ETV Bharat / bharat

Power outage during Presidents address: राष्ट्रपतींचे अभिभाषण सुरू असताना अनेकदा गेली लाईट

author img

By

Published : May 6, 2023, 6:53 PM IST

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाच्या वेळी अनेकवेळा वीजपुरवठा खंडित झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना ओडिशातील बारीपाडा येथील महाराजा श्री रामचंद्र भांजा देव विद्यापीठात घटली आहे.

राष्ट्रपती
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे भाषण

बारीपाडा (ओडिशा) : ओडिशातील बारीपाडा येथील महाराजा श्री रामचंद्र भांजा देव विद्यापीठाच्या (MSCBU) दीक्षांत समारंभात शनिवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणादरम्यान अनेकवेळा वीज पुरवठा खंडित झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, मुर्मु यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. परंतु, झालेल्या प्रकारामुळे गोंधळही उडाला. त्यावर कुलगुरुंनी माफिही मागितली आहे. तर, एका विद्युत कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. अध्यक्षांचे अभिभाषण सुरू होताच वीजपुरवठा ठप्प झाला. व्यासपीठावरील दिव्यांच्या प्रकाशाखाली राष्ट्रपतींनी भाषण केल्याचे सूत्रांनी सांगितले. मुर्मू यांच्या संबोधनादरम्यान, काही मिनिटे (9 मिनिटे) वीज खंडित झाली होता. मात्र, वीजपुरवठा खंडित होऊनही अध्यक्षांनी आपले भाषण सुरूच ठेवले. एमएससीबी विद्यापीठाचे कुलगुरूंनी दीक्षांत समारंभात झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

'नोकरी करण्यापेक्षा नोकरी देण्याचा विचार केलेला बरा' : पदवीधर विद्यार्थ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, पदवी मिळाली म्हणजे शिक्षण प्रक्रिया संपली असा होत नाही. शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे. तसेच, उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यापैकी काही नोकरी करतील, काही व्यवसाय करतील तर काही संशोधनही करतील. मात्र, नोकरी करण्याचा विचार करण्यापेक्षा नोकरी देण्याचा विचार केलेला बरा असही त्या यावेळी म्हणाल्या आहेत. दरम्यान, विद्यापीठाने एक उष्मायन केंद्र स्थापन केले आहे आणि विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि सामान्य लोकांना स्टार्ट-अप सुरू करण्यासाठी मदत केली आहे. हे जाणून मला आनंद झाला. मयूरभंज जिल्ह्यातील बारीपाडा येथील महाराजा श्री रामचंद्र भांजा देव विद्यापीठाच्या 12 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ओडिशाच्या तीन दिवसीय दौऱ्याचा समारोप केला.

एका कर्मचारी निलंबित : त्याचवेळी एमएससीबी विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर संतोष त्रिपाठी यांनी या घटनेबद्दल माफी मागितली आहे. ते म्हणाले की, आमच्याकडे जनरेटर असूनही ते काम करत नव्हते. त्यामुळे आम्ही संपूर्ण घटनेची चौकशी करू. विद्यापीठाचे कुलगुरू म्हणाले, तपासासाठी तीन सदस्यीय पथक स्थापन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या विद्युत विभागातील एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. त्याच वेळी, वीज बिघाडावर टाटा पॉवर म्हणतात, की ते आयडीसीओच्या देखभालीखाली आहे. दरम्यान, मयूरभंज कलेक्टर म्हणाले, "तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली असून त्याची चौकशी केली जाईल." बारीपाडा एडीएम रुद्र नारायण मोहंती सांगतात, 'वीज जाण्यामागील कारणे आणि त्याला कोण जबाबदार आहे याचा शोध घेतला जाईल आणि त्यानुसार कारवाई केली जाईल. दरम्यान, भाजपने म्हटले, मुख्यमंत्र्यांची माफी मागावी. ओडिशाचे भाजप अध्यक्ष मनमोहन सामल म्हणाले की, 'ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी माफी मागावी, या प्रकाराने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.

