ETV Bharat / bharat

Major Bridge Collapse : भारतीय इतिहासातील प्रमुख अपघातांवर एक नजर

author img

By

Published : Oct 31, 2022, 6:06 PM IST

भारतात पूल कोसळण्याच्या ( Bridge Collapse ) अनेक मोठे अपघात झाले आहेत. एक नजर टाकूया देशभरातील पुलावरील ( Bridge Collapse And Rail Accidents In Indian History ) अपघातांवर.

Major Bridge Collapse
पूल कोसळणे आणि रेल्वे अपघात

नवी दिल्ली : 30 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेदरम्यान, केबल झुलता पूल कोसळला, ज्यामध्ये आतापर्यंत 132 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 150 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआरही नोंदवला आहे. माचू नदीवरील मोरबी केबल पूल दुरुस्तीचे काम आणि देखभाली अभावी, गैरव्यवस्थापन किंवा अन्य तांत्रिक कारणांमुळे कोसळल्याचे बोलले जात आहे. ( Bridge Collapse And Rail Accidents In Indian History )

ब्रिटीशांच्या काळात बांधलेला हा पूल बराच जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूल 26 ऑक्टोबर 2022 रोजी जनतेसाठी खुला करण्यात आला. याआधी त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती आणि ६ महिन्यांच्या दुरुस्तीच्या कामानंतर गुजराती नववर्षानिमित्त तो लोकांसाठी खुला करण्यात आला होता.

पुलाशी संबंधित देशभरातील अपघातांवर एक नजर टाकूया

21 जुलै 2001 : केरळमधील कडलुंडी येथील कडलुंडी नदीच्या रेल्वे पुलावर झालेल्या अपघातात चेन्नईला जाणाऱ्या मंगळुरू मेलच्या आठ बोगी पुलावरून घसरल्या. कोझिकोडपासून 10 किमी अंतरावर असलेल्या कडलुंडी नदीवर झालेल्या अपघातात 57 जणांचा मृत्यू झाला होता.

10 सप्टेंबर 2002 : कलकत्त्याहून नवी दिल्लीकडे निघालेल्या राजधानी एक्स्प्रेसला बिहारमधील रफीगंज येथील रफीगंज रेल्वे पुलावर अपघात झाला, ज्यामध्ये 130 जणांचा मृत्यू झाला. बिहार राज्याची राजधानी पाटणापासून सुमारे 130 मैल अंतरावर असलेल्या रफीगंजजवळ झालेला अपघात हा एक मोठा अपघात मानला जात आहे.

28 ऑगस्ट 2003 : दमणच्या पश्चिम किनारपट्टी भागात नदीत पूल कोसळला, त्यामुळे स्कूल बस आणि इतर अनेक वाहने पाण्यात वाहून गेली. या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला.

29 अक्टूबर 2005 : तेलंगणातील वेलीगोंडा रेल्वे पूल कोसळून संपूर्ण ट्रेन पाण्यात बुडाली असून, 114 जणांचा मृत्यू झाला आहे. पुलाचा काही भाग वाहून गेल्याने हा अपघात झाला. अचानक आलेल्या पुरामुळे हैदराबादजवळ हा अपघात झाला.

02 डिसेंबर 2006 : बिहार राज्यातील भागलपूर रेल्वे स्थानकावर 150 वर्षे जुना पूल कोसळून 33 जणांचा मृत्यू झाला. हावडा जमालपूर सुपरफास्ट ट्रेनच्या पासिंगच्या वेळी हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

9 सप्टेंबर 2007 : तेलंगणा राज्यातील हैदराबादमधील पंजागुट्टा येथे पुलाच्या बांधकामादरम्यान उड्डाणपूल कोसळला, ज्यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला. हैदराबादमधील पंजागुट्टा या व्यावसायिक भागात बांधकाम सुरू असलेला उड्डाणपूल कोसळल्याची घटना चर्चेत होती.

25 डिसेंबर 2009 : राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात बांधकामाधीन पूल कोसळून अडकलेल्या ३७ मजुरांचा मृत्यू झाला आहे.

22 ऑक्टोबर 2011 : भारतातील चहा उत्पादक प्रदेश दार्जिलिंग येथे एका राजकीय कार्यक्रमादरम्यान पूल कोसळून 32 जणांचा मृत्यू झाला.

2 ऑगस्ट 2016 : महाराष्ट्रात सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेत २८ जणांचा मृत्यू झाला होता. महाडजवळील सावित्री नदीवरील 106 वर्षे जुना पूल कोसळला होता.

