नवी दिल्ली : गेल्या २४ तासांमध्ये देशात २ लाख ७६ हजार ११० नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. यानंतर देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २ कोटी, ५७ लाख, ७२ हजार ४४०वर पोहोचली आहे. चार दिवसांनंतर काल पहिल्यांदाच एका दिवसातील चार हजारांहून कमी मृत्यूंची नोंद करण्यात आली.
गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाच्या ३ हजार ८७४ बळींची नोंद झाली. यानंतर देशातील एकूण बळींची संख्या २ लाख, ८७ हजार १२२वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. देशातील सक्रिय रुग्णसंख्या सध्या ३१ लाख, २९ हजार ८७८वर पोहोचली आहे. तर देशाचा रिकव्हरी रेट वाढून ८६.७४ टक्के झाला आहे.
या बळींमध्ये महाराष्ट्रातील ५९४, कर्नाटकातील ४६८, तामिळनाडूचे ३६५, उत्तर प्रदेशचे २८०, दिल्लीमधील २३५, पंजाबमधील २०८ आणि इतर राज्यांमधील रुग्णांचा समावेश आहे. एकूण मृत्यूंमध्ये महाराष्ट्राचा नंबर सगळ्यात पुढे आहे. राज्यात आतापर्यंत ८४ हजार ३४१ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.