ETV Bharat / bharat

Royal Family Mussoorie Connection : ब्रिटनच्या राजघराण्याचं मसूरीशी आहे खास नातं, राज्याभिषेकानिमित्त पाठवला खास संदेश

author img

By

Published : May 7, 2023, 10:28 PM IST

काल 6 मे रोजी ब्रिटनचे नवीन राजा, चार्ल्स तिसरे यांचा राज्याभिषेक झाला. या खास प्रसंगी मसूरीचे प्रसिद्ध इतिहासकार गोपाल भारद्वाज यांनी ब्रिटनला पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे त्यांनी महाराजांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या मते, ब्रिटनच्या राजघराण्याचे मसूरीशी जुने नाते आहे.

Royal Family Mussoorie Connection
Royal Family Mussoorie Connection

मसूरी (उत्तराखंड) : ब्रिटनचे नवे महाराजा चार्ल्स तिसरे यांचा 6 मे रोजी राज्याभिषेक झाला. यावेळी प्रसिद्ध इतिहासकार गोपाल भारद्वाज यांनी चार्ल्स तिसरे यांचे अभिनंदन करणारे पत्र पाठवले. वास्तविक, गोपाल भारद्वाज यांच्या वडिलांनी राणी एलिझाबेथ द्वितीय यांची कुंडली तयार केली होती. त्यांच्या मते, ब्रिटनच्या राजघराण्याचे मसूरीशी खूप जुने नाते आहे.

महाराजांचा थाटामाटात राज्याभिषेक : ब्रिटनच्या महाराजांचा हा शाही सोहळा काल मोठ्या थाटात पार पडला. राजा चार्ल्स तिसरा आणि राणी कॅमिला यांचा लंडनमध्ये मोठ्या धूमधडाक्यात राज्याभिषेक करण्यात आला. ब्रिटनच्या महाराजांच्या राज्याभिषेकासाठी संपूर्ण शहर नववधूप्रमाणे सजले होते. या सोहळ्यात 2 हजारांहून अधिक लोक विशेष अतिथी म्हणून सहभागी झाले होते. या शाही कार्यक्रमात जगातील अनेक देशांतील महत्वाचे लोकही सहभागी झाले होते.

राजघराण्याचा मसूरीशी जुना संबंध : ब्रिटनचे नवे महाराजा चार्ल्स तीसरे यांच्या कुटुंबाचे डोंगरांची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मसूरीशी जुने नाते आहे. यापूर्वी प्रसिद्ध इतिहासकार गोपाल भारद्वाज यांनी ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना त्यांच्या कारकिर्दीला 70 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. राणीच्या खासगी सचिवांना पत्र लिहिण्यासोबतच तिचे वडील आरजीआर भारद्वाज यांनी बनवलेल्या ब्रिटनच्या राणी एलिझाबेथच्या कुंडलीची मूळ प्रतही पाठवण्यात आली होती. विशेष म्हणजे राणीच्या खाजगी सचिवाने पत्र पाठवून राणीच्या वतीने त्यांचे आभारही मानले गेले होते.

राणीचे कुटुंब सतत मसूरीला येत असे : गोपाल भारद्वाज यांनी सांगितले की, राणीचे कुटुंब सतत मसूरीला येत असे. 1870 मध्ये त्यांचे मोठे मुलगे मसूरीला आले. त्यानंतर त्यांनी मसूरी येथील लाल टिब्बा कब्रस्तानमध्ये एक रोप लावले, जे आजही अस्तित्वात आहे. वेल्सची राजकुमारी जी नंतर क्वीन मेरी बनली ती 1906 मध्ये मसूरीला आली होती. मसूरीतील गांधी चौकाजवळील चर्च ऑफ इंग्लंडमध्ये त्यांच्या हस्ते एक रोपटे लावण्यात आले होते.

वडिलांनी राणी एलिझाबेथची अचूक कुंडली तयार केली : ते पुढे म्हणाले की, त्यांचे वडील ज्योतिष्याचे अभ्यासक होते. 20 मे 1953 रोजी त्यांनी ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीयची कुंडली तयार केली होती. ज्यात त्यांनी स्पष्ट सांगितले होते की, त्यांची सत्ता ऐतिहासिक असेल. ब्रिटनच्या राणीचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले. त्यांचे वडील आरजीआर भारद्वाज यांनी आधीच भविष्यवाणी केली होती की, क्वीन एलिझाबेथच्या कुंडलीतील विशेष गोष्ट म्हणजे त्या दीर्घायुषी असतील. त्यांच्या राजवटीत कोणतीही मोठी घटना किंवा दुर्घटना घडणार नाही. त्या त्यांचे राज्य शांततेने चालवतील.

कुटुंबात 500 वर्षांपासून ज्योतिष्याचे कार्य केले जाते : गोपाल भारद्वाज यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबात 500 वर्षांपासून ज्योतिष्याचे कार्य केले जाते. त्यांच्याकडे श्री रामचंद्र, भगवान कृष्ण, गुरु नानक देव यांची 300 वर्षे जुनी जन्मपत्रिकाही आहे. त्यांच्या वडिलांनी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मोतीलाल नेहरू, मदन मोहन मालवीय यांच्या जन्म तक्त्याही बनवल्या होत्या, ज्या आजही त्यांच्याकडे आहेत. त्यांनी सांगितले की, त्यांच्याकडे अनेक महत्त्वाचे ऐतिहासिक दस्तऐवज आहेत, जे सरकारने जतन केले पाहिजेत.

हेही वाचा :

  1. Karnataka Election 2023 : सिद्धरामय्या यांना टक्कर देण्यासाठी भाजपची मोठी योजना, स्टार प्रचारकांची फळी मैदानात
  2. Notice to Bageshwar Baba : धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना पोलिसांनी बजावली नोटीस; 'हे' आहे कारण
  3. Karnataka Election 2022 : भाजप देशाची संपत्ती लुटण्यात व्यस्त; प्रियंका, राहुल गांधींची जोरदार टीका

मसूरी (उत्तराखंड) : ब्रिटनचे नवे महाराजा चार्ल्स तिसरे यांचा 6 मे रोजी राज्याभिषेक झाला. यावेळी प्रसिद्ध इतिहासकार गोपाल भारद्वाज यांनी चार्ल्स तिसरे यांचे अभिनंदन करणारे पत्र पाठवले. वास्तविक, गोपाल भारद्वाज यांच्या वडिलांनी राणी एलिझाबेथ द्वितीय यांची कुंडली तयार केली होती. त्यांच्या मते, ब्रिटनच्या राजघराण्याचे मसूरीशी खूप जुने नाते आहे.

महाराजांचा थाटामाटात राज्याभिषेक : ब्रिटनच्या महाराजांचा हा शाही सोहळा काल मोठ्या थाटात पार पडला. राजा चार्ल्स तिसरा आणि राणी कॅमिला यांचा लंडनमध्ये मोठ्या धूमधडाक्यात राज्याभिषेक करण्यात आला. ब्रिटनच्या महाराजांच्या राज्याभिषेकासाठी संपूर्ण शहर नववधूप्रमाणे सजले होते. या सोहळ्यात 2 हजारांहून अधिक लोक विशेष अतिथी म्हणून सहभागी झाले होते. या शाही कार्यक्रमात जगातील अनेक देशांतील महत्वाचे लोकही सहभागी झाले होते.

राजघराण्याचा मसूरीशी जुना संबंध : ब्रिटनचे नवे महाराजा चार्ल्स तीसरे यांच्या कुटुंबाचे डोंगरांची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मसूरीशी जुने नाते आहे. यापूर्वी प्रसिद्ध इतिहासकार गोपाल भारद्वाज यांनी ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना त्यांच्या कारकिर्दीला 70 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. राणीच्या खासगी सचिवांना पत्र लिहिण्यासोबतच तिचे वडील आरजीआर भारद्वाज यांनी बनवलेल्या ब्रिटनच्या राणी एलिझाबेथच्या कुंडलीची मूळ प्रतही पाठवण्यात आली होती. विशेष म्हणजे राणीच्या खाजगी सचिवाने पत्र पाठवून राणीच्या वतीने त्यांचे आभारही मानले गेले होते.

राणीचे कुटुंब सतत मसूरीला येत असे : गोपाल भारद्वाज यांनी सांगितले की, राणीचे कुटुंब सतत मसूरीला येत असे. 1870 मध्ये त्यांचे मोठे मुलगे मसूरीला आले. त्यानंतर त्यांनी मसूरी येथील लाल टिब्बा कब्रस्तानमध्ये एक रोप लावले, जे आजही अस्तित्वात आहे. वेल्सची राजकुमारी जी नंतर क्वीन मेरी बनली ती 1906 मध्ये मसूरीला आली होती. मसूरीतील गांधी चौकाजवळील चर्च ऑफ इंग्लंडमध्ये त्यांच्या हस्ते एक रोपटे लावण्यात आले होते.

वडिलांनी राणी एलिझाबेथची अचूक कुंडली तयार केली : ते पुढे म्हणाले की, त्यांचे वडील ज्योतिष्याचे अभ्यासक होते. 20 मे 1953 रोजी त्यांनी ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीयची कुंडली तयार केली होती. ज्यात त्यांनी स्पष्ट सांगितले होते की, त्यांची सत्ता ऐतिहासिक असेल. ब्रिटनच्या राणीचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले. त्यांचे वडील आरजीआर भारद्वाज यांनी आधीच भविष्यवाणी केली होती की, क्वीन एलिझाबेथच्या कुंडलीतील विशेष गोष्ट म्हणजे त्या दीर्घायुषी असतील. त्यांच्या राजवटीत कोणतीही मोठी घटना किंवा दुर्घटना घडणार नाही. त्या त्यांचे राज्य शांततेने चालवतील.

कुटुंबात 500 वर्षांपासून ज्योतिष्याचे कार्य केले जाते : गोपाल भारद्वाज यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबात 500 वर्षांपासून ज्योतिष्याचे कार्य केले जाते. त्यांच्याकडे श्री रामचंद्र, भगवान कृष्ण, गुरु नानक देव यांची 300 वर्षे जुनी जन्मपत्रिकाही आहे. त्यांच्या वडिलांनी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मोतीलाल नेहरू, मदन मोहन मालवीय यांच्या जन्म तक्त्याही बनवल्या होत्या, ज्या आजही त्यांच्याकडे आहेत. त्यांनी सांगितले की, त्यांच्याकडे अनेक महत्त्वाचे ऐतिहासिक दस्तऐवज आहेत, जे सरकारने जतन केले पाहिजेत.

हेही वाचा :

  1. Karnataka Election 2023 : सिद्धरामय्या यांना टक्कर देण्यासाठी भाजपची मोठी योजना, स्टार प्रचारकांची फळी मैदानात
  2. Notice to Bageshwar Baba : धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना पोलिसांनी बजावली नोटीस; 'हे' आहे कारण
  3. Karnataka Election 2022 : भाजप देशाची संपत्ती लुटण्यात व्यस्त; प्रियंका, राहुल गांधींची जोरदार टीका
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.