नवी दिल्ली - पाकिस्तानी सैन्याकडून पाच निशस्त्र भारतीय नागरिकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - नवा नागरिकत्व कायदा भाजपला राजकीयदृष्ट्या कितपत फायदेशीर?
या नागरिकांनी पुंछ सेक्टरमध्ये एलओसीवरील कुंपण ओलांडले होते. मात्र, ते भारतीय हद्दीत असूनही पाकिस्तानी सैन्याने त्यांच्यावर हल्ला केला. पाचही नागरिकांनी जनावरांवर लक्ष ठेवण्यसाठी कुंपण ओलांडले होते. या हल्ल्यात मोहम्मद अस्लम आणि अल्ताफ हुसेन यांचा मृत्यू झाला आहे. अन्य तिघे जण जखमी असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.