ETV Bharat / bharat

संसदेत महाराष्ट्र : जाणून घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?

author img

By

Published : Aug 3, 2021, 4:34 PM IST

संसदेत महाराष्ट्र
संसदेत महाराष्ट्र

16:26 August 03

खासदार सदाशिव लोखंडे लोकसभेत बोलताना

11.11 AM, 3 ऑगस्ट - शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी पशुधन आणि दुध उत्पादनसंदर्भात लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. गोहत्या बंदीमुळं गायीच्या किंमतीत घट झाल्याचे त्यांनी संसदेला लक्षात आणून दिले. तसेच पशुखाद्य महाग झाल्यानं शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत असल्याचे म्हणाले.

16:25 August 03

खासदार नवनीत राणा लोकसभेत बोलताना

11.07 AM, 3 ऑगस्ट - अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी देखील पीक विमा योजनेतील त्रूटी केंद्र सरकारच्या लक्षात आणून दिली. शिवाय केंद्र सरकार स्वत: पुढाकार घेऊन पीक विम्यासाठी सरकारी कंपनी स्थापन करणार काय, असा प्रश्न उपस्थित केला.

15:27 August 03

नवी दिल्ली - कोरोना महामारीत संसदेचे दुसरे पावसाळी अधिवेशन 19 जुलै रोजी सुरू झाले आहे. या अधिवेशनात संसदेची एकूण 19 सत्रे होत असून त्यात, 31 सरकारी कामकाजांचा समावेश आहे. (यात 29 विधेयके आणि दोन वित्तीय विधेयके) सहा अध्यादेशांचे विधेयकांमध्ये रुपांतर केले जाईल. दरम्यान, विविध मुद्यांवर लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळ उडत असल्याने अनेकदा कामकाज तहकूब करण्यात येत आहे.

खासदार रक्षा खडसे लोकसभेत बोलताना

11.02 AM, 03 ऑगस्ट - पंतप्रधान पीक विमा योजनेत येत असलेल्या समस्यांबाबत खासदार रक्षा खडसे यांनी लोकसभेत प्रश्न मांडले. जळगाव आणि बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी विमापासून वंचित असल्याचं त्या म्हणाल्या. यामध्ये केंद्र सरकारने राज्य सरकारला निधी देण्याची मागणी त्यांनी केली.

16:26 August 03

खासदार सदाशिव लोखंडे लोकसभेत बोलताना

11.11 AM, 3 ऑगस्ट - शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी पशुधन आणि दुध उत्पादनसंदर्भात लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. गोहत्या बंदीमुळं गायीच्या किंमतीत घट झाल्याचे त्यांनी संसदेला लक्षात आणून दिले. तसेच पशुखाद्य महाग झाल्यानं शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत असल्याचे म्हणाले.

16:25 August 03

खासदार नवनीत राणा लोकसभेत बोलताना

11.07 AM, 3 ऑगस्ट - अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी देखील पीक विमा योजनेतील त्रूटी केंद्र सरकारच्या लक्षात आणून दिली. शिवाय केंद्र सरकार स्वत: पुढाकार घेऊन पीक विम्यासाठी सरकारी कंपनी स्थापन करणार काय, असा प्रश्न उपस्थित केला.

15:27 August 03

नवी दिल्ली - कोरोना महामारीत संसदेचे दुसरे पावसाळी अधिवेशन 19 जुलै रोजी सुरू झाले आहे. या अधिवेशनात संसदेची एकूण 19 सत्रे होत असून त्यात, 31 सरकारी कामकाजांचा समावेश आहे. (यात 29 विधेयके आणि दोन वित्तीय विधेयके) सहा अध्यादेशांचे विधेयकांमध्ये रुपांतर केले जाईल. दरम्यान, विविध मुद्यांवर लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळ उडत असल्याने अनेकदा कामकाज तहकूब करण्यात येत आहे.

खासदार रक्षा खडसे लोकसभेत बोलताना

11.02 AM, 03 ऑगस्ट - पंतप्रधान पीक विमा योजनेत येत असलेल्या समस्यांबाबत खासदार रक्षा खडसे यांनी लोकसभेत प्रश्न मांडले. जळगाव आणि बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी विमापासून वंचित असल्याचं त्या म्हणाल्या. यामध्ये केंद्र सरकारने राज्य सरकारला निधी देण्याची मागणी त्यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.