ETV Bharat / bharat

Todays Top News : देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया एकाच क्लिकवर

author img

By

Published : Sep 11, 2022, 11:51 AM IST

जाणून घ्या आज काय असेल खास, दिवसभर या बातम्यांवर ( Todays Top News ) राहाणार लक्ष. देशात काय घडणार आहे, क्रीडा आणि राजकारण हे विशेष. पहा एका क्लिकवर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.(the important events of the country in one click)

Todays Top News
Todays Top News

काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’चा आज :

तिरुवनंतपुरम - केरळमध्ये काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’चा १९ दिवसांचा प्रवास रविवारी सकाळी राजधानी तिरुअनंतपुरमच्या परसाला भागातून सुरू झाला. केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे (केपीसीसी) अध्यक्ष आणि खासदार के. सुधाकरन, राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही डी साठेन आदि उपस्थित होते.

युद्धनौका तारागिरी : अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी सज्ज असलेली युद्धनौका तारागिरी आज मुंबईतील माझगाव डॉक येथे दाखल होणार आहे.

भारतीय नौदलाचे तिसरे स्टेल्थ फ्रिगेट तारागिरी प्रकल्प 17A अंतर्गत तयार केले जात आहे. याला मुंबईस्थित Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) द्वारे लॉन्च केले जाईल. या युद्धनौकेत जवळपास ७५ टक्के स्वदेशी उपकरणे वापरण्यात आली आहेत. तारागिरी 10 सप्टेंबर 2020 पासून बांधली जात होती.

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या स्मरणार्थ आज भारतात राजकीय शोक

युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन आणि उत्तर आयर्लंडच्या महाराणी एलिझाबेथ II यांचे गुरुवारी (8 सप्टेंबर 2022) निधन झाले. राणीच्या स्मरणार्थ, भारत सरकारने ११ सप्टेंबर रोजी देशभरात एक दिवसाचा राजकीय शोक पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तराखंड: आज मुख्यमंत्री पुष्कर धामी पिथौरागढच्या आपत्तीग्रस्त भागाला भेट देणार

डेहराडून - मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी रविवारी, 11 सप्टेंबर रोजी पिथौरागढ जिल्ह्यातील धारचुला येथील रांडी (खोटीला) गावात आपत्तीग्रस्त भागांना भेट दिल्यानंतर मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतील. या दौऱ्यात मुख्यमंत्री आपत्तीग्रस्तांच्या कुटुंबीयांचीही भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री रविवारी सकाळी साडेदहा वाजता धारचुलाला पोहोचतील.

कर्नाल : शेतकरी आणि अधिकाऱ्यांचा संघर्ष संपुष्टात, आज सकाळी महत्त्वाची बैठक

28 ऑगस्ट रोजी बस्तारा टोलवर शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जनंतर, SDM आयुष सिन्हा यांच्यावर कठोर कारवाई करण्यासह अन्य मागण्यांसाठी कर्नालमध्ये शेतकरी, अधिकारी यांच्यात सुरू असलेला संघर्ष आज संपण्याची शक्यता आहे. शुक्रवारी उशिरापर्यंत चाललेल्या अधिकारी, शेतकऱ्यांच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली.

भारत, ऑस्ट्रेलिया यांच्यात आज पहिली टू प्लस टू चर्चा, दोन्ही देश संरक्षण सहकार्य वाढविण्यास सहमत

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शनिवारी पहिली 'टू प्लस टू' मंत्रीस्तरीय चर्चा होणार आहे. ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री मारिस पेने आणि संरक्षण मंत्री पीटर डटन हे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आयोजन करण्यात आले आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी विधानसभा निवडणुकीच्या वर्षभर आधी अचानक राजीनामा दिला. पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली गुजरातचा विकास सुरू राहायला हवा, असे ते म्हणाले.

शिवसेना : युपीमध्ये पक्ष सर्व जागा लढवणार

उत्तर प्रदेश विधानसभेसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. शिवसेनेने यूपीतील सर्व जागा लढवणार असल्याचे सांगितले. भाजपच्या राजवटीत कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याचा आरोप शिवनसेनेने केला आहे.

दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

उत्तर भारतात हवामानाने पुन्हा बदल केला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील तीन दिवस अधूनमधून पाऊस पडू शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

LETS KNOW THE IMPORTANT EVENTS OF THE COUNTRY IN ONE CLICK

काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’चा आज :

तिरुवनंतपुरम - केरळमध्ये काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’चा १९ दिवसांचा प्रवास रविवारी सकाळी राजधानी तिरुअनंतपुरमच्या परसाला भागातून सुरू झाला. केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे (केपीसीसी) अध्यक्ष आणि खासदार के. सुधाकरन, राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही डी साठेन आदि उपस्थित होते.

युद्धनौका तारागिरी : अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी सज्ज असलेली युद्धनौका तारागिरी आज मुंबईतील माझगाव डॉक येथे दाखल होणार आहे.

भारतीय नौदलाचे तिसरे स्टेल्थ फ्रिगेट तारागिरी प्रकल्प 17A अंतर्गत तयार केले जात आहे. याला मुंबईस्थित Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) द्वारे लॉन्च केले जाईल. या युद्धनौकेत जवळपास ७५ टक्के स्वदेशी उपकरणे वापरण्यात आली आहेत. तारागिरी 10 सप्टेंबर 2020 पासून बांधली जात होती.

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या स्मरणार्थ आज भारतात राजकीय शोक

युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन आणि उत्तर आयर्लंडच्या महाराणी एलिझाबेथ II यांचे गुरुवारी (8 सप्टेंबर 2022) निधन झाले. राणीच्या स्मरणार्थ, भारत सरकारने ११ सप्टेंबर रोजी देशभरात एक दिवसाचा राजकीय शोक पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तराखंड: आज मुख्यमंत्री पुष्कर धामी पिथौरागढच्या आपत्तीग्रस्त भागाला भेट देणार

डेहराडून - मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी रविवारी, 11 सप्टेंबर रोजी पिथौरागढ जिल्ह्यातील धारचुला येथील रांडी (खोटीला) गावात आपत्तीग्रस्त भागांना भेट दिल्यानंतर मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतील. या दौऱ्यात मुख्यमंत्री आपत्तीग्रस्तांच्या कुटुंबीयांचीही भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री रविवारी सकाळी साडेदहा वाजता धारचुलाला पोहोचतील.

कर्नाल : शेतकरी आणि अधिकाऱ्यांचा संघर्ष संपुष्टात, आज सकाळी महत्त्वाची बैठक

28 ऑगस्ट रोजी बस्तारा टोलवर शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जनंतर, SDM आयुष सिन्हा यांच्यावर कठोर कारवाई करण्यासह अन्य मागण्यांसाठी कर्नालमध्ये शेतकरी, अधिकारी यांच्यात सुरू असलेला संघर्ष आज संपण्याची शक्यता आहे. शुक्रवारी उशिरापर्यंत चाललेल्या अधिकारी, शेतकऱ्यांच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली.

भारत, ऑस्ट्रेलिया यांच्यात आज पहिली टू प्लस टू चर्चा, दोन्ही देश संरक्षण सहकार्य वाढविण्यास सहमत

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शनिवारी पहिली 'टू प्लस टू' मंत्रीस्तरीय चर्चा होणार आहे. ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री मारिस पेने आणि संरक्षण मंत्री पीटर डटन हे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आयोजन करण्यात आले आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी विधानसभा निवडणुकीच्या वर्षभर आधी अचानक राजीनामा दिला. पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली गुजरातचा विकास सुरू राहायला हवा, असे ते म्हणाले.

शिवसेना : युपीमध्ये पक्ष सर्व जागा लढवणार

उत्तर प्रदेश विधानसभेसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. शिवसेनेने यूपीतील सर्व जागा लढवणार असल्याचे सांगितले. भाजपच्या राजवटीत कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याचा आरोप शिवनसेनेने केला आहे.

दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

उत्तर भारतात हवामानाने पुन्हा बदल केला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील तीन दिवस अधूनमधून पाऊस पडू शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

LETS KNOW THE IMPORTANT EVENTS OF THE COUNTRY IN ONE CLICK

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.