ETV Bharat / bharat

घटस्फोटाशिवाय दुसरे लग्न करणाऱ्या पतीच्या शोधात मुंबईची महिला पोहोचली झारखंडला - गिरिडीह मुस्लीम महिला हुंडाबळी

पतीच्या मागण्या पूर्ण करण्यास आपल्या कुटुंबीयांनी नकार दिल्यानंतर त्याने आपल्याला मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप खुशीने केला आहे. घरगुती हिंसेला कंटाळून तिने 2 सप्टेंबर 2019 मध्ये मुंबईच्या बोरीवली पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार नोंदवली. लॉकडाऊन लागू झाल्याच्या सुमारास समीर अन्सारी मुंबईहून त्याचे गाव लोकाय येथे आला होता. येथे त्याने दुसरे लग्न केल्याचे समजल्यानंतर खुशीने न्यायासाठी आवाज उठवला आहे.

पतीच्या शोधात मुंबईची महिला पोहोचली झारखंडला
पतीच्या शोधात मुंबईची महिला पोहोचली झारखंडला
author img

By

Published : Sep 6, 2020, 12:39 PM IST

गांडेय/गिरिडीह (झारखंड) - मुंबईतील रहिवासी असलेली एक विवाहिता तिच्या पतीच्या शोधात गांडेयमधील तिसरी येथील लोकाय येथे पोहोचली. तिसरी येथील तिच्या सासरी फोन केल्यानंतर तिच्या पतीने दुसरे लग्न केल्याचे तिला समजले. तिच्या पतीने 17 ऑगस्टला दुसऱ्या मुलीशी लग्न केले असून तो तिच्यासेबत फरार झाल्याचे समोर आले आहे. पतीने दुसरे लग्न केल्याचे समजताच संबंधित विवाहितेने तिच्या सासरच्या घरी धाव घेत जोरदार वादावादी केली. यानंतर तिच्या नातेवाईकांसह तिने लोकाय नायनपूर पोलीस ठाणे गाठत न्यायाची मागणी केली.

घटस्फोटाशिवाय दुसरे लग्न करणाऱ्या पतीच्या शोधात मुंबईची महिला पोहोचली झारखंडला
पतीकडून वारंवार हुंड्याची मागणी
खुशी समीर अन्सारी असे या महिलेचे नाव आहे. तिने यासंबंधी माहिती देताना आपण मुंबईची रहिवासी असल्याचे सांगितले. 2007 मध्ये तिचा विवाह तिसरी येथील लोकायचा रहिवासी असलेल्या सिद्दीकी अन्सारी यांचा मुलगा समीर अन्सारी याच्याशी झाला होता. लग्नानंतर दोन वर्षांपर्यंत त्यांचे वैवाहिक जीवन ठीक चालले होते. मात्र, यानंतर पतीने तिच्याकडे हुंड्याची मागणी करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला आपल्या कुटुंबीयांनी त्याच्या मागण्या पूर्ण केल्याचे खुशीने सांगितले. मात्र, त्याच्या मागण्या वाढतच राहिल्या. तेव्हा मात्र, आपल्या कुटुंबीयांनी त्या पूर्ण करण्यास नकार दिल्याचे खुशीने सांगितले.
मुंबईत पतीविरोधात दाखल केला खटला
पतीच्या मागण्या पूर्ण करण्यास आपल्या कुटुंबीयांनी नकार दिल्यानंतर त्याने आपल्याला मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप खुशीने केला आहे. घरगुती हिंसेला कंटाळून तिने 2 सप्टेंबर 2019 मध्ये मुंबईच्या बोरीवली पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार नोंदवली. यानंतर तिचा पती तिला सोडून वेगळे राहू लागला. लॉकडाऊन लागू झाल्याच्या सुमारास समीर अन्सारी मुंबईहून त्याचे गाव लोकाय येथे आला होता, असे खुशीने सांगितले. यानंतर त्याने दुसरे लग्न केल्याचे समजल्यानंतर खुशीने लोकाय नायनपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

गांडेय/गिरिडीह (झारखंड) - मुंबईतील रहिवासी असलेली एक विवाहिता तिच्या पतीच्या शोधात गांडेयमधील तिसरी येथील लोकाय येथे पोहोचली. तिसरी येथील तिच्या सासरी फोन केल्यानंतर तिच्या पतीने दुसरे लग्न केल्याचे तिला समजले. तिच्या पतीने 17 ऑगस्टला दुसऱ्या मुलीशी लग्न केले असून तो तिच्यासेबत फरार झाल्याचे समोर आले आहे. पतीने दुसरे लग्न केल्याचे समजताच संबंधित विवाहितेने तिच्या सासरच्या घरी धाव घेत जोरदार वादावादी केली. यानंतर तिच्या नातेवाईकांसह तिने लोकाय नायनपूर पोलीस ठाणे गाठत न्यायाची मागणी केली.

घटस्फोटाशिवाय दुसरे लग्न करणाऱ्या पतीच्या शोधात मुंबईची महिला पोहोचली झारखंडला
पतीकडून वारंवार हुंड्याची मागणी
खुशी समीर अन्सारी असे या महिलेचे नाव आहे. तिने यासंबंधी माहिती देताना आपण मुंबईची रहिवासी असल्याचे सांगितले. 2007 मध्ये तिचा विवाह तिसरी येथील लोकायचा रहिवासी असलेल्या सिद्दीकी अन्सारी यांचा मुलगा समीर अन्सारी याच्याशी झाला होता. लग्नानंतर दोन वर्षांपर्यंत त्यांचे वैवाहिक जीवन ठीक चालले होते. मात्र, यानंतर पतीने तिच्याकडे हुंड्याची मागणी करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला आपल्या कुटुंबीयांनी त्याच्या मागण्या पूर्ण केल्याचे खुशीने सांगितले. मात्र, त्याच्या मागण्या वाढतच राहिल्या. तेव्हा मात्र, आपल्या कुटुंबीयांनी त्या पूर्ण करण्यास नकार दिल्याचे खुशीने सांगितले.
मुंबईत पतीविरोधात दाखल केला खटला
पतीच्या मागण्या पूर्ण करण्यास आपल्या कुटुंबीयांनी नकार दिल्यानंतर त्याने आपल्याला मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप खुशीने केला आहे. घरगुती हिंसेला कंटाळून तिने 2 सप्टेंबर 2019 मध्ये मुंबईच्या बोरीवली पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार नोंदवली. यानंतर तिचा पती तिला सोडून वेगळे राहू लागला. लॉकडाऊन लागू झाल्याच्या सुमारास समीर अन्सारी मुंबईहून त्याचे गाव लोकाय येथे आला होता, असे खुशीने सांगितले. यानंतर त्याने दुसरे लग्न केल्याचे समजल्यानंतर खुशीने लोकाय नायनपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.