ETV Bharat / bharat

आमिरच्या जाहिरातीवरून गदारोळ! मध्य प्रदेशचे गृहमंत्री मिश्रा बरसले

author img

By

Published : Oct 12, 2022, 10:36 PM IST

गृगृहमंत्री नरोत्तम मिश्रा पुन्हा एकदा अभिनेता आमिर खानवर बरसले आहेत. यावेळी आमिर एका नव्या जाहिरातीमुळे वादात सापडला आहे. ज्याबाबत नरोत्तम मिश्रा यांनी आमिर खानला कोणाच्याही भावना दुखावू नका असा सल्ला दिला आहे. आमिरची ही नवीन जाहिरात एका खाजगी बँकेची आहे, ज्याबद्दल तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

भोपाल (मध्य प्रदेश) - बॉलीवूड अभिनेता आमिर खानचे वादांचे नाते संपण्याचे नाव घेत नाही आहे. पुन्हा एकदा अभिनेता त्याच्या एका जाहिरातीमुळे वादात सापडला आहे. ज्यावर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आमिर खानवर निशाणा साधला आहे. आक्षेपार्ह जाहिरातीची तक्रार माझ्याकडे आली आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. मी हा व्हिडिओ पाहिला, त्यानंतर गृहमंत्र्यांनी अभिनेता आमिर खानला कोणाच्याही भावना दुखवू नका असा सल्ला दिला आहे.

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

माझ्याकडे तक्रार आली आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. यानंतर मी आमिर खानची ही जाहिरात पाहिली. भारतीय परंपरा आणि चालीरीती लक्षात घेऊन भविष्यात अशा जाहिराती करू नयेत अशी आमीर खानला विनंती करतो, असे गृहमंत्री म्हणाले आहेत. आमिर खानची अशी प्रकरणे भारतीय परंपरा, चालीरीती आणि देवी-देवतांबाबत येतच असतात. मुरड घालून वागून विशिष्ट धर्माच्या भावना दुखावल्या जातात. त्यांना कोणाच्याही भावना दुखावण्याचा अधिकार नाही.

आमिरची ही जाहिरात एका खाजगी बँकेची आहे. या जाहिरातीत आमिरसोबत अभिनेत्री कियारा अडवाणीही आहे. जाहिरातीत आमिर-कियारा वधू-वराच्या भूमिकेत दिसत आहेत. जाहिरातीत, आमिर कियाराला सांगतो की, विदाईच्या वेळी वधू रडण्याची ही पहिलीच वेळ आहे. वधू पतीच्या घरी न जाता वरासह स्वतःच्या घरी येते असे या जाहिरातीत दाखवण्यात आले आहे. जेणेकरून वधूच्या आजारी वडिलांची काळजी घेता येईल. त्यामुळे खऱ्या आयुष्यात वधू कियाराऐवजी वर आमिर घरामध्ये पहिले पाऊल टाकेल. त्याच वेळी, सर्व पाहुणे आमिरचे थाटामाटात स्वागत करतात. यूजर्स या जाहिरातीबद्दल ट्रोल करत आहेत आणि सामाजिक भावना दुखावल्याबद्दल बोलत आहेत. त्यानंत वरील प्रतिक्रिया मिश्रा यांनी दिली आहे.

भोपाल (मध्य प्रदेश) - बॉलीवूड अभिनेता आमिर खानचे वादांचे नाते संपण्याचे नाव घेत नाही आहे. पुन्हा एकदा अभिनेता त्याच्या एका जाहिरातीमुळे वादात सापडला आहे. ज्यावर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आमिर खानवर निशाणा साधला आहे. आक्षेपार्ह जाहिरातीची तक्रार माझ्याकडे आली आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. मी हा व्हिडिओ पाहिला, त्यानंतर गृहमंत्र्यांनी अभिनेता आमिर खानला कोणाच्याही भावना दुखवू नका असा सल्ला दिला आहे.

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

माझ्याकडे तक्रार आली आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. यानंतर मी आमिर खानची ही जाहिरात पाहिली. भारतीय परंपरा आणि चालीरीती लक्षात घेऊन भविष्यात अशा जाहिराती करू नयेत अशी आमीर खानला विनंती करतो, असे गृहमंत्री म्हणाले आहेत. आमिर खानची अशी प्रकरणे भारतीय परंपरा, चालीरीती आणि देवी-देवतांबाबत येतच असतात. मुरड घालून वागून विशिष्ट धर्माच्या भावना दुखावल्या जातात. त्यांना कोणाच्याही भावना दुखावण्याचा अधिकार नाही.

आमिरची ही जाहिरात एका खाजगी बँकेची आहे. या जाहिरातीत आमिरसोबत अभिनेत्री कियारा अडवाणीही आहे. जाहिरातीत आमिर-कियारा वधू-वराच्या भूमिकेत दिसत आहेत. जाहिरातीत, आमिर कियाराला सांगतो की, विदाईच्या वेळी वधू रडण्याची ही पहिलीच वेळ आहे. वधू पतीच्या घरी न जाता वरासह स्वतःच्या घरी येते असे या जाहिरातीत दाखवण्यात आले आहे. जेणेकरून वधूच्या आजारी वडिलांची काळजी घेता येईल. त्यामुळे खऱ्या आयुष्यात वधू कियाराऐवजी वर आमिर घरामध्ये पहिले पाऊल टाकेल. त्याच वेळी, सर्व पाहुणे आमिरचे थाटामाटात स्वागत करतात. यूजर्स या जाहिरातीबद्दल ट्रोल करत आहेत आणि सामाजिक भावना दुखावल्याबद्दल बोलत आहेत. त्यानंत वरील प्रतिक्रिया मिश्रा यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.