टचा मुद्दा आहे, त्यापैकी 4 पासपोर्ट मुलांचे आहेत आणि एक पासपोर्ट सीमाचा आहे. यासोबतच सीमाकडे असलेली सर्व कागदपत्रे आणि फोन पोलिसांच्या हाती लागले आहेत. अशा परिस्थितीत सीमा गुप्तहेर आहे की नाही, याचा तपास पोलिसांनी करायला हवा, असे सीमाच्या वकिलांनी म्हटले आहे.

अदनान सामीला नागरिकत्व दिले, सीमा हैदरलाही द्यावे : वकील एपी सिंह म्हणाले की, भारताची परंपरा 'अतिथी देवो भव'ची आहे. मग आता देशात एक जण आला आहे तर त्याच्याशी अशी वागणूक का? पाकिस्तानातून आलेल्या अदनान सामीला भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. याशिवाय अक्षय कुमार, दीपिका पदुकोणसह अनेक लोक आहेत जे भारतीय नागरिक नाहीत. पण इथे आरामात राहतात. यासोबतच देशात नागरिकत्व कायदा आल्यानंतर हजारो लोकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा :

  1. Seema Haider : सीमा हैदरची ATS चौकशी, खरं प्रेम की हेरगिरी? काय होणार उघड?
  2. Seema Haider : 'वहिनी एकदम जबरदस्त आहे!', सीमा हैदरचा मेहुण्यासोबत व्हिडिओ व्हायरल

पहा काय म्हणाले एपी सिंह

डेहराडून (उत्तराखंड) : आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरची चर्चा सध्या दोन्ही देशांमध्ये सुरू आहे. एकीकडे सीमा हैदरवर गुप्तहेर असल्याचा आरोप होत आहे. तर यासोबतच तिला पाकिस्तानात परत पाठवण्याची देखील मागणी होत आहे. दरम्यान, सीमा हैदरचे वकील एपी सिंह यांनी सीमा हैदरची पॉलीग्राफ चाचणी करण्याची मागणी करणारा अर्ज दिला आहे. जेणेकरून सीमा हैदर खरंच प्रेमाखातर भारतात आली की आणखी काही उद्देश पूर्ण करण्यासाठी ती प्रेमाचे नाटक करत आहे हे कळू शकेल.

सीमा हैदरचे वकील काय म्हणाले : सीमा हैदर प्रकरणात सीमाचे वकील एपी सिंह यांनी ईटीव्ही भारतशी केलेल्या विशेष संवादात सांगितले की, सीमाने पाकिस्तानमध्ये हिंदू धर्म स्वीकारला आणि ती नेपाळमार्गे भारतात आली. सीमाने बुलंदशहरमध्ये लग्नाची नोंदणी करण्यासाठी अर्ज केला. त्याचवेळी तिच्यावर एफआयआर नोंदवण्यात आला. सीमा हैदरचा यावर कोणताही आक्षेप नाही. कारण सीमाने तिच्या जन्मापासून आतापर्यंतची सर्व कागदपत्रे सोबत आणली आहेत. ती सर्व कागदपत्रे पोलिसांना देण्यात आली आहेत. या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे, असे ते म्हणाले.

सीमा आणि सचिन यांना एकत्र राहण्याची परवानगी द्यावी : सीमा हैदरच्या वकिलांनी सांगितले की, सध्या एजन्सी तपास करत आहे. असे असतानाही त्यांची सीबीआय, एनआयए, रॉ आणि आयबी या सारख्या बड्या एजन्सींकडून तपास करण्याला काही हरकत नाही. मात्र सध्या या प्रकरणी मानवी हक्कांची पायमल्ली होत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. सचिन आणि सीमा यांना वेगळे ठेवले जात असल्याने त्यांची मुले अन्न खात नाहीत. अशा स्थितीत तपास सुरूच ठेवला पाहिजे, पण दोघांनाही एकत्र ठेवावे, अशी मागणी सीमाच्या वकिलांनी केली आहे.

पोलिसांनी तपास करावा : सीमा हैदरबाबत देशभरात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यावर वकिलांनी सांगितले की, 'पाच पासपोर्टचा मुद्दा आहे, त्यापैकी 4 पासपोर्ट मुलांचे आहेत आणि एक पासपोर्ट सीमाचा आहे. यासोबतच सीमाकडे असलेली सर्व कागदपत्रे आणि फोन पोलिसांच्या हाती लागले आहेत. अशा परिस्थितीत सीमा गुप्तहेर आहे की नाही, याचा तपास पोलिसांनी करायला हवा, असे सीमाच्या वकिलांनी म्हटले आहे.

अदनान सामीला नागरिकत्व दिले, सीमा हैदरलाही द्यावे : वकील एपी सिंह म्हणाले की, भारताची परंपरा 'अतिथी देवो भव'ची आहे. मग आता देशात एक जण आला आहे तर त्याच्याशी अशी वागणूक का? पाकिस्तानातून आलेल्या अदनान सामीला भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. याशिवाय अक्षय कुमार, दीपिका पदुकोणसह अनेक लोक आहेत जे भारतीय नागरिक नाहीत. पण इथे आरामात राहतात. यासोबतच देशात नागरिकत्व कायदा आल्यानंतर हजारो लोकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा :

  1. Seema Haider : सीमा हैदरची ATS चौकशी, खरं प्रेम की हेरगिरी? काय होणार उघड?
  2. Seema Haider : 'वहिनी एकदम जबरदस्त आहे!', सीमा हैदरचा मेहुण्यासोबत व्हिडिओ व्हायरल
Last Updated : Jul 24, 2023, 5:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.