हेही वाचा : Karnataka Election 2023 : काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाले, खर्गे यांच्या हत्येचा कट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे भाषण

बारीपाडा (ओडिशा) : ओडिशातील बारीपाडा येथील महाराजा श्री रामचंद्र भांजा देव विद्यापीठाच्या (MSCBU) दीक्षांत समारंभात शनिवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणादरम्यान अनेकवेळा वीज पुरवठा खंडित झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, मुर्मु यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. परंतु, झालेल्या प्रकारामुळे गोंधळही उडाला. त्यावर कुलगुरुंनी माफिही मागितली आहे. तर, एका विद्युत कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. अध्यक्षांचे अभिभाषण सुरू होताच वीजपुरवठा ठप्प झाला. व्यासपीठावरील दिव्यांच्या प्रकाशाखाली राष्ट्रपतींनी भाषण केल्याचे सूत्रांनी सांगितले. मुर्मू यांच्या संबोधनादरम्यान, काही मिनिटे (9 मिनिटे) वीज खंडित झाली होता. मात्र, वीजपुरवठा खंडित होऊनही अध्यक्षांनी आपले भाषण सुरूच ठेवले. एमएससीबी विद्यापीठाचे कुलगुरूंनी दीक्षांत समारंभात झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

'नोकरी करण्यापेक्षा नोकरी देण्याचा विचार केलेला बरा' : पदवीधर विद्यार्थ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, पदवी मिळाली म्हणजे शिक्षण प्रक्रिया संपली असा होत नाही. शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे. तसेच, उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यापैकी काही नोकरी करतील, काही व्यवसाय करतील तर काही संशोधनही करतील. मात्र, नोकरी करण्याचा विचार करण्यापेक्षा नोकरी देण्याचा विचार केलेला बरा असही त्या यावेळी म्हणाल्या आहेत. दरम्यान, विद्यापीठाने एक उष्मायन केंद्र स्थापन केले आहे आणि विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि सामान्य लोकांना स्टार्ट-अप सुरू करण्यासाठी मदत केली आहे. हे जाणून मला आनंद झाला. मयूरभंज जिल्ह्यातील बारीपाडा येथील महाराजा श्री रामचंद्र भांजा देव विद्यापीठाच्या 12 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ओडिशाच्या तीन दिवसीय दौऱ्याचा समारोप केला.

एका कर्मचारी निलंबित : त्याचवेळी एमएससीबी विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर संतोष त्रिपाठी यांनी या घटनेबद्दल माफी मागितली आहे. ते म्हणाले की, आमच्याकडे जनरेटर असूनही ते काम करत नव्हते. त्यामुळे आम्ही संपूर्ण घटनेची चौकशी करू. विद्यापीठाचे कुलगुरू म्हणाले, तपासासाठी तीन सदस्यीय पथक स्थापन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या विद्युत विभागातील एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. त्याच वेळी, वीज बिघाडावर टाटा पॉवर म्हणतात, की ते आयडीसीओच्या देखभालीखाली आहे. दरम्यान, मयूरभंज कलेक्टर म्हणाले, "तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली असून त्याची चौकशी केली जाईल." बारीपाडा एडीएम रुद्र नारायण मोहंती सांगतात, 'वीज जाण्यामागील कारणे आणि त्याला कोण जबाबदार आहे याचा शोध घेतला जाईल आणि त्यानुसार कारवाई केली जाईल. दरम्यान, भाजपने म्हटले, मुख्यमंत्र्यांची माफी मागावी. ओडिशाचे भाजप अध्यक्ष मनमोहन सामल म्हणाले की, 'ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी माफी मागावी, या प्रकाराने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.

हेही वाचा : Karnataka Election 2023 : काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाले, खर्गे यांच्या हत्येचा कट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.