ETV Bharat / bharat

घराकडे निघालेले शेतकरी गाझीपूर आंदोलनस्थळी पुन्हा दाखल

author img

By

Published : Jan 29, 2021, 7:36 AM IST

Updated : Jan 29, 2021, 7:42 AM IST

दोन महिने शांततेत चाललेल्या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी गालबोट लागले. प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी घराची वाट धरली होती. मात्र, आज पहाटे ३ पासून शेतकरी पुन्हा सीमेवर येऊ लागले आहेत.

आंदोलक गाझीपूर सीमेवर पुन्हा दाखल
आंदोलक गाझीपूर सीमेवर पुन्हा दाखल

नवी दिल्ली - केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीत मागील ६४ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दोन महिने शांततेत चाललेल्या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी गालबोट लागले. प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाल्यानंतर दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवरील गाझीपूर येथील आंदोलनकर्त्यांनी घराची वाट धरली होती. मात्र, आज (शुक्रवार) पहाटे ३ पासून शेतकरी पुन्हा सीमेवर येऊ लागले आहेत.

आंदोलन स्थळे खाली करा - उत्तर प्रदेश पोलीस

घराकडे निघालेले आंदोलक गाझीपूर सीमेवर पुन्हा दाखल

उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांची आंदोलन स्थळे खाली करण्याचे आदेश उत्तर प्रदेश पोलिसांनी सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. काल (गुरूवारी) रात्री गाझीपूर आंदोलनस्थळ खाली करण्याबाबत पोलिसांनी शेतकऱ्यांना 'अल्टिमेटम' दिला होता. तसेच आंदोलनस्थळी पोलिसांनी 'फ्लॅग मार्च' काढला होता. कारवाईच्या भीतीने ट्रॅक्टमध्ये सर्व सामान भरून काही शेतकरी परत गावाकडे निघाले होते. मात्र, आज पहाटे पुन्हा शेतकरी ट्रक्समधून माघारी येण्यास सुरूवात झाली आहे.

पुन्हा लंगर सुरू

आंदोलनस्थळी हजारो शतकरी असून त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी लंगर चालवण्यात येतात. मात्र, ट्रॅक्टर परेडमधील हिंसाचारानंतर लंगरचे सर्व सामान भरून शेतकरी घरी निघाले होते. आता पुन्हा गाझीपूर सीमेवर गर्दी होत असून लंगर पुन्हा सुरू झाले आहे. दरम्यान शेतकरी संघटनांत फूट पडली असून काही संघटनांनी माघार घेतली आहे.

गोळ्या झाडल्या तरी आंदोलन सुरूच ठेवणार - राकेश टिकैत

भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की, आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आणि घरीही जाणार नाही. सरकारने आमच्यावर गोळ्या जरी झाडल्या, तरीही आम्ही हे आंदोलन सुरुच ठेवणार आहोत. प्रशासनाने आंदोलनस्थळावरचा वीज आणि पाणीपूरवठा तोडला आहे. तरीही आम्ही मागे हटणार नाही. अगदी आमच्या गावांमधून पाणी आणू मात्र आंदोलन सुरुच ठेऊ, असेही टिकैत म्हणाले.

नवी दिल्ली - केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीत मागील ६४ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दोन महिने शांततेत चाललेल्या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी गालबोट लागले. प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाल्यानंतर दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवरील गाझीपूर येथील आंदोलनकर्त्यांनी घराची वाट धरली होती. मात्र, आज (शुक्रवार) पहाटे ३ पासून शेतकरी पुन्हा सीमेवर येऊ लागले आहेत.

आंदोलन स्थळे खाली करा - उत्तर प्रदेश पोलीस

घराकडे निघालेले आंदोलक गाझीपूर सीमेवर पुन्हा दाखल

उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांची आंदोलन स्थळे खाली करण्याचे आदेश उत्तर प्रदेश पोलिसांनी सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. काल (गुरूवारी) रात्री गाझीपूर आंदोलनस्थळ खाली करण्याबाबत पोलिसांनी शेतकऱ्यांना 'अल्टिमेटम' दिला होता. तसेच आंदोलनस्थळी पोलिसांनी 'फ्लॅग मार्च' काढला होता. कारवाईच्या भीतीने ट्रॅक्टमध्ये सर्व सामान भरून काही शेतकरी परत गावाकडे निघाले होते. मात्र, आज पहाटे पुन्हा शेतकरी ट्रक्समधून माघारी येण्यास सुरूवात झाली आहे.

पुन्हा लंगर सुरू

आंदोलनस्थळी हजारो शतकरी असून त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी लंगर चालवण्यात येतात. मात्र, ट्रॅक्टर परेडमधील हिंसाचारानंतर लंगरचे सर्व सामान भरून शेतकरी घरी निघाले होते. आता पुन्हा गाझीपूर सीमेवर गर्दी होत असून लंगर पुन्हा सुरू झाले आहे. दरम्यान शेतकरी संघटनांत फूट पडली असून काही संघटनांनी माघार घेतली आहे.

गोळ्या झाडल्या तरी आंदोलन सुरूच ठेवणार - राकेश टिकैत

भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की, आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आणि घरीही जाणार नाही. सरकारने आमच्यावर गोळ्या जरी झाडल्या, तरीही आम्ही हे आंदोलन सुरुच ठेवणार आहोत. प्रशासनाने आंदोलनस्थळावरचा वीज आणि पाणीपूरवठा तोडला आहे. तरीही आम्ही मागे हटणार नाही. अगदी आमच्या गावांमधून पाणी आणू मात्र आंदोलन सुरुच ठेऊ, असेही टिकैत म्हणाले.

Last Updated : Jan 29, 2021, 7:42 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.