ETV Bharat / bharat

दहशतवाद रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने ठोस पावले उचलावीत - व्यंकय्या नायडू

१९६६ साली भारताने सीसीआयटीचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघात ठेवला होता. पण, त्यावर अजूनही कारवाई करण्यात आली नाही.

author img

By

Published : Feb 17, 2019, 2:23 PM IST

वैंकेय्या नायडू


दिल्ली/प्रयागराज - जगभरात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. त्या रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने ठोस पावले उचलावीत, असे वक्तव्य उप राष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. ते प्रयागराज येथे आयोजित कुंभमेळ्यात बोलत होते. पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला होता. त्या पार्श्वभूमिवर उपराष्ट्रपतींनी हे विधान केले.

नायडू म्हणाले, भारत नेहमीच शांतता आणि सुसंवाद ठेऊ इच्छितो. आम्ही कुठल्याच देशावर कधी हल्ला करत नाही. पण, आमचा शेजारी देश पाकिस्तान दहशतवादाला पोसत आहे. दहशतवाद जगासाठी चांगला नाही. त्याच्याविरोधात आपण सर्वांनी एकत्र यायला हवे. यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने पुढाकार घ्यायला हवा.

आंतरराष्ट्रीय दहशतवादावर व्यापक परिषद (सीसीआयटी) आयोजित करण्याचा प्रस्ताव भारताने १९६६ ला केला होता. सीसीआयटी सर्व देशांना एक बंधन घालण्याचा प्रयत्न करू शकते. ज्याद्वारे सर्व देशांना दहशतवादी गटांना पोसण्यापासून रोखण्यात येईल. या परिषदेचा पहिला मसुदा १९६६ साली ठेवण्यात आला. ज्यावर २०१३ मध्ये चर्चा करण्यात आली होती.

२०१७ मध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रातील देशांना सीसीआयटीबाबत सकारात्मक विचार करण्याचे आवाहन केले होते. यावेळी स्वराज म्हणाल्या होत्या, की भारताने दोन दशकांपूर्वी याचा प्रस्ताव ठेवला. पण, संयुक्त राष्ट्र अजूनही दहशतवादाची व्याख्या करण्यास तयार नाही.

undefined

गुरुवारी पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पुलवामा येथे हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४५ जवान धारातिर्थी पडले. त्यानंतर पाकिस्तानचा निषेध म्हणून भारताने त्यांचा मोस्ट फेवर्ड नेशन हा दर्जा काढून घेतला आहे. हा दर्जा काढून टाकल्यामुळे त्यांच्या व्यापारावर परिणाम होऊ शकतो.


दिल्ली/प्रयागराज - जगभरात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. त्या रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने ठोस पावले उचलावीत, असे वक्तव्य उप राष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. ते प्रयागराज येथे आयोजित कुंभमेळ्यात बोलत होते. पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला होता. त्या पार्श्वभूमिवर उपराष्ट्रपतींनी हे विधान केले.

नायडू म्हणाले, भारत नेहमीच शांतता आणि सुसंवाद ठेऊ इच्छितो. आम्ही कुठल्याच देशावर कधी हल्ला करत नाही. पण, आमचा शेजारी देश पाकिस्तान दहशतवादाला पोसत आहे. दहशतवाद जगासाठी चांगला नाही. त्याच्याविरोधात आपण सर्वांनी एकत्र यायला हवे. यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने पुढाकार घ्यायला हवा.

आंतरराष्ट्रीय दहशतवादावर व्यापक परिषद (सीसीआयटी) आयोजित करण्याचा प्रस्ताव भारताने १९६६ ला केला होता. सीसीआयटी सर्व देशांना एक बंधन घालण्याचा प्रयत्न करू शकते. ज्याद्वारे सर्व देशांना दहशतवादी गटांना पोसण्यापासून रोखण्यात येईल. या परिषदेचा पहिला मसुदा १९६६ साली ठेवण्यात आला. ज्यावर २०१३ मध्ये चर्चा करण्यात आली होती.

२०१७ मध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रातील देशांना सीसीआयटीबाबत सकारात्मक विचार करण्याचे आवाहन केले होते. यावेळी स्वराज म्हणाल्या होत्या, की भारताने दोन दशकांपूर्वी याचा प्रस्ताव ठेवला. पण, संयुक्त राष्ट्र अजूनही दहशतवादाची व्याख्या करण्यास तयार नाही.

undefined

गुरुवारी पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पुलवामा येथे हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४५ जवान धारातिर्थी पडले. त्यानंतर पाकिस्तानचा निषेध म्हणून भारताने त्यांचा मोस्ट फेवर्ड नेशन हा दर्जा काढून घेतला आहे. हा दर्जा काढून टाकल्यामुळे त्यांच्या व्यापारावर परिणाम होऊ शकतो.

Intro:Body:

दहशतवाद रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने ठोस पावले उचलावीत - व्यंकय्या नायडू

दिल्ली/प्रयागराज - जगभरात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. त्या रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने ठोस पावले उचलावीत, असे वक्तव्य उप राष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. ते प्रयागराज येथे आयोजित कुंभमेळ्यात बोलत होते. पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला होता. त्या पार्श्वभूमिवर उपराष्ट्रपतींनी हे विधान केले.



नायडू म्हणाले, भारत नेहमीच शांतता आणि सुसंवाद ठेऊ इच्छितो. आम्ही कुठल्याच देशावर कधी हल्ला करत नाही. पण, आमचा शेजारी देश पाकिस्तान दहशतवादाला पोसत आहे. दहशतवाद जगासाठी चांगला नाही. त्याच्याविरोधात आपण सर्वांनी एकत्र यायला हवे. यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने पुढाकार घ्यायला हवा.



आंतरराष्ट्रीय दहशतवादावर व्यापक परिषद (सीसीआयटी) आयोजित करण्याचा प्रस्ताव भारताने १९६६ ला केला होता. सीसीआयटी सर्व देशांना एक बंधन घालण्याचा प्रयत्न करू शकते. ज्याद्वारे सर्व देशांना दहशतवादी गटांना पोसण्यापासून रोखण्यात येईल. या परिषदेचा पहिला मसुदा १९६६ साली ठेवण्यात आला. ज्यावर २०१३ मध्ये चर्चा करण्यात आली होती.



२०१७ मध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रातील देशांना सीसीआयटीबाबत सकारात्मक विचार करण्याचे आवाहन केले होते. यावेळी स्वराज म्हणाल्या होत्या, की भारताने दोन दशकांपूर्वी याचा प्रस्ताव ठेवला. पण, संयुक्त राष्ट्र अजूनही दहशतवादाची व्याख्या करण्यास तयार नाही.



गुरुवारी पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पुलवामा येथे हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४५ जवान धारातिर्थी पडले. त्यानंतर पाकिस्तानचा निषेध म्हणून भारताने त्यांचा मोस्ट फेवर्ड नेशन हा दर्जा काढून घेतला आहे. हा दर्जा काढून टाकल्यामुळे त्यांच्या व्यापारावर परिणाम होऊ शकतो.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.