ETV Bharat / bharat

उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर बीएसएफचे बडतर्फ जवान तेज बहादुर यादव यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

author img

By

Published : May 6, 2019, 7:13 PM IST

लोकसभा निवडणुकांच्या सातव्या टप्प्यामध्ये वाराणसी येथे मतदान होणार आहे. येथून पतंप्रधान मोदी दुसऱ्यांदा रिंगणात आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष येथील मतदान प्रक्रियेवर लागले आहे. येथूनच तेज बहादुर यादव निवडणूक लढणार होते.

Tej

लखनौ - वाराणसी येथून उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर बीएसएफचे बडतर्फ उमेदवार तेज बहादुर यादव यांनी निवडणूक आयोगाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ते पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढणार होते. मात्र, बीएसएफने बडतर्फ केल्याचे स्पष्टीकरण मागणारे प्रतिज्ञापत्र त्यांनी मुदतपूर्व न दिल्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती.


लोकसभा निवडणुकांच्या सातव्या टप्प्यामध्ये वाराणसी येथे मतदान होणार आहे. येथून पतंप्रधान मोदी दुसऱ्यांदा रिंगणात आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष येथील मतदान प्रक्रियेवर लागले आहे. येथून तेज बहादुर यादव यांनी सपा-बसप आघाडीच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांना बडतर्फ केल्याचे कारण स्पष्ट करणारे बीएसएफचे शपथपत्र २४ तासांच्या आत दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते.


तेज बहादुर यादव यांनी ठरावीक मुदतीमध्ये शपथपत्र जमा न केल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला होता. मात्र, आता त्यांनी या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. ते तेथे निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात लढणार आहेत.


शपथपत्र सादर करण्यासाठी त्यांना आयोगाने कमी वेळ दिला होता, असा त्यांचा आरोप आहे. तर, भ्रष्टाचार आणि घोटाळा केल्या प्रकणीच अशा प्रमाणपत्राची गरज असते, असेही त्यांचे म्हणणे आहे. आयोगाने त्यांचा अर्ज रद्द करुन निवडणूक लढण्याच्या त्यांच्या हक्कावर गदा आणली आहे, असेही यादव यांनी आरोप केला आहे. त्यासाठीच ते सर्वोच्च न्यायालयात खटला चालवणार, असे त्यांनी स्पष्ट केले.

लखनौ - वाराणसी येथून उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर बीएसएफचे बडतर्फ उमेदवार तेज बहादुर यादव यांनी निवडणूक आयोगाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ते पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढणार होते. मात्र, बीएसएफने बडतर्फ केल्याचे स्पष्टीकरण मागणारे प्रतिज्ञापत्र त्यांनी मुदतपूर्व न दिल्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती.


लोकसभा निवडणुकांच्या सातव्या टप्प्यामध्ये वाराणसी येथे मतदान होणार आहे. येथून पतंप्रधान मोदी दुसऱ्यांदा रिंगणात आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष येथील मतदान प्रक्रियेवर लागले आहे. येथून तेज बहादुर यादव यांनी सपा-बसप आघाडीच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांना बडतर्फ केल्याचे कारण स्पष्ट करणारे बीएसएफचे शपथपत्र २४ तासांच्या आत दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते.


तेज बहादुर यादव यांनी ठरावीक मुदतीमध्ये शपथपत्र जमा न केल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला होता. मात्र, आता त्यांनी या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. ते तेथे निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात लढणार आहेत.


शपथपत्र सादर करण्यासाठी त्यांना आयोगाने कमी वेळ दिला होता, असा त्यांचा आरोप आहे. तर, भ्रष्टाचार आणि घोटाळा केल्या प्रकणीच अशा प्रमाणपत्राची गरज असते, असेही त्यांचे म्हणणे आहे. आयोगाने त्यांचा अर्ज रद्द करुन निवडणूक लढण्याच्या त्यांच्या हक्कावर गदा आणली आहे, असेही यादव यांनी आरोप केला आहे. त्यासाठीच ते सर्वोच्च न्यायालयात खटला चालवणार, असे त्यांनी स्पष्ट केले.

Intro:Body:

National NEWS


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.