ETV Bharat / bharat

Dr Panjabrao Deshmukh : कृषी क्रांतीचे प्रणेते डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जन्मदिवस, जाणुन घेऊया त्यांच्या कार्याचा प्रवास

डॉ. पंजाबराव देशमुख (Pioneers of Agricultural Revolution) यांचा जन्म २७ डिसेंबर १८९८ रोजी (Dr Panjabrao Deshmukh Birth Anniversary) अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी झाला. उच्च शिक्षण घेऊन ते स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. इ.स. १९३६ च्या निवडणुकीपश्चात ते शिक्षणमंत्री (Minister of Education) झाले. आणि स्वतंत्र भारतात ते भारताचे कृषी मंत्री (Agriculture Minister) होते.

author img

By

Published : Dec 18, 2022, 2:23 PM IST

Updated : Dec 27, 2022, 9:20 AM IST

Dr Panjabrao Deshmukh
डॉ. पंजाबराव देशमुख जन्मदिवस

कृषी क्रांतीचे प्रणेते (Pioneers of Agricultural Revolution) डॉ. पंजाबराव देशमुख (Dr Panjabrao Deshmukh Birth Anniversary) यांनी उच्च शिक्षण हे एडिनबर्ग व आक्सफर्ड विद्यापीठ येथून पूर्ण केले. तसेच त्यांनी डॉक्टरेट ब्रिटेन येथून केले. त्यांच्या संशोधनाचा 'धर्म पहाट आणि त्याची वाढ' असा विषय होता. त्यांनी अमरावती येथे परत येवून कायदा शिक्षणाची तयारी सुरु केली. १९३० मध्ये ते प्रांतीय लॉ बोर्डाचे सदस्य म्हणून निवड होऊन ते शिक्षण मंत्री (Minister of Education), कृषी (Agriculture Minister) व सहकारी विभागाचे मंत्री बनले होते. स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या विकास समितीचे सदस्यि झाले. १९५२, १९५७ आणि १९६२ रोजी त्यांची खासदार म्हनणून नियुक्ती झाली. तसेच ते १९५२ ते १९६२ पर्यंत कृषी मंत्री होते.

सामाजिक जीवनातील योगदान (Social Worker) : त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद वसतिगृह सुरू केले. त्यांनी प्रसिद्ध श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय व इतर शैक्षणिक संस्था आणि वसतिगृहे यांचा समावेश आहे. शेतकरी स्थिती सुधारणा करण्यासाठी त्यांनी 'भारत कृषक समाज' स्थापन केले आणि त्यांनी अधिवक्ता धोरण कायम ठेवण्यासाठी एक वृत्तपत्र म्हणजे 'महाराष्ट्र केसरी' सुरु केले.

समाजाच्या उन्नतीसाठी केलेले कार्य : पंजाबरावांनी वकिली बरोबरच समाजकार्यास प्रारंभ केला. ते अमरावतीच्या जिल्हा बोर्डात अध्यक्ष झाले (१९२८). या वेळी त्यांनी सार्वजनिक विहिरी हरिजनांसाठी खुल्या केल्या. कर वाढवून येणारा पैसा शिक्षणावर खर्च केला व प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. अमरावतीचे अंबादेवी मंदिर अस्पृश्यांना खुले करण्यासाठी त्याच वर्षी सत्याग्रह केला. १९३० मध्ये त्यांची प्रांतिक कायदेमंडळात निवड झाली व ते शिक्षण, कृषी, सहकार आणि लोककर्म खात्यांचे मंत्री झाले. तथापि १९३३ मध्ये त्यांनी राजीनामा दिला त्यानंतर अमरावती मध्यवर्ती बँकेचे ते अध्यक्ष झाले. त्यांनी बहुजन समाजाच्या विकासासाठी श्रद्धानंद छात्रालय (१९२६) व श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली (१९३२). त्या शिक्षण संस्थेने अल्पावधीतच अनेक शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे सुरू केली.

