ETV Bharat / bharat

दोघांनी आकाशात बांधली साताजन्माची गाठ, DGCA ने दिले चौकशीचे आदेश

author img

By

Published : May 24, 2021, 3:47 PM IST

Updated : May 24, 2021, 7:25 PM IST

कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे धुमधडक्यात लग्न करण्याचे तरुण-तरुणींचे स्वप्न धुळीस मिळतय. जमीनीवर लॉकडाऊन असलं म्हणून काय झालं. तामिळनाडूच्या मदुराईमधील एका जोडप्याने थेट आकाशात साताजन्माची गाठ बांधली. मात्र, त्यांना हे लग्न चांगलेच महागात पडणार असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) चौकशीचे आदेश दिले आहेत.

विमानात लग्न सोहळा
विमानात लग्न सोहळा

मदुराई - लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला जिव्हाळ्याचा विषय. लोक आपले लग्न चांगले लक्षात राहावे किंवा अनेकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी नव नवीन फंडे शोधतात. मात्र, कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे धुमधडक्यात लग्न करण्याचे तरुण-तरुणींचे स्वप्न धुळीस मिळतय. देशात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू आहे. जमीनीवर लॉकडाऊन असलं म्हणून काय झालं. तामिळनाडूच्या मदुराईमधील एका जोडप्याने थेट आकाशात साताजन्माची गाठ बांधली.

अर्थात त्यांनी विमानात लग्न रचलं आहे. सध्या सोशल मीडियावर या विवाहसोहळ्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र, त्यांना हे लग्न चांगलेच महागात पडणार असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) चौकशीचे आदेश दिले आहेत.

लग्न समारंभामध्ये भाग घेतलेल्या आणि कोरोना नियमांचे उल्लघंन करणाऱ्या सर्व प्रवाशांविरूद्ध डीजीसीएने तक्रार नोंदवण्यास सांगितले आहे. या घटनेसंदर्भात डीजीसीएने विमान कंपनी आणि विमानतळ प्राधिकरणाकडून संपूर्ण अहवाल मागविला आहे. तसेच दिशानिर्देशांचे पालन करण्याचे कडक निर्देश डीजीसीएने दिले आहेत. दरम्यान, विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना विमानात लग्न होणार असल्याची माहिती नव्हती, असे मदुराई विमानतळ संचालक एस. सेंथिल वलावन यांनी सांगितले

देशभरात चर्चेचा विषय -

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नातेवाईकांच्या उपस्थितीत ही जोडी विमानातच एकमेकांना हार घालताना दिसत आहे. या विमानाने मदुराई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. हे उड्डाण साधारण दोन तासांचे होते. जेव्हा विमान मीनाक्षी अम्मन मंदिरावरून उडत होते. तेव्हा हे जोडपे लग्नाच्या बंधनात अडकले. तसेच विमानातील सर्व विना मास्क असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या नियमांचे उल्लघंन केल्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई होणार हे अद्याप स्पष्ट नसले. तरी हा अफलातून विवाहसोहळा सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

तामिळनाडूत लॉकडाऊन -

देशामध्ये कोरोनाचा कहर असून रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत गरजेचे आहे. यातच अनेक जण कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करताना दिसून येत आहेत. कोरोना संसर्गाचं वाढतं प्रमाण पाहता, मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी 24 मे पासून 31 मे पर्यंत सक्तीचा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला.

मदुराई - लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला जिव्हाळ्याचा विषय. लोक आपले लग्न चांगले लक्षात राहावे किंवा अनेकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी नव नवीन फंडे शोधतात. मात्र, कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे धुमधडक्यात लग्न करण्याचे तरुण-तरुणींचे स्वप्न धुळीस मिळतय. देशात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू आहे. जमीनीवर लॉकडाऊन असलं म्हणून काय झालं. तामिळनाडूच्या मदुराईमधील एका जोडप्याने थेट आकाशात साताजन्माची गाठ बांधली.

अर्थात त्यांनी विमानात लग्न रचलं आहे. सध्या सोशल मीडियावर या विवाहसोहळ्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र, त्यांना हे लग्न चांगलेच महागात पडणार असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) चौकशीचे आदेश दिले आहेत.

लग्न समारंभामध्ये भाग घेतलेल्या आणि कोरोना नियमांचे उल्लघंन करणाऱ्या सर्व प्रवाशांविरूद्ध डीजीसीएने तक्रार नोंदवण्यास सांगितले आहे. या घटनेसंदर्भात डीजीसीएने विमान कंपनी आणि विमानतळ प्राधिकरणाकडून संपूर्ण अहवाल मागविला आहे. तसेच दिशानिर्देशांचे पालन करण्याचे कडक निर्देश डीजीसीएने दिले आहेत. दरम्यान, विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना विमानात लग्न होणार असल्याची माहिती नव्हती, असे मदुराई विमानतळ संचालक एस. सेंथिल वलावन यांनी सांगितले

देशभरात चर्चेचा विषय -

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नातेवाईकांच्या उपस्थितीत ही जोडी विमानातच एकमेकांना हार घालताना दिसत आहे. या विमानाने मदुराई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. हे उड्डाण साधारण दोन तासांचे होते. जेव्हा विमान मीनाक्षी अम्मन मंदिरावरून उडत होते. तेव्हा हे जोडपे लग्नाच्या बंधनात अडकले. तसेच विमानातील सर्व विना मास्क असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या नियमांचे उल्लघंन केल्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई होणार हे अद्याप स्पष्ट नसले. तरी हा अफलातून विवाहसोहळा सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

तामिळनाडूत लॉकडाऊन -

देशामध्ये कोरोनाचा कहर असून रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत गरजेचे आहे. यातच अनेक जण कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करताना दिसून येत आहेत. कोरोना संसर्गाचं वाढतं प्रमाण पाहता, मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी 24 मे पासून 31 मे पर्यंत सक्तीचा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला.

Last Updated : May 24, 2021, 7:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.