31 मार्च 2016 : कोलकाता येथे, विवेकानंद उड्डाणपुलाचा सुमारे 100 मीटरचा भाग कोसळून 27 जणांचा मृत्यू झाला.

नवी दिल्ली : 30 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेदरम्यान, केबल झुलता पूल कोसळला, ज्यामध्ये आतापर्यंत 132 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 150 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआरही नोंदवला आहे. माचू नदीवरील मोरबी केबल पूल दुरुस्तीचे काम आणि देखभाली अभावी, गैरव्यवस्थापन किंवा अन्य तांत्रिक कारणांमुळे कोसळल्याचे बोलले जात आहे. ( Bridge Collapse And Rail Accidents In Indian History )

ब्रिटीशांच्या काळात बांधलेला हा पूल बराच जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूल 26 ऑक्टोबर 2022 रोजी जनतेसाठी खुला करण्यात आला. याआधी त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती आणि ६ महिन्यांच्या दुरुस्तीच्या कामानंतर गुजराती नववर्षानिमित्त तो लोकांसाठी खुला करण्यात आला होता.

पुलाशी संबंधित देशभरातील अपघातांवर एक नजर टाकूया

21 जुलै 2001 : केरळमधील कडलुंडी येथील कडलुंडी नदीच्या रेल्वे पुलावर झालेल्या अपघातात चेन्नईला जाणाऱ्या मंगळुरू मेलच्या आठ बोगी पुलावरून घसरल्या. कोझिकोडपासून 10 किमी अंतरावर असलेल्या कडलुंडी नदीवर झालेल्या अपघातात 57 जणांचा मृत्यू झाला होता.

10 सप्टेंबर 2002 : कलकत्त्याहून नवी दिल्लीकडे निघालेल्या राजधानी एक्स्प्रेसला बिहारमधील रफीगंज येथील रफीगंज रेल्वे पुलावर अपघात झाला, ज्यामध्ये 130 जणांचा मृत्यू झाला. बिहार राज्याची राजधानी पाटणापासून सुमारे 130 मैल अंतरावर असलेल्या रफीगंजजवळ झालेला अपघात हा एक मोठा अपघात मानला जात आहे.

28 ऑगस्ट 2003 : दमणच्या पश्चिम किनारपट्टी भागात नदीत पूल कोसळला, त्यामुळे स्कूल बस आणि इतर अनेक वाहने पाण्यात वाहून गेली. या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला.

29 अक्टूबर 2005 : तेलंगणातील वेलीगोंडा रेल्वे पूल कोसळून संपूर्ण ट्रेन पाण्यात बुडाली असून, 114 जणांचा मृत्यू झाला आहे. पुलाचा काही भाग वाहून गेल्याने हा अपघात झाला. अचानक आलेल्या पुरामुळे हैदराबादजवळ हा अपघात झाला.

02 डिसेंबर 2006 : बिहार राज्यातील भागलपूर रेल्वे स्थानकावर 150 वर्षे जुना पूल कोसळून 33 जणांचा मृत्यू झाला. हावडा जमालपूर सुपरफास्ट ट्रेनच्या पासिंगच्या वेळी हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

9 सप्टेंबर 2007 : तेलंगणा राज्यातील हैदराबादमधील पंजागुट्टा येथे पुलाच्या बांधकामादरम्यान उड्डाणपूल कोसळला, ज्यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला. हैदराबादमधील पंजागुट्टा या व्यावसायिक भागात बांधकाम सुरू असलेला उड्डाणपूल कोसळल्याची घटना चर्चेत होती.

25 डिसेंबर 2009 : राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात बांधकामाधीन पूल कोसळून अडकलेल्या ३७ मजुरांचा मृत्यू झाला आहे.

22 ऑक्टोबर 2011 : भारतातील चहा उत्पादक प्रदेश दार्जिलिंग येथे एका राजकीय कार्यक्रमादरम्यान पूल कोसळून 32 जणांचा मृत्यू झाला.

2 ऑगस्ट 2016 : महाराष्ट्रात सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेत २८ जणांचा मृत्यू झाला होता. महाडजवळील सावित्री नदीवरील 106 वर्षे जुना पूल कोसळला होता.

31 मार्च 2016 : कोलकाता येथे, विवेकानंद उड्डाणपुलाचा सुमारे 100 मीटरचा भाग कोसळून 27 जणांचा मृत्यू झाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.