शैक्षणिक व शेती क्षेत्रातील कार्य : त्यांनी प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडविण्याकरिता ‘भारतीय प्राथमिक शिक्षक संघ’ स्थापन केला. हे शैक्षणिक प्रसाराचे कार्य करीत असतानाच त्यांनी जुन्यापुराण्या शेती पद्धतीत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले. ते काँग्रेसचे सभासद होते व नेताजी सुभाषचंद्र बोसांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. राजकारणापासून अलिप्त होऊन देवास संस्थानात त्यांनी काही काळ ‘राजकीय मंत्री’ म्हणून काम केले. स्वातंत्र्यानंतर ते काँग्रेसमध्ये सक्रिय सहभागी झाले. १९५२,१९५७ व १९६२ या तीनही वर्षांच्या लोकसभेच्या निवडणुकांत ते विजयी झाले. १९५२ ते १९६२ पर्यंत ते केंद्रीय कृषिमंत्री आणि एक वर्ष सहकार मंत्री होते. या काळात त्यांनी अनेक समित्या स्थापन केल्या आणि कापूसबाजार, शेती वगैरे क्षेत्रांत आमूलाग्र सुधारणा घडवून आणल्या. मागास जमातीसाठी अखिल भारतीय मागास जातिसंघ, कृषिउत्पादकांच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा संघ, भारत कृषक समाज (१९५५), आफ्रो-आशियाई ग्रामीण पुनर्रचना संघटना इत्यादी संघटना त्यांनी यशस्वीपणे राबविल्या. जपानी भातशेतीचा प्रयोग देशभर व्हावा म्हणून त्यांनी देशव्यापी मोहिम सुरू केली. कृषक समाजाच्या विद्यमाने ‘राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी-विक्री संघ’ आणि ‘कृषक सहकारी भारतीय अधिकोश’ त्यांनी स्थापन केला. भारताच्या कृषिविषयक प्रगतीचे जगाला दर्शन घडावे म्हणून, त्यांच्याच प्रेरणेने दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन भरविण्यात आले (१९६०). त्यांनी कृषिमंत्री म्हणून विविध देशांना भेटीही दिल्या.

विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात अंदाजे १,००० च्या वर शाळा आहेत. महाविद्यालये, अभियांत्रिकी पदवी, तसेच पदविका तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय अशी अनेक महाविद्यालये सुरू करून, त्या संस्था शिक्षण क्षेत्रात फार मोठे योगदान देत आहेत. या सर्व शैक्षणिक आणि सामाजिक श्रमांमुळे अखेरीस त्यांना पक्षाघाताचा झटका आला आणि दिल्ली येथे त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ अकोल्यास पंजाबराव कृषी विद्यापीठ स्थापण्यात आलेले आहे. अशा महान व्यक्तीचे सन १९६५ मध्ये निधन झाले.

कृषी क्रांतीचे प्रणेते (Pioneers of Agricultural Revolution) डॉ. पंजाबराव देशमुख (Dr Panjabrao Deshmukh Birth Anniversary) यांनी उच्च शिक्षण हे एडिनबर्ग व आक्सफर्ड विद्यापीठ येथून पूर्ण केले. तसेच त्यांनी डॉक्टरेट ब्रिटेन येथून केले. त्यांच्या संशोधनाचा 'धर्म पहाट आणि त्याची वाढ' असा विषय होता. त्यांनी अमरावती येथे परत येवून कायदा शिक्षणाची तयारी सुरु केली. १९३० मध्ये ते प्रांतीय लॉ बोर्डाचे सदस्य म्हणून निवड होऊन ते शिक्षण मंत्री (Minister of Education), कृषी (Agriculture Minister) व सहकारी विभागाचे मंत्री बनले होते. स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या विकास समितीचे सदस्यि झाले. १९५२, १९५७ आणि १९६२ रोजी त्यांची खासदार म्हनणून नियुक्ती झाली. तसेच ते १९५२ ते १९६२ पर्यंत कृषी मंत्री होते.

सामाजिक जीवनातील योगदान (Social Worker) : त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद वसतिगृह सुरू केले. त्यांनी प्रसिद्ध श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय व इतर शैक्षणिक संस्था आणि वसतिगृहे यांचा समावेश आहे. शेतकरी स्थिती सुधारणा करण्यासाठी त्यांनी 'भारत कृषक समाज' स्थापन केले आणि त्यांनी अधिवक्ता धोरण कायम ठेवण्यासाठी एक वृत्तपत्र म्हणजे 'महाराष्ट्र केसरी' सुरु केले.

समाजाच्या उन्नतीसाठी केलेले कार्य : पंजाबरावांनी वकिली बरोबरच समाजकार्यास प्रारंभ केला. ते अमरावतीच्या जिल्हा बोर्डात अध्यक्ष झाले (१९२८). या वेळी त्यांनी सार्वजनिक विहिरी हरिजनांसाठी खुल्या केल्या. कर वाढवून येणारा पैसा शिक्षणावर खर्च केला व प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. अमरावतीचे अंबादेवी मंदिर अस्पृश्यांना खुले करण्यासाठी त्याच वर्षी सत्याग्रह केला. १९३० मध्ये त्यांची प्रांतिक कायदेमंडळात निवड झाली व ते शिक्षण, कृषी, सहकार आणि लोककर्म खात्यांचे मंत्री झाले. तथापि १९३३ मध्ये त्यांनी राजीनामा दिला त्यानंतर अमरावती मध्यवर्ती बँकेचे ते अध्यक्ष झाले. त्यांनी बहुजन समाजाच्या विकासासाठी श्रद्धानंद छात्रालय (१९२६) व श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली (१९३२). त्या शिक्षण संस्थेने अल्पावधीतच अनेक शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे सुरू केली.

शैक्षणिक व शेती क्षेत्रातील कार्य : त्यांनी प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडविण्याकरिता ‘भारतीय प्राथमिक शिक्षक संघ’ स्थापन केला. हे शैक्षणिक प्रसाराचे कार्य करीत असतानाच त्यांनी जुन्यापुराण्या शेती पद्धतीत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले. ते काँग्रेसचे सभासद होते व नेताजी सुभाषचंद्र बोसांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. राजकारणापासून अलिप्त होऊन देवास संस्थानात त्यांनी काही काळ ‘राजकीय मंत्री’ म्हणून काम केले. स्वातंत्र्यानंतर ते काँग्रेसमध्ये सक्रिय सहभागी झाले. १९५२,१९५७ व १९६२ या तीनही वर्षांच्या लोकसभेच्या निवडणुकांत ते विजयी झाले. १९५२ ते १९६२ पर्यंत ते केंद्रीय कृषिमंत्री आणि एक वर्ष सहकार मंत्री होते. या काळात त्यांनी अनेक समित्या स्थापन केल्या आणि कापूसबाजार, शेती वगैरे क्षेत्रांत आमूलाग्र सुधारणा घडवून आणल्या. मागास जमातीसाठी अखिल भारतीय मागास जातिसंघ, कृषिउत्पादकांच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा संघ, भारत कृषक समाज (१९५५), आफ्रो-आशियाई ग्रामीण पुनर्रचना संघटना इत्यादी संघटना त्यांनी यशस्वीपणे राबविल्या. जपानी भातशेतीचा प्रयोग देशभर व्हावा म्हणून त्यांनी देशव्यापी मोहिम सुरू केली. कृषक समाजाच्या विद्यमाने ‘राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी-विक्री संघ’ आणि ‘कृषक सहकारी भारतीय अधिकोश’ त्यांनी स्थापन केला. भारताच्या कृषिविषयक प्रगतीचे जगाला दर्शन घडावे म्हणून, त्यांच्याच प्रेरणेने दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन भरविण्यात आले (१९६०). त्यांनी कृषिमंत्री म्हणून विविध देशांना भेटीही दिल्या.

विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात अंदाजे १,००० च्या वर शाळा आहेत. महाविद्यालये, अभियांत्रिकी पदवी, तसेच पदविका तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय अशी अनेक महाविद्यालये सुरू करून, त्या संस्था शिक्षण क्षेत्रात फार मोठे योगदान देत आहेत. या सर्व शैक्षणिक आणि सामाजिक श्रमांमुळे अखेरीस त्यांना पक्षाघाताचा झटका आला आणि दिल्ली येथे त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ अकोल्यास पंजाबराव कृषी विद्यापीठ स्थापण्यात आलेले आहे. अशा महान व्यक्तीचे सन १९६५ मध्ये निधन झाले.

Last Updated : Dec 27, 2022, 9:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.