ETV Bharat / bharat

अनिल अंबानींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, पैसे भरा नाहीतर तुरुंगात जावे लागेल

न्यायमूर्ती रोहिंन्टन फाली नरिमन आणि न्यायमूर्ती विनीत शरण यांनी न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी या तिघांनाही प्रत्येकी १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दंडाची रक्कम न्यायालयाच्या कार्यालयात १ महिन्याच्या आत न भरल्यास या तिघांना १ महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागेल, असे न्यायालयाने सुनावले आहे.

author img

By

Published : Feb 20, 2019, 1:11 PM IST

अनिल अंबानी

नवी दिल्ली - रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी आणि अन्य २ संचालकांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. २ न्यायमूर्तींच्या पीठाने अनिल अंबानी, सतीश सेठ आणि छाया विराणी यांना ४ आठवड्यांच्या आत एरिक्सन कंपनीला ४५३ कोटी चुकते करण्याचे आदेश दिले आहेत. असे न केल्यास त्यांना ३ महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागेल, असे न्यायालयाने सुनावले आहे.

टेलीकॉम उपकरणांची निर्मिती करणाऱ्या एरिक्सन कंपनीने अंबानी यांच्याविरोधात ५५० कोटींची थकीत रक्कम न भरल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या तीन अवमानना याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी निर्णय दिला. या प्रकरणी न्यायमूर्ती रोहिंन्टन फाली नरिमन आणि न्यायमूर्ती विनीत शरण यांनी अंबानी आणि त्यांच्या २ संचालकांना न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचे म्हटले आहे. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी या तिघांनाही प्रत्येकी १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दंडाची रक्कम न्यायालयाच्या कार्यालयात १ महिन्याच्या आत न भरल्यास या तिघांना १ महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागेल, असे न्यायालयाने सुनावले आहे.


न्यायालयाच्या आदेशानंतर रिलायन्स कम्युनिकेशच्या प्रवक्त्याने आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत असून, त्यांच्या आदेशानुसार इतर बाबींचीही पूर्तताकरू, असे म्हटले आहे.

undefined

नवी दिल्ली - रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी आणि अन्य २ संचालकांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. २ न्यायमूर्तींच्या पीठाने अनिल अंबानी, सतीश सेठ आणि छाया विराणी यांना ४ आठवड्यांच्या आत एरिक्सन कंपनीला ४५३ कोटी चुकते करण्याचे आदेश दिले आहेत. असे न केल्यास त्यांना ३ महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागेल, असे न्यायालयाने सुनावले आहे.

टेलीकॉम उपकरणांची निर्मिती करणाऱ्या एरिक्सन कंपनीने अंबानी यांच्याविरोधात ५५० कोटींची थकीत रक्कम न भरल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या तीन अवमानना याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी निर्णय दिला. या प्रकरणी न्यायमूर्ती रोहिंन्टन फाली नरिमन आणि न्यायमूर्ती विनीत शरण यांनी अंबानी आणि त्यांच्या २ संचालकांना न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचे म्हटले आहे. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी या तिघांनाही प्रत्येकी १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दंडाची रक्कम न्यायालयाच्या कार्यालयात १ महिन्याच्या आत न भरल्यास या तिघांना १ महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागेल, असे न्यायालयाने सुनावले आहे.


न्यायालयाच्या आदेशानंतर रिलायन्स कम्युनिकेशच्या प्रवक्त्याने आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत असून, त्यांच्या आदेशानुसार इतर बाबींचीही पूर्तताकरू, असे म्हटले आहे.

undefined
Intro:Body:

अनिल अंबानींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, पैसे भरा नाहीतर तुरुंगात जावे लागेल





नवी दिल्ली - रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी आणि अन्य २ संचालकांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. २ न्यायमूर्तींच्या पीठाने अनिल अंबानी, सतीश सेठ आणि छाया विराणी यांना ४ आठवड्यांच्या आत एरिक्सन कंपनीला ४५३ कोटी चुकते करण्याचे आदेश दिले आहेत. असे न केल्यास त्यांना ३ महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागेल, असे न्यायालयाने सुनावले आहे.





टेलीकॉम उपकरणांची निर्मिती करणाऱ्या एरिक्सन कंपनीने अंबानी यांच्याविरोधात ५५० कोटींची थकीत रक्कम न भरल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या तीन अवमानना याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी निर्णय दिला. या प्रकरणी न्यायमूर्ती रोहिंन्टन फाली नरिमन आणि न्यायमूर्ती विनीत शरण यांनी अंबानी आणि त्यांच्या २ संचालकांना न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचे म्हटले आहे. याशिवाय, न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी या तिघांनाही प्रत्येकी १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दंडाची रक्कम न्यायालयाच्या कार्यालयात १ महिन्याच्या आत न भरल्यास या तिघांना १ महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागेल, असे न्यायालयाने सुनावले आहे.





न्यायालयाच्या आदेशानंतर रिलायन्स कम्युनिकेशच्या प्रवक्त्याने आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत असून, त्यांच्या आदेशानुसार इतर बाबींचीही पूर्ता करू, असे म्हटले आहे.

 


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.