ETV Bharat / bharat

श्रमिक रेल्वेमध्ये 55 वर्षीय महिलेचा मृत्यू, 75 जणांना केले क्वारंटाईन

author img

By

Published : May 21, 2020, 7:48 AM IST

लुधियाना येथून अकबरपूर पोहोचलेल्या श्रमिक रेल्वेमध्ये एका 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

woman died in train
woman died in train

नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना संकटाने थैमान घातले असून भारतामध्ये रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आल्याने अनेक स्थलांतरीत कामगार देशातील विविध भागामध्ये अडकून पडले आहेत. त्यांना घरी सोडण्यासाठी सरकारने श्रमिक रेल्वे सुरू केल्या आहेत. मात्र, लुधियाना येथून अकबरपूर पोहोचलेल्या श्रमिक रेल्वेमध्ये एका 55 वर्षीय प्रवासी महिलेचा मृत्यू झाला आहे.

महिलेच्या मृत्यूनंतर रेल्वेमधील संबधित डब्ब्यातील 75 कामगारांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेत त्यांचे कोरोना चाचणी करण्यासाठी नमुने रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. त्याचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना घरी पाठवण्यात येणार आहे.

आज श्रमिक रेल्वे लुधियाना येथून प्रवाशांना घेऊन अकबरपूर येथे पोहोचली. रेल्वेमध्ये 1 हजार 338 प्रवासी होते. दरम्यान महिलेच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह अंबाला रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आला आहे.

नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना संकटाने थैमान घातले असून भारतामध्ये रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आल्याने अनेक स्थलांतरीत कामगार देशातील विविध भागामध्ये अडकून पडले आहेत. त्यांना घरी सोडण्यासाठी सरकारने श्रमिक रेल्वे सुरू केल्या आहेत. मात्र, लुधियाना येथून अकबरपूर पोहोचलेल्या श्रमिक रेल्वेमध्ये एका 55 वर्षीय प्रवासी महिलेचा मृत्यू झाला आहे.

महिलेच्या मृत्यूनंतर रेल्वेमधील संबधित डब्ब्यातील 75 कामगारांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेत त्यांचे कोरोना चाचणी करण्यासाठी नमुने रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. त्याचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना घरी पाठवण्यात येणार आहे.

आज श्रमिक रेल्वे लुधियाना येथून प्रवाशांना घेऊन अकबरपूर येथे पोहोचली. रेल्वेमध्ये 1 हजार 338 प्रवासी होते. दरम्यान महिलेच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह अंबाला